शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी मुहूर्त सापडेना !

By admin | Updated: October 13, 2016 02:16 IST

यावर्षीच्या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.

जिल्हावासी त्रस्त : पावसाने लावली रस्त्यांची वाटचंद्रपूर : यावर्षीच्या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. वर्दळीचे मुख्य मार्ग खड्डेमय झाले असून या रस्त्यांवर वाहनाचे अनेक अपघात घडत आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रस्त्यांची दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष करीत असून त्यांना रस्ते दुरूस्तीसाठी अद्यापही शुभ मुहूर्त सापडलेला नसल्याचे दिसून येते.चंद्रपूर शहरासह तालुका मुख्यालयातील अंतर्गत रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. मात्र केवळ दगड व मुरूम टाकून रस्त्याची डागडुजी केली जात असल्याने दोन दिवसांतच रस्ता जैसे थे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.चंद्रपूर शहरातील रामनगर चौक, बंगाली कॅम्प, वाहतूक शाखेसमोरील रस्ता पुर्णत: उखडून गेला आहे. तर गडचिरोली मार्गही मोठ्या प्रमाणात उखडला आहे. या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची डागडुजी तत्काळ होणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्षच होत असल्याचे खड््यांमुळे नागरिक हैराण झाले असून किरकोळ व मोठे अपघात घडत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)डांबरी रस्त्याला मुरूमाचा लेपकाही ठिकाणी रस्ते डागडुजीचे काम सुरू आहेत. मात्र या कामात डांबराऐवजी चक्क मुरूम व दगडाचा वापर केला जात आहे. त्यामुळे जड वाहन गेल्यास खड्ड्यातील मुरूम व दगड उखडून जाते. डांबरी चुरी व लहान लहान दगड रस्त्यावर पसरून राहत असल्याने दुचाकी वाहने घसरत असल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे डागडुजीचे काम केवळ देखावा ठरत असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.