शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ललित लिहिणे म्हणजे सांस्कृतिक ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:20 IST

ललित लेखन करण्यासाठी मोठी दृष्टी लागते. लालित्य हे जीवन जगण्यासाठीच मुख्य साधन आहे. सहा ललित पुस्तके एकाचवेळी लोकार्पण होणे, हे आनंददायी तर आहेच. पण त्यामुळे हा लेखक आकृतीबंधात मावत नाही. तो ओसंडून वाहतो आहे.

ठळक मुद्देश्रीपाद भालचंद्र जोशी : ग्रंथसंपदेवर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ललित लेखन करण्यासाठी मोठी दृष्टी लागते. लालित्य हे जीवन जगण्यासाठीच मुख्य साधन आहे. सहा ललित पुस्तके एकाचवेळी लोकार्पण होणे, हे आनंददायी तर आहेच. पण त्यामुळे हा लेखक आकृतीबंधात मावत नाही. तो ओसंडून वाहतो आहे. यामुळे ेललित लेखन हा एकसांस्कृतिक व सामाजिक ठेवा आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत, व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात सूर्यांश साहित्य मंचाच्या वतीने डॉ. विद्याधर बन्सोड यांच्या सहा पुस्तकांचे प्रकाशन व चर्चासत्रात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.यावेळी लेखक व कादंबरीकार डॉ. रविंद्र शोभणे, प्राचार्य डॉ राजेश इंगोले, समीक्षक डॉ. शैलेंद्र्र लेंडे, डॉ. इसादास भडके, डॉ. श्याम मोहरकर, डॉ. धनराज खानोरकर, डॉ. राज मुसणे, डॉ. विद्याधर बन्सोड, डॉ. संजय लाटेलवार आदी उपस्थित होते. डॉ. जोशी यांनी मराठी साहित्यातील विविध प्रवाहांवर भाष्य केले. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लेखन पुढे येत असल्याचे त्यांनी नमुद केले. ‘मुक्काम पोस्ट तेढा’ कादंबरीवर डॉ मुसणे यांनी विचार मांडले तर ‘होरपळ’ स्वकथनावर डॉ. खानोरकर यांनी भाष्य केले. प्राचार्य, डॉ. इंगोले यांनीही साहित्याचे सामर्थ्य विषद केले. डॉ लेंडे, डॉ. मोहरकर यांनी 'टोला' कादंबरीवर विचार मांडले. डॉ. इसादास भडके यांनी 'दलित साहित्याचे वैचारिक अधिष्ठान यातील मर्मस्थळे उलगडली.उपस्थित अभ्यासकांनी मराठी कादंबरी, त्यातील आशयबंध, सादरीकरण, सामाजिक भूमिका, समकालिन वास्तव आदी पैलुंवर विचार मांडले. प्रास्ताविक सूर्यांश मंचाचे अध्यक्ष इरफान शेख, संचालन डॉ. लाटेलवार यांनी केले. प्रदीप देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाला श्रीपाद प्रभाकर जोशी, सुदर्शन बारापात्रे ना. गो. थुटे, डॉ. हिरा बनपूरकर, डॉ. पद्मरेखा धनकर, गीता रायपुरे, संजय वैद्य, काटकर, डॉ. कांडनगीरे उपस्थित होते.