शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

८० वर्षांच्या आजोबाचा कडाक्याच्या थंडीत जीवघेणा संघर्ष

By admin | Updated: January 16, 2017 00:38 IST

आयुष्याच्या सायंकाळी सुखाचे चार दिवस मुला-नातवंडासोबत घालवावे, अशी सर्वांचीच धडपड असते.

वन्यप्राण्यांकडून पीक उद्ध्वस्त : आयुष्याच्या सायंकाळीही शेतात जागलप्रकाश काळे गोवरीआयुष्याच्या सायंकाळी सुखाचे चार दिवस मुला-नातवंडासोबत घालवावे, अशी सर्वांचीच धडपड असते. परंतु शेतकऱ्यांच्या नशिबी कधी सुखाचे चार क्षण आलेही नाही. त्यांच्या आयुष्यात संकटाची संघर्षमय मालिकाच पुजली आहे. वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही पिकांच्या रक्षणासाठी ८० वर्षांच्या आजोबाचा जीवघेणा संघर्ष सुरूच आहे.राजुरा तालुक्यातील खामोना येथील मारोती सोमापुरके (८०) या जिगरबाज आजोबाचा संघर्ष कुटुंबीयांसाठी आधारवड ठरला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने दिवस-रात्र एक करून उभे केलेले पीक डोळ्यादेखत वन्यप्राण्यांकडून उद्धवस्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाची लढाई अशीच सुरू आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने रात्री बाहेर पडणे कठीण आहे. बोचऱ्या थंडीत रात्र कुडकुडत काढणे व जीव धोक्यात घालून पिकांचे रक्षण करणे ही ८० वर्षाचा आजोबाला आयुष्याच्या सायंकाळीही धडपड करावी लागत आहे. पिकांचे रक्षण करताना वन्यप्राण्यांकडून स्वत:चा बचाव करता यावा आणि जंगली जनावर दुरूनच दिसावे, यासाठी त्यांनी शेतात मचाण उभारली आहे. सध्या शेतात कापूस, तूर, गहू, हरभरा ही पिके डौलाने उभी आहेत. मात्र, एका रात्रीतून या पिकांची वन्यप्राण्यांकडून वाट लावण्यात येत आहे. शेतकरी नेहमीच अस्मानी, सुलतानी संकटात भरडला जात आहे. वन्यप्राणी पीक उद्धवस्त करीत असल्याने शेतकरी पुरता काकुळतीला आला आहे. त्यामुळे ८० वर्षांच्या या आजोबांनी पिकांच्या रक्षणासाठी शेतातच डेरा टाकला आहे. ‘जिना यहाँ, मरना यहाँ’, यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या जिवाला धोका आहे. कधी हिंस्रपशू येऊन शेतकऱ्याचा घास घेईल, हे सांगणेही कठीण आहे. परंतु, हाताय पीक आले नाही, तर कर्जाचा डोंगर पुन्हा वाढेल, या विचाराने जीव धोक्यात घालून पिकांचे रक्षण करणे सुरू आहे.शेतकऱ्यांचा जीवनमरणाचा संघर्ष कायमवन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. परंतु त्याकडे कोणी कधी लक्षही दिले नाही. त्यामुळे पिकांच्या रक्षणासाठी जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना पिकांची ‘राखण’ करावी लागत आहे. हा कधीही न संपणारा जीवन मरणाचा संघर्ष आजही कायम आहे.हातात आलेले वन्यप्राणी पीक उद्ध्वस्त करीत आहेत. वन्यप्राणी दिवस-रात्र शेतात धुमाकूळ घालत असल्याने उत्पन्न मिळणार नाही. म्हणून वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतात जागलं करावे लागत आहे.- मारोती सोमापुरके, शेतकरी, खामोना.