शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

८० वर्षांच्या आजोबाचा कडाक्याच्या थंडीत जीवघेणा संघर्ष

By admin | Updated: January 16, 2017 00:38 IST

आयुष्याच्या सायंकाळी सुखाचे चार दिवस मुला-नातवंडासोबत घालवावे, अशी सर्वांचीच धडपड असते.

वन्यप्राण्यांकडून पीक उद्ध्वस्त : आयुष्याच्या सायंकाळीही शेतात जागलप्रकाश काळे गोवरीआयुष्याच्या सायंकाळी सुखाचे चार दिवस मुला-नातवंडासोबत घालवावे, अशी सर्वांचीच धडपड असते. परंतु शेतकऱ्यांच्या नशिबी कधी सुखाचे चार क्षण आलेही नाही. त्यांच्या आयुष्यात संकटाची संघर्षमय मालिकाच पुजली आहे. वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही पिकांच्या रक्षणासाठी ८० वर्षांच्या आजोबाचा जीवघेणा संघर्ष सुरूच आहे.राजुरा तालुक्यातील खामोना येथील मारोती सोमापुरके (८०) या जिगरबाज आजोबाचा संघर्ष कुटुंबीयांसाठी आधारवड ठरला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने दिवस-रात्र एक करून उभे केलेले पीक डोळ्यादेखत वन्यप्राण्यांकडून उद्धवस्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाची लढाई अशीच सुरू आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने रात्री बाहेर पडणे कठीण आहे. बोचऱ्या थंडीत रात्र कुडकुडत काढणे व जीव धोक्यात घालून पिकांचे रक्षण करणे ही ८० वर्षाचा आजोबाला आयुष्याच्या सायंकाळीही धडपड करावी लागत आहे. पिकांचे रक्षण करताना वन्यप्राण्यांकडून स्वत:चा बचाव करता यावा आणि जंगली जनावर दुरूनच दिसावे, यासाठी त्यांनी शेतात मचाण उभारली आहे. सध्या शेतात कापूस, तूर, गहू, हरभरा ही पिके डौलाने उभी आहेत. मात्र, एका रात्रीतून या पिकांची वन्यप्राण्यांकडून वाट लावण्यात येत आहे. शेतकरी नेहमीच अस्मानी, सुलतानी संकटात भरडला जात आहे. वन्यप्राणी पीक उद्धवस्त करीत असल्याने शेतकरी पुरता काकुळतीला आला आहे. त्यामुळे ८० वर्षांच्या या आजोबांनी पिकांच्या रक्षणासाठी शेतातच डेरा टाकला आहे. ‘जिना यहाँ, मरना यहाँ’, यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या जिवाला धोका आहे. कधी हिंस्रपशू येऊन शेतकऱ्याचा घास घेईल, हे सांगणेही कठीण आहे. परंतु, हाताय पीक आले नाही, तर कर्जाचा डोंगर पुन्हा वाढेल, या विचाराने जीव धोक्यात घालून पिकांचे रक्षण करणे सुरू आहे.शेतकऱ्यांचा जीवनमरणाचा संघर्ष कायमवन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. परंतु त्याकडे कोणी कधी लक्षही दिले नाही. त्यामुळे पिकांच्या रक्षणासाठी जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना पिकांची ‘राखण’ करावी लागत आहे. हा कधीही न संपणारा जीवन मरणाचा संघर्ष आजही कायम आहे.हातात आलेले वन्यप्राणी पीक उद्ध्वस्त करीत आहेत. वन्यप्राणी दिवस-रात्र शेतात धुमाकूळ घालत असल्याने उत्पन्न मिळणार नाही. म्हणून वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतात जागलं करावे लागत आहे.- मारोती सोमापुरके, शेतकरी, खामोना.