शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

घरोघरी साजरा होणार पोषण उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:49 IST

राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत पोषण माह राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा परिषदमधील कन्नमवार सभागृहात जिल्हा अभिसरण समितीची बैठक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा उपक्रम : जिल्ह्यातील १५ तालुक्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाच्या निर्देशानुसर देशात १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत पोषण माह राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा परिषदमधील कन्नमवार सभागृहात जिल्हा अभिसरण समितीची बैठक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली.बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, उपमुख्यकारी अधिकारी संजय जोल्हे, उपमुख्यकारी अधिकारी विजय पचारे यांच्यासह १५ तालुक्यातील सर्वतालुका वैद्यकीय अधिकारी बाल प्रकल्प अधिकारी, विस्ताार अधिकारी, पोषण अभियान अंतर्गत तालुका समन्वयक उपस्थित होते. या बैठकीत विविध विभागांचा समन्वय साधून १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पोषण माहच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. हे अभियान महिला व बाल विकास विभाग, ग्राम विकास विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, शिक्षण विभाग या विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यात राबविण्यात येणार असून प्रत्येकाच्या घरोघरी हा पोषण उत्सव साजरा करण्यात येणार आहे.पोषण माहमध्ये जिल्ह्याने चांगले काम करून पोषण आहाराचे महत्व पटवून द्यावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. या बैठकीमध्ये सर्व विभगाांच्या सहकार्याने पोषण अभियानात सर्व विभागांनी एकत्रित काम करण्याचे निर्देश जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थित सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांना दिले.महिनाभर राबविणार विविध उपक्रमया अभियानात बाळाचे पहिले १००० दिवस, अनेमिया, अतिसार, हाथ धुणे, स्वच्छता, पौष्टिक आहार या मुख्य घटनासोबत महिनाभर तब्बल विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने हे अभियान मोठ्या स्वरूपात राबविण्यासाठी केंद्राच्या उपक्रमासह जिल्हास्तरीय उपक्रमांचेदेखील आयोजन केले आहे. अंगणवाडी, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत आणि शाळेच्या माध्यमातून या उपक्रमांचे महिनाभर आयोजन केले जाणार आहे. यामध्ये पोषण आहारविषयी जनसभा, उत्तम आरोग्यासाठी पोषणाचे महत्व या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करणे, गरोदर मातेच्या पोषक आहाराविषयी चर्चा, अनेमिया निर्मूलनासाठी उपययोजना आदी विषयावर चर्चासत्र, विशेष ग्रामसभा, जनजागृतीसाठी प्रभाग फेरी काढण्यात येणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक