शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:20 IST

चंद्रपूरातील खड्ड्यांनी एकाच आठवड्यात दोघांचा नाहक जीव घेतले. या घटनेला प्रशासनाचा दुर्लक्षितपणा व संबंधित कंत्राटदारासह लोकप्रतिनिधीही जबाबदार आहे. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन प्रशासनाच्या चुकीचे प्रायश्चित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पीडित कुटुंबांना आर्थिक सहाय्य करून करावे, यासाठी हा मुद्दा स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सोमवारी विधानसभेत मांडणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : सोमवारी विधानसभेत स्थगन प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरातील खड्ड्यांनी एकाच आठवड्यात दोघांचा नाहक जीव घेतले. या घटनेला प्रशासनाचा दुर्लक्षितपणा व संबंधित कंत्राटदारासह लोकप्रतिनिधीही जबाबदार आहे. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन प्रशासनाच्या चुकीचे प्रायश्चित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पीडित कुटुंबांना आर्थिक सहाय्य करून करावे, यासाठी हा मुद्दा स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सोमवारी विधानसभेत मांडणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.चंद्रपूर-मूल हा नागपूर मार्गाला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या मार्गाने नेहमी लोकप्रतिनिधींचा राबता असतानाही या रस्त्याचे बांधकाम झालेले नाही. या मार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. पावसाळ्यापूर्वी हे खड्डे बुजविणे गरजेचे होते. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्गकडे गेला आहे. रस्त्यात एकही खड्डा पडला की तो लगेच कंत्राटदारामार्फत बुजवावा लागतो. मात्र येथे असंख्य खड्डे पडले असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या घटनेला हा विभाग आणि कंत्राटदार जबाबदार आहे, असा आरोप आ. वडेट्टीवार यांनी केला. या खड्ड्यांनी नंदा बेहरम या शिक्षिकेसह काजल पाल या एमबीएच्या विद्यार्थिनीचा बळी घेतला. काजल ही एकुलती एक मुलगी असून ती त्या घराचा आधार होती. त्यांच्या कुटुंबीयांना सोमवारी सायंकाळपर्यंत मदत मिळाली नाही, तर परिणाम वाईट होतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हा अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, महिला काँग्रेसच्या नंदा अल्लुरवार, माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया, बल्लारपूर तालुकाध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, संतोष लहामगे, सुभाष गौर, शिवा राव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.फुटपाथ कमी करण्यासाठी अडीच कोटीचंद्रपूर शहरातील गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत रस्ता अपुरा पडत असल्यामुळे अडीच कोटी महानगर पालिकेने मंजुर केले आहे. शहरात अमृत योजनेसाठी रस्ते फोडणे सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर फुटुपाथ कमी करता येते. आधीच फुटपाथ फोडून ते अरुंद करणार आणि नंतर पुन्हा अमृतसाठी रस्ते फोडणार हा प्रकार मनपा करीत आहे. याला काँग्रेस नगरसेवकांनी विरोधही केला, याकडेही लक्ष वेधून नाराजी व्यक्त केली.दारूबंदीला विरोध नाही, अंमलबजावणी करादारूबंदीला आमचा विरोध नाही. मात्र या दारुबंदीने पोलिसांचे बंगले बनत आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूबंद झाली नाही, तेथील ठाणेदारांवर कारवाई करून दारू हद्दपार करावी, याकडेही लक्ष वेधले.