शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

...अखेर गावकऱ्यांसमोर वनाधिकारी नमलेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 05:00 IST

वन्यजीव - प्राणी संघर्षावरून गावकरी व वनविभागाचे अधिकारी आमने सामने आले. वाघाला जेरबंद केल्याशिवाय घटनास्थळावरून वनाधिकारी व पोलीस अधिकारी यांना जाऊ देणार नाही, अशी गावकऱ्यांनी भूमिका घेतल्याने धास्तावलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर यांनी उपवनसंरक्षक (बफर) चंद्रपूर यांच्यासोबत गावकऱ्यांची तत्काळ मीटिंग घेऊन वाघाला जेरबंद करण्याबाबत उपाययोजना करता येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर वातावरण शांत झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यात वन्यजीव - मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तालुक्यात आजपर्यंत वाघाने १४ बळी घेतले असताना वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभाग कुठलीही उपाययोजना करताना दिसत नाही. असे असतानाच नुकताच पडझरी येथे शुक्रवारी वाघाने हल्ला करून युवा शेतकऱ्याला ठार केल्याची घटना घडली. त्यामुळे संतप्त झालेल्या सरपंच व गावकऱ्यांनी काँग्रेसचे नेते संतोष रावत यांना भ्रमणध्वनीद्वारे सदर घटनेची माहिती देताच तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाघाला जेरबंद करण्याची व कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करीत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून चांगलेच धारेवर धरले.वन्यजीव - प्राणी संघर्षावरून गावकरी व वनविभागाचे अधिकारी आमने सामने आले. वाघाला जेरबंद केल्याशिवाय घटनास्थळावरून वनाधिकारी व पोलीस अधिकारी यांना जाऊ देणार नाही, अशी गावकऱ्यांनी भूमिका घेतल्याने धास्तावलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर यांनी उपवनसंरक्षक (बफर) चंद्रपूर यांच्यासोबत गावकऱ्यांची तत्काळ मीटिंग घेऊन वाघाला जेरबंद करण्याबाबत उपाययोजना करता येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर वातावरण शांत झाले. त्यानुसार शनिवारी दुपारी २ वाजता वनविभागाच्या रेस्ट हाऊस येथे स्थानिक सरपंच व गावकऱ्यांची उपवनसंरक्षक  गुरुप्रसाद यांच्यासोबत मीटिंग घेऊन वाघाला जेरबंद करण्याची ग्वाही देण्यात आली.

वाघ जेरबंद करण्याची कार्यवाही सुरूवनविभागाचे कर्मचारी वाघाला जेरबंद करण्यासाठी कामात लागले असल्याने वाघ केव्हा जेरबंद होईल, याकडे सर्व गावकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश  रत्नावार, कोसंबी ग्रामपंचायत सरपंच रवींद्र किसन कामडी, मारोडा येथील सरपंच भिकारू शेन्डे,  भादुर्णी येथील सरपंच  रेवता सोनुले,  मोरवाही येथील सरपंच अनुराधा प्रमोद नेवारे, लोकनाथ नर्मलवार, उश्राळा येथील सरपंच बंडू नर्मलवार,  सरपंच वंदना पेन्दोर, उपसरपंच वर्षा प्रवीण आरेकर,  सुरेश फुलझेले, अशोक पुल्लावर  उपस्थित होते.

वाघाला जेरबंद करण्यासाठी कर्मचारी कामाला लागले असून मानव - वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता जंगल सभोवताल सौरऊर्जेचे कुंपण लावून देण्यात येणार आहे.-जी.आर. नायगमकर वनपरिक्षेत्र अधिकारी मूल

 

टॅग्स :forest departmentवनविभाग