शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळातील खत विक्रीचा द्यावा लागणार अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST

केंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील खत विक्री संदर्भातील अहवाल मागविण्याच्या सूचना दिल्या. केंद्राने यापूर्वी अशा प्रकारचे पाऊल उचलेले नव्हते. यापूर्वी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांकडून खत विक्रीबाबत चौकशी अहवाल मागविण्यात येत होता. मात्र,गुण नियंत्रणकांना वगळून अहवाल सादर करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या.

ठळक मुद्देखत विक्रीत गैरव्यवहाराचा संशय : चौकशी अहवाल केंद्राकडे पाठविणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन सुरू केले होते. या कालावधीत काही विक्रेत्यांनी गैरव्यहार केल्याची शंका आहे. त्यामुळे केंद्र सरकारने खत विक्रीची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे विक्रेत्यांना आता खत विक्रीचा अहवाल प्रशासनाला सादर करावा लागणार आहे.केंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील खत विक्री संदर्भातील अहवाल मागविण्याच्या सूचना दिल्या. केंद्राने यापूर्वी अशा प्रकारचे पाऊल उचलेले नव्हते. यापूर्वी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांकडून खत विक्रीबाबत चौकशी अहवाल मागविण्यात येत होता. मात्र,गुण नियंत्रणकांना वगळून अहवाल सादर करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या. त्यानुसार जिल्ह्यातही अशा प्रकारचा अहवाल मागविण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने १६२.३३६ मेट्रीक टन खताची मागणी नोंदवली होती. त्यानुसार १३३.११० मेट्रीक टन आवंठन मंजूर झाले.लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात २९.२४६ मेट्रीक टन साठा उपलब्ध होता. राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले. त्या कालावधीत खताचा गैरव्यहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक खत विक्रीची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दोन प्रकारच्या प्रपत्रांमध्ये ही मागविण्यात आली आहे.प्रत्यक्ष चौकशी करणे जिल्हाधिकाऱ्यांना शक्य नसल्यास दुसरा चौकशी अधिकारी हा अतिरिक्त जिल्हाधिकारी पदापेक्षा कमी दर्जाचा नसावा, असेही केंद्राने बजावले आहे. या आदेशानंतर आयुक्तालयाने आदेश जारी केले. १ एप्रिल ते ३१ जुलै या कालवधीत जिल्ह्यात सर्वात जास्त खते विकलेल्या २० नोंदीपुरतीच ही चौकशी मर्यादित असल्याची माहिती सूत्राने दिली.विक्रेत्यांच्या समजून घ्याव्या समस्याजिल्ह्यातील काही डिलर्सकडून एकाच शेतकऱ्याला जादा खत विकण्याची शक्यता असू शकते. मात्र, लॉकडाऊन काळात दुकाने नियमित उघडी नव्हती. त्यामुळे एकदा दुकाने उघडताच शेतकऱ्यांचा कल एकाच वेळ खते खरेदी करण्याकडे कल होता. पॉस मशीनवर नेमके किती खत विकावे, याबाबत स्पष्ट नियम नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांच्या समस्या समजून घेण्याची गरज आहे. आदेशाचा धाक दाखवून विक्रेत्यांना त्रास देवू नये, अशी मागणी जिल्हा खत विक्री असोसिएशनने केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीcorona virusकोरोना वायरस बातम्या