शहरं
Join us  
Trending Stories
1
99th Marathi Sahitya Sammelan: संमेलनस्थळी कार्याध्यक्षांना फासले काळे, संशयित पोलिसांच्या ताब्यात-video
2
विराट कोहली पुन्हा एकदा कसोटी क्रिकेट खेळताना दिसू शकतो! गंभीरचे नाव घेत कुणी केला मोठा दावा?
3
चुकीच्या UPI आयडीवर पैसे पाठवले गेले? घाबरू नका, 'या' सोप्या पद्धतीने मिळवा पैसे परत
4
Nashik Municipal Election 2026 : धावपळ, उत्कंठा अन् रंगलेले माघारी नाट्य! अपक्षांच्या मनधरणीसाठी मोठी कसरत
5
'ते बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहेत...' व्हेनेझुएलाच्या हल्ल्यांमुळे कोलंबियाचे राष्ट्रपती संतापले
6
तलावात उडी मारुनही वाचला नाही जीव; जमावाच्या क्रूरतेचा बळी ठरलेल्या खोकन दास यांचा रुग्णालयात मृत्यू
7
US Airstrikes Venezuela: व्हेनेझुएलावर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक? विमानांमधून लष्करी तळांवर बॉम्बवर्षाव, संरक्षणमंत्र्यांच्या घरावर हल्ला
8
Video: 6 6 6 6 6 4 ... Hardik Pandya चा धुमधडाका; एकाच षटकात कुटल्या ३४ धावा, शतकही ठोकलं
9
LIC चं न्यू ईयर गिफ्ट; बंद पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार, लेट फी वर मिळतेय १००% पर्यंत सूट
10
अभिमानास्पद! ऑस्करने घेतली मराठी सिनेमाची दखल, मुख्य श्रेणी स्पर्धेत 'दशावतार'ची निवड
11
१ मार्चपासून ATM मधून ५०० रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत का? काय आहे या व्हायरल दाव्यामागचं सत्य
12
भयंकर! वय २२, तीन बायका, ७ मुलांचा बाप... चौथ्या लग्नाच्या नादात गर्भवती पत्नीची केली हत्या
13
Nashik Municipal Election 2026 : बडगुजरांची व्यूहरचना यशस्वी; दोन प्रतिस्पर्ध्याची केली कोंडी, 'अशी' होणार लढत
14
"आम्ही हिंदू अधिकारी संतोषला जाळले," बांगलादेशी नेत्याचा पोलिस ठाण्यात खळबळजनक दावा
15
फोनचा एअरप्लेन मोड फक्त विमानासाठी नाही! रोजच्या आयुष्यात करा असा वापर; होतील ७ मोठे फायदे
16
मुस्ताफिजुर रहमान बाबत निर्णय झाला, संघातून वगळण्याचे बीसीसीआयचे केकेआरला आदेश
17
सावधान! फोनचे 'ब्लूटूथ' ऑन ठेवणं पडू शकतं महागात; क्षणात बँक खातं होईल रिकामं!
18
पौष पौर्णिमा २०२६: आजची रात्र भाग्याची! फक्त पाणी आणि अक्षता वापरून करा 'हा' इच्छापूर्ती उपाय
19
"लग्न लावून दिलंत तर..."; मैत्रिणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या तरुणीची धमकी, थेट नवरीलाच पळवलं
20
सोमवारी तळहातावरील गुरु पर्वतावर लावा हळदीचा टिळा; 'पुष्य नक्षत्रा'च्या मुहूर्तावर उघडेल भाग्याचे द्वार!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उसगाववासीयांनी तीन तास रोखली कोळसा वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:30 IST

फोटो घुग्घुस : गेल्या अनेक दिवसांपासून उसगाव-एसीसी रस्त्याने होत असलेली कोळसा वाहतूक थांबवा, अशी मागणी उसगाव ग्रामपंचायतकडून वारंवार केल्यानंतरही ...

फोटो

घुग्घुस : गेल्या अनेक दिवसांपासून उसगाव-एसीसी रस्त्याने होत असलेली कोळसा वाहतूक थांबवा, अशी मागणी उसगाव ग्रामपंचायतकडून वारंवार केल्यानंतरही कोळसा वाहतूक बंद झाली नसल्याने रविवारी उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले.

दरम्यान, उपविभागीय अधिकारी नांदेडकर घटनास्थळी दाखल झाले व सरपंच, एसीसीचे सुरक्षा अधिकारी जोगेंद्रसिंग यांच्याशी चर्चा करून रस्त्यावर तत्काळ बॅरिकेड लावून कोळसा व जड वाहनांना बंद करण्याचा निर्णय झाल्याने तीन तासांनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.

रविवारी सकाळी ११ वाजता उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच नविता ठाकरे यांनी उसगाव एसीसी रस्त्यावर वाहतूक रोखून धरली. पोलीस, दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांनी घटनास्थळी पोहोचून समस्या जाणून घेतल्या व तत्काळ एसीसी सुरक्षा व्यवस्थापक जोगेंद्रसिंग यांच्या व सरपंचाचे पती धनंजय ठाकरे व उपस्थितांसोबत चर्चा करून या रस्त्यावर एसीसीने बॅरिकेड्स लावून कोळसा वाहतूक थांबविण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तोवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

बॉक्स

मनाई असतानाही वाहतूक सुरूच

उसगाव ते एसीसी हद्दीपर्यंत ग्रामपंचायतने सीएसआर फंडातून सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविला. मात्र या रस्त्यावरून पैनगंगा, मुंगोली कोळसा खाणीतून कोळसा वाहतूकदाराकडून कोळसा वाहतुकीसाठी वापर केला जात असल्याने रस्त्याची दुरवस्था होत आहे. विशेषतः कोळसा वाहतूक तारपोलीन न बांधता होत असल्याने वाहनातून कोळसा खाली पडून रस्त्याने दुचाकी, सायकल, पायदळ चालणाऱ्या लोकांच्या अंगावर पडून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. कोळसा वाहतूक एसीसी-घुग्घुस सिमेंट मार्गाने करण्यास मनाई असली तरी कोळसा वाहतूक करणाऱ्या मोठ्या कंपन्या या रस्त्याचा उपयोग करीत असल्याने घुग्घुस गावातील लोकांना वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत होता. या संदर्भात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस विभागाला निवेदन देऊन लक्ष वेधले. मात्र काहीही झाले नाही. प्रश्न सुटत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून प्रश्न सोडविण्याची वेळ आली.