शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
4
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
5
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
6
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
7
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
8
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
9
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
10
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
11
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
12
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
13
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
15
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
16
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
19
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
20
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक

अखेर ‘तो’ निधी मिळाला परत

By admin | Updated: April 12, 2015 00:45 IST

सन २०१३ च्या जून ते सप्टेंबर महिन्यात विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळे विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया..

११.७० कोटींचा निधी : मत्स व्यावसायिकांना दिलासापेंढरी (कोके) : सन २०१३ च्या जून ते सप्टेंबर महिन्यात विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळे विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील मच्छीमारी संस्थांच्या तलावातील मासे, मत्सबीज, होळ्या, जुना मत्ससाठा, जाळे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या नुकसानाची भरपाई म्हणून राज्य शासनाने मत्स्य व्यवसायिकांना नुकताच ११.७० कोटी रुपयांचा परत गेलेला निधी मंजूर केला आहे. यामुळे मत्स व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.याबाबत तत्कालिन पशु व मत्स्य व्यवसाय मंत्री मधुकर चव्हाण यांच्या दालनात ३ सप्टेंबर २०१३ ला आ.विजय वडेट्टीवार, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात मत्स्य व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी मंत्रालयात बैठक बोलावली होती. या सभेत केंद्र शासनाकडून आर्थिक मदत देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार केंद्र शासन आपत्ती व्यवस्थापन पत्र क्र. ३२-३/२०१३ एन.डी.एम.-१ दिनांक ७ नोव्हेंबर २०१३ अन्वये मत्स्य व्यवसायिकांना ११.७० कोटी रुपये केंद्र शासनाकडून प्राप्त झाले.त्यावेळी १३ फेब्रुवारी २०१४ च्या महाराष्ट्र शासन निर्णयान्वये संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सदर निधी वितरित करण्याकरिता पाठविण्यात आला. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ३१ मार्च २०१४ पर्यंत निधी वाटप न झाल्यामुळे सदर निधीची रक्कम राज्य शासनाकडे परत गेली. त्यानंतर मत्स्य व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने पुनश्च आ.विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात तत्कालिन मत्स्य व्यवसाय मंत्री यांच्या दालनात संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत ५ जून २०१४ ला पुनश्च बैठक घेऊन परत गेलेल्या निधीची मागणी महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली. त्यामध्ये पूर्वीच्या तांत्रिक अडचणी दूर करून सदर निधी मत्स्य संस्थांना देण्याचे ठरविण्यात आले. यासंबंधी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून त्यांनी आपल्या विशेष फंडातून निधी देण्याचे कबूल करवून तसे पत्र घेतले. परंतु शासन बदलल्यामुळे बराच कालावधी लोटूनही सदर निधीची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे मत्स्य व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे १ फेब्रुवारी २०१५ ला राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लेखी निवेदन दिले आणि २५ फेब्रुवारी २०१५ ला मंत्रालय मुंबई येथे भेट घेऊन निधी मंजूर करण्याची विनंती केली. त्यानुसार मत्स्य व्यवसायिकांचे प्रयत्न व आ. वडेट्टीवार यांच्या सततच्या लेखी पाठपुराव्यामुळे तथा राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पुनर्वसन खात्याला निर्देश दिल्यामुळे महसूल तथा वनविभाग शासन निर्णय क्र.एस.सी.वाय. ०१/२०१४/प्र.क्र. ०३/मं/११ दिनांक २७ मार्च २०१५ अन्वये रुपये ११.७० कोटी मत्स्य व्यवसायिकांच्या संस्थांना वितरित करण्याकरिता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून मत्स्य व्यवसाय विभागाला निधीची रक्कम पाठविण्यात आली. सदर निधी हा संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे आला आहे. दरम्यान, हा निधी परत येईल, अशी आशा मत्स्य व्यावसायिकांना नव्हती. निधी मिळाल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)२०१३ च्या अतिवृष्टीत मत्स्य व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईचा निधी आता मिळाला असतानाही मत्स्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे त्या निधीचे मत्स्य व्यवसायिकांना अजूनपर्यंत वाटप झाले नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसायिकांत संताप व्यक्त केला जात आहे.