शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
4
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
5
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
6
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
7
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
8
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
9
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
10
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
11
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
12
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
13
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
14
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
15
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
16
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
17
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
18
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
19
Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
20
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?

चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसची गटबाजी तत्काळ संपवा

By admin | Updated: October 9, 2016 01:30 IST

येथील काँग्रेस पक्ष आणखी मजबुत व बळकट करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसची गटबाजी संपवा, ...

अनेक समस्याही मांडल्या : अरूण धोटे यांचे प्रदेशाध्यक्षांना साकडेराजुरा : येथील काँग्रेस पक्ष आणखी मजबुत व बळकट करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसची गटबाजी संपवा, असे साकडे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अरुण धोटे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना घातले.माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे कार्यकर्ता मेळाव्यासाठी राजुरा येथे आले असताना अ‍ॅड. अरुण धोटे यांनी त्यांना विविध समस्यांचे निवेदन दिले. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात व केंद्रात भाजपचे सरकार आलेले आहे. परंतु सत्ता आल्यानंतरसुद्धा त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाला रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची आवश्यकता आहे. अनेक वर्ष काँग्रेस पक्ष सत्तेत असल्याने नेत्यांना व कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याची सवय राहिलेली नाही. काँग्रेस पक्षाच्या मजबुतीसाठी गटबाजी संपविणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. सत्ता गेली तरी गटबाजी संपलेली नाही, ही काँग्रेसजनासाठी अत्यंत खेदाची गोष्ट आहे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात शालेय जीवनापासून काँग्रेस पक्षाचे आपण काम करीत आहोत व काँग्रेस पक्षाच्या अनेक पदावर पूर्वीपासून काम केलेले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा मजबुतीने उभा राहावा असे वाटते, असे मत अ‍ॅड. अरुण धोटे यांनी व्यक्त केले.मागील दोन महिन्यापासून सतत पडलेल्या पावसामुळे बल्लारपूर ते राजुरा तसेच राजुरा ते गडचांदूर रस्त्यावर खड्डे पडलेले आहे. पण त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. सदर खड्डयावरील रस्ते त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे. राजुरा, कोरपना व जिवती भागात मोठ्या प्रमाणात वनजमिनीवर शेतकरी अनेक वर्षांपासून शेती करीत आहे. परंतु नवीन शासन शेतकऱ्यांना वनजमिनीवरुन हटवून जमीन ताब्यात घेण्याच्या विचारात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होईल. जुन्या सरकारने वनजमिनीवर शेतकऱ्यांना पट्टे देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वनजमिनीवरील शेतकऱ्यांना त्वरीत पट्टे देण्यात यावे, ही मागणी शासनदरबारी लावून धरावी.राजुरा येथे मागील चार महिन्यापासून उपविभागीय अधिकारी यांचे पद रिक्त असून अतिरिक्त भार तहसीलदार यांच्याकडे आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रकरणे प्रलंबित असून त्यांना निकाल लागलेला नाही. तसेच शेतकऱ्यांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्वरीत उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक महसुली विभागात करण्यात यावी.चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाल्यानंतरसुद्धा प्रचंड प्रमाणात दारुची अवैध विक्री सुरू आहे. त्यामुळे तरुण मुले व्यसनाधिन झालेले आहे व अनेक तरुण अवैध दारुच्या व्यवसायात गुंतलेले आहे. दारुची अवैध विक्री शासकीय व राजकीय आशिर्वादाने सुरू आहे. ही अवैध विक्री त्वरीत बंद करण्यात यावी.काँग्रेस सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी कर्ज माफ केले होते. अजूनही शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. शेतमालाला योग्य तो हमीभाव दिला नाही. अगोदर दुष्काळाने शेतीचे नुकसान झाले व आता जास्त पावसाने नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज काढून खर्च केलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा अनेक शेतकऱ्यांनी कर्जसाठी आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांचे शासनाने कर्ज माफ करावी, अशी मागणी अ‍ॅड. अरुण धोटे यांनी आपल्या निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)