शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

विदर्भ राज्यासाठी वैधानिक मार्गाने लढा उभारणार

By admin | Updated: June 1, 2016 01:26 IST

विदर्भ विरोधी मानसिकतेने आजवर विदर्भाचे केवळ शोषणच झाले असून रस्ते, सिंचन, नोकऱ्या आदींचा अनुशेष सारखा वाढतच गेला.

अनिल किलोर : जनता महाविद्यालयात पार पडली विदर्भ राज्य समन्वय समितीची बैठकचंद्रपूर : विदर्भ विरोधी मानसिकतेने आजवर विदर्भाचे केवळ शोषणच झाले असून रस्ते, सिंचन, नोकऱ्या आदींचा अनुशेष सारखा वाढतच गेला. महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास आता शक्य नसल्यामुळे आता शांततामय व वैधानिक मार्गाने आम्ही विदर्भ राज्याचा लढा उभारू, असे प्रतिपादन विदर्भ राज्य समन्वय समिती तथा जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी केले आहे. स्थानिक जनता महाविद्यालयात शुक्रवारी विदर्भ राज्य समन्वय समितीचे वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, जनमंचचे ज्येष्ठ सल्लागार प्रा. शरद पाटील, जिल्हा समन्वयक अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रकाश इटनकर, उमाकांत धांडे, अ‍ॅड. मनोहर रडके, अमिताभ पावडे, रामभाऊ आखरे, किशोर गुल्हाने, नरेश क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.अ‍ॅड. किलोर पुढे म्हणाले, विदर्भात १७ हजार मेगावॅट वीज निर्मिती होते. त्यापैकी केवळ दोन हजार मेगावॅटच येथे वापरली जाते. १५ हजार मेगावॅट वीज उर्वरित महाराष्ट्र वापरतो. इथल्या विजेच्या बळावर तिकडे उद्योग उभे होतात. सिंचनासाठी विद्युत पंप चालविले जातात. मात्र विदर्भात लोडशेडिंगच्या नावाने सिंचनाकरिता धड आठ तासही विद्युत पुरवठा होत नाही. वीज उत्पादन करताना प्रदूषणाचा सामना करणाऱ्या विदर्भातील जनतेला आणि उर्वरीत महाराष्ट्रील जनतेला मात्र एकाच दराने वीज मिळते. यापेक्षा आणखी दुर्दैव कोणते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी जनजागृती करण्याकरिता शहरापासून गावपातळी पर्यंत संघटनात्मक बांधणी करुन विदर्भातील जनतेपर्यंत आजवर झालेल्या अन्यायाची माहिती पोहोचवू, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रा.शरद पाटील, अ‍ॅड.मोरेश्वर टेमुर्डे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक अ‍ॅड. गोविंद भेंडारकर यांनी तर आभार उमाकांत धांडे यांनी मानले. याप्रसंगी प्रभाकर पारखी, हिराचंद बोरकुटे, डॉ.ईश्वर कुरेकर, तिराणिक, बशीरभाई, विजय मालीकर, सुनील वडस्कर, दीपक गोंडे, अमृत शेंडे, अमोल कुचनवार, नारायण डाखरे, लटारी उरकुडे, साधुजी मुसळे, लिलाधर खंगार, सतीश सोयाम, अमित लोनबले यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (प्रतिनिधी)