शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

पक्षांच्या स्वबळाचा पोलिसांना ताप

By admin | Updated: September 29, 2014 23:01 IST

भाजप-शिवसेनेची २५ वर्षाची जुनी युती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षाची आघाडी आता तुटली आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला

बंदोबस्ताचे नियोजन कोलमडले : प्रचार रॅली, जाहीर सभा, मिरवणुकांत होणार दमछाकचंद्रपूर : भाजप-शिवसेनेची २५ वर्षाची जुनी युती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षाची आघाडी आता तुटली आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असला तरी, पोलिसांचा ताप मात्र वाढला आहे. कारण निवडणूक बंदोबस्ताचे नियोजनच कोलमडले आहे. यापूर्वी भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असल्यामुळे एका मतदार संघात युती व आघाडीचे दोनच उमेदवार रिंगणात असायचे. मात्र आता युती व आघाडी तुटल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षाचे स्वतंत्र्य उमेदवार रिंगणात राहणार आहेत. तर युती-आघाडी तुटल्याने अनेकांना तिकीट मिळाली नाही. चारही प्रमुख पक्षात बंडखोरी झाली. काहींनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे यावर्षीच्या विधानसभा निवडणूकीत एका क्षेत्रात उमेदवार वाढले आहेत. ज्या मतदार संघात दोन ते तीन उमेदवार मुख्य असायचे तेथे आता चार ते पाच उमेदवार प्रमुख असणार आहेत. त्यामुळे जाहिर सभा व प्रचार रॅलींची संख्याही वाढणार आहेत. या सभा व रॅलींना बंदोबस्त पुरविताना पोलिसांच्या नाकीनऊ येणार आहे. सर्वत्र दुर्गोत्सवाची धूम सुरु आहे. ठिकठिकाणी रोषणाई करुन दांडीया, गरबा असे कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे या सार्वजनिक कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी काही दिवसांची वेळ असली तरी दुर्गोत्सव होताच पोलीस कर्मचारी निवडणूक बंदोबस्ताच्या तयारीला लागणार आहे. ईव्हीएम मशीन पोहचविणे व मतदान केंद्रावर सुरक्षा करावी लागणार आहे. मात्र, प्रचाराला सुरुवात झाली असून दोन ते तीन दिवसानंतर प्रमुख पक्षाचे उमेदवार आपआपल्या क्षेत्रात जाहिर सभा घेणार आहेत. तर काही पक्ष सिनेअभिनेत्यांना आणून प्रचार रॅली काढतील, अशावेळी पोलिसांना बंदोबस्त पुरवावे लागणार आहे. प्रचारासाठी उमेदवारांना १२ दिवसांचा अवधी मिळणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षामध्ये स्टार प्रचारकाच्या सभा होणार आहे. मात्र तालुकास्तरावर उपलब्ध असलेली मैदान, शाळा, महाविद्यालयाच्या पटांगणावर जाहिर सभा होणार असल्याने या मैदानावर सभा घेण्यासाठी परवानगी देतानाही पोलिसांना अडचणी येणार आहेत. दुर्गोत्सव व निवडणूक अशा दोन बंदोबस्तात उमेदवारांची वाढलेली संख्या ही पोलिसांना तापदायक ठरत असून मनुष्यबळ पुरविताना नाकीनऊ येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)