शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:23 IST

अनेक वर्षांपासून चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी शासन दरबारी रखडली आहे. या मागणीला गती यावी व येत्या काही दिवसात चिमूर क्रांती जिल्ह्याची शासनाने घोषणा करावी.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार : पहिल्या दिवशी नऊ जणांचे साखळी उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : अनेक वर्षांपासून चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी शासन दरबारी रखडली आहे. या मागणीला गती यावी व येत्या काही दिवसात चिमूर क्रांती जिल्ह्याची शासनाने घोषणा करावी. याकरिता ९ आॅगस्ट क्रांती दिनापासून चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीने साखळी उपोषण सुरू केले आहे.चिमूर क्रांती जिल्हा व्हावा, ही मागणी मागील ४७ वर्षांपासून चिमूरकर करीत आहेत. मात्र शासन या मागणीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी कृती समितीने हे उपोषण सुरू केले. पहिल्या दिवशी कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र राजूरकर, बाप्पु बोभाटे, संजय कामडी, कदीर शेख, प्रा. राम राऊत, विनोद ढाकुणकर, किशोर सिंगारे, माधव बिरजे, पप्पु कदीर शेख यांनी उपोषणास सुरूवात केली.गुरुवारला दुसºया दिवशी नरेंद्र राजूरकर, गजानन अगडे, बाळकृष्ण बोभाटे, संजय कामडी व रामेश्वर केळझरकर उपोषणास बसले आहेत. मागील ४७ वर्षांपासून चिमूरकर कृती जिल्ह्याची मागणी करीत आहेत. भारतीय स्वातंत्र्यामध्ये चिमूर येथील क्रांतीकारकांनी १६ आॅगस्ट १९४२ ला क्रांती करीत तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले. यासाठी अनेक क्रांतीकारकांनी बलिदान दिले तर अनेक क्रांतीकारकांना काळ्या पाण्याची सजा झाली. यामुळे चिमूरचे नाव देशाच्या इतिहासात कोरले गेले. मात्र शासन दरबारी चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी दुर्लक्षित पडली आहे. या मागणीला गती यावी म्हणून कृती समितीकडून विविध कार्यक्रम राबवून शासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे.कृती समितीची विविध आंदोलने१० आॅगस्टला चिमूर शहरात काळे झेंडे घेऊन रॅली काढण्यात येणार आहे. ११ आॅगस्टला मोर्चा काढून उपविभागीय अधिकाºयांना चिमूर क्रांती जिल्ह्याचे निवेदन १२ आॅगस्टला व्यापारपेठ बंद ठेवण्यात येणार. १३ आॅगस्टला चक्का जाम. १४ आॅगस्टला कॅडलमार्च, १५ ला स्मारकात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. १६ आॅगस्टला शहीद विरांना वंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमूर क्रांती जिल्ह्याचे निवेदन देण्यात येणार आहे. या कृती समितीच्या आंदोलनास नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्याची मागणी अध्यक्ष नरेंद्र राजूरकर, संजय डोंगरे, माधव बिरजे गजानन बुटके यांनी केली.