शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

...अखेर गावकऱ्यांसमोर वनाधिकारी नमलेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 05:00 IST

वन्यजीव - प्राणी संघर्षावरून गावकरी व वनविभागाचे अधिकारी आमने सामने आले. वाघाला जेरबंद केल्याशिवाय घटनास्थळावरून वनाधिकारी व पोलीस अधिकारी यांना जाऊ देणार नाही, अशी गावकऱ्यांनी भूमिका घेतल्याने धास्तावलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर यांनी उपवनसंरक्षक (बफर) चंद्रपूर यांच्यासोबत गावकऱ्यांची तत्काळ मीटिंग घेऊन वाघाला जेरबंद करण्याबाबत उपाययोजना करता येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर वातावरण शांत झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यात वन्यजीव - मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तालुक्यात आजपर्यंत वाघाने १४ बळी घेतले असताना वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभाग कुठलीही उपाययोजना करताना दिसत नाही. असे असतानाच नुकताच पडझरी येथे शुक्रवारी वाघाने हल्ला करून युवा शेतकऱ्याला ठार केल्याची घटना घडली. त्यामुळे संतप्त झालेल्या सरपंच व गावकऱ्यांनी काँग्रेसचे नेते संतोष रावत यांना भ्रमणध्वनीद्वारे सदर घटनेची माहिती देताच तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाघाला जेरबंद करण्याची व कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करीत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून चांगलेच धारेवर धरले.वन्यजीव - प्राणी संघर्षावरून गावकरी व वनविभागाचे अधिकारी आमने सामने आले. वाघाला जेरबंद केल्याशिवाय घटनास्थळावरून वनाधिकारी व पोलीस अधिकारी यांना जाऊ देणार नाही, अशी गावकऱ्यांनी भूमिका घेतल्याने धास्तावलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर यांनी उपवनसंरक्षक (बफर) चंद्रपूर यांच्यासोबत गावकऱ्यांची तत्काळ मीटिंग घेऊन वाघाला जेरबंद करण्याबाबत उपाययोजना करता येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर वातावरण शांत झाले. त्यानुसार शनिवारी दुपारी २ वाजता वनविभागाच्या रेस्ट हाऊस येथे स्थानिक सरपंच व गावकऱ्यांची उपवनसंरक्षक  गुरुप्रसाद यांच्यासोबत मीटिंग घेऊन वाघाला जेरबंद करण्याची ग्वाही देण्यात आली.

वाघ जेरबंद करण्याची कार्यवाही सुरूवनविभागाचे कर्मचारी वाघाला जेरबंद करण्यासाठी कामात लागले असल्याने वाघ केव्हा जेरबंद होईल, याकडे सर्व गावकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश  रत्नावार, कोसंबी ग्रामपंचायत सरपंच रवींद्र किसन कामडी, मारोडा येथील सरपंच भिकारू शेन्डे,  भादुर्णी येथील सरपंच  रेवता सोनुले,  मोरवाही येथील सरपंच अनुराधा प्रमोद नेवारे, लोकनाथ नर्मलवार, उश्राळा येथील सरपंच बंडू नर्मलवार,  सरपंच वंदना पेन्दोर, उपसरपंच वर्षा प्रवीण आरेकर,  सुरेश फुलझेले, अशोक पुल्लावर  उपस्थित होते.

वाघाला जेरबंद करण्यासाठी कर्मचारी कामाला लागले असून मानव - वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता जंगल सभोवताल सौरऊर्जेचे कुंपण लावून देण्यात येणार आहे.-जी.आर. नायगमकर वनपरिक्षेत्र अधिकारी मूल

 

टॅग्स :forest departmentवनविभाग