शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

अखेर ग्रामीण भागात क्वारंटाईन सेंटरसाठी शाळांचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मासळ बु : ग्रामीण भागात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने दररोज नवे रुग्ण समोर येत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मासळ बु : ग्रामीण भागात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने दररोज नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे कोविडची सौम्य लक्षणे असणारे व बाहेरगावाहून येणाऱ्यांकडून कोविडचा प्रसार होऊ नये, याबाबत ‘लोकमत’ने दिनांक २५ एप्रिलला ‘ग्रामीण भागातील शाळा क्वारंटाईन सेंटर बनवा’, अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत सरपंच विकास धारणे यांनी ग्रामपंचायतीमार्फत राजीव गांधी विद्यालय क्वारंटाईन सेंटरसाठी अधिग्रहित केले आहे.

ग्रामीण भागातील नागरिक हंगामी मजुरीसाठी शहराकडे धाव घेतात. हंगाम संपल्यानंतर ते गावाकडे परत येतात. त्यांना गृह अलगीकरण किंवा क्वारंटाईनसाठी पाहिजे त्या प्रमाणात त्यांच्याकडे सोयी उपलब्ध राहात नाहीत. त्यामुळे कोरोना समितीची बैठक सरपंच विकास धारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. क्वारंटाईन सेंटर गावातच झाल्याने अडचण निर्माण होणार नाही. मासळ बु. येथे राजीव गांधी विद्यालय क्वारंटाईनसाठी ग्रामपंचायतीने ताब्यात घेतले आहे. या क्वारंटाईन सेंटरची क्षमता २० लोकांची राहणार आहे. यावर ग्रामपंचायत कमिटी, आरोग्य विभाग व गावातील प्रतिष्ठित नागरिक लक्ष ठेवणार आहेत. तिथेच त्यांना पंधरा दिवस औषधोपचारांची सोय मिळणार आहे. कोविडचे सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे. या बैठकीला सरपंच विकास धारणे, उपसरपंच प्रमोद खापर्डे, ग्रामसेवक प्रशांत लामगे, तलाठी अमोल घाटे, ग्रामपंचायत सदस्य प्रा. वामन बांगडे, रंजना बन्सोड, ललिता बन्सोड, संजय धारणे, गायत्री खामनकर, मनिषा गराटे, अनिता नन्नावरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष आशा जांभुळे, आरोग्यसेविका टोकलवार, आरोग्यसेवक सावसाकडे, अंगणवाडी सेविका शीला धारणे, शोभा गायकवाड, कुसुम धारणे, मदतनीस निशा पाटील, काजल राऊत, शशिकला वांढरे, आशा सेविका वनिता गणवीर, शालू बारेकर, प्रतिष्ठित ग्रामस्थ तसेच युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.