शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

विदर्भ राज्यासाठी वैधानिक मार्गाने लढा उभारणार

By admin | Updated: June 1, 2016 01:26 IST

विदर्भ विरोधी मानसिकतेने आजवर विदर्भाचे केवळ शोषणच झाले असून रस्ते, सिंचन, नोकऱ्या आदींचा अनुशेष सारखा वाढतच गेला.

अनिल किलोर : जनता महाविद्यालयात पार पडली विदर्भ राज्य समन्वय समितीची बैठकचंद्रपूर : विदर्भ विरोधी मानसिकतेने आजवर विदर्भाचे केवळ शोषणच झाले असून रस्ते, सिंचन, नोकऱ्या आदींचा अनुशेष सारखा वाढतच गेला. महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास आता शक्य नसल्यामुळे आता शांततामय व वैधानिक मार्गाने आम्ही विदर्भ राज्याचा लढा उभारू, असे प्रतिपादन विदर्भ राज्य समन्वय समिती तथा जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी केले आहे. स्थानिक जनता महाविद्यालयात शुक्रवारी विदर्भ राज्य समन्वय समितीचे वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, जनमंचचे ज्येष्ठ सल्लागार प्रा. शरद पाटील, जिल्हा समन्वयक अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रकाश इटनकर, उमाकांत धांडे, अ‍ॅड. मनोहर रडके, अमिताभ पावडे, रामभाऊ आखरे, किशोर गुल्हाने, नरेश क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.अ‍ॅड. किलोर पुढे म्हणाले, विदर्भात १७ हजार मेगावॅट वीज निर्मिती होते. त्यापैकी केवळ दोन हजार मेगावॅटच येथे वापरली जाते. १५ हजार मेगावॅट वीज उर्वरित महाराष्ट्र वापरतो. इथल्या विजेच्या बळावर तिकडे उद्योग उभे होतात. सिंचनासाठी विद्युत पंप चालविले जातात. मात्र विदर्भात लोडशेडिंगच्या नावाने सिंचनाकरिता धड आठ तासही विद्युत पुरवठा होत नाही. वीज उत्पादन करताना प्रदूषणाचा सामना करणाऱ्या विदर्भातील जनतेला आणि उर्वरीत महाराष्ट्रील जनतेला मात्र एकाच दराने वीज मिळते. यापेक्षा आणखी दुर्दैव कोणते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी जनजागृती करण्याकरिता शहरापासून गावपातळी पर्यंत संघटनात्मक बांधणी करुन विदर्भातील जनतेपर्यंत आजवर झालेल्या अन्यायाची माहिती पोहोचवू, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रा.शरद पाटील, अ‍ॅड.मोरेश्वर टेमुर्डे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक अ‍ॅड. गोविंद भेंडारकर यांनी तर आभार उमाकांत धांडे यांनी मानले. याप्रसंगी प्रभाकर पारखी, हिराचंद बोरकुटे, डॉ.ईश्वर कुरेकर, तिराणिक, बशीरभाई, विजय मालीकर, सुनील वडस्कर, दीपक गोंडे, अमृत शेंडे, अमोल कुचनवार, नारायण डाखरे, लटारी उरकुडे, साधुजी मुसळे, लिलाधर खंगार, सतीश सोयाम, अमित लोनबले यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (प्रतिनिधी)