शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

मालडोंगरीवर तयार होणार फळरोपवाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:31 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून दरवर्षी फळांच्या रोपांची दरवर्षी वाढत असल्याने मालडोंगरी येथील बीज गुणन प्रक्षेत्राचे फळरोपवाटिकेत विस्तारीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याकरिता ९५ लाखांचा निधी मंजूर केला असून लवकरच पायाभूत कामांना सुरूवात होणार आहे.

ठळक मुद्दे९५ लाख मंजूर : बीज गुणन प्रक्षेत्राचे विस्तारीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून दरवर्षी फळांच्या रोपांची दरवर्षी वाढत असल्याने मालडोंगरी येथील बीज गुणन प्रक्षेत्राचे फळरोपवाटिकेत विस्तारीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याकरिता ९५ लाखांचा निधी मंजूर केला असून लवकरच पायाभूत कामांना सुरूवात होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील फळबाग लागवडीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार आहे.मालडोंगरी येथे सन १९६१ रोजी बीज गुणन प्रक्षेत्र स्थापन करण्यात आले. या प्रक्षेत्रात २० हेक्टर ४० आर जमीन आहे. यापैकी गोसेखुर्द प्रकल्पाखालील क्षेत्र ४ हेक्टर ३० आर आणि बांधकामाखाली ०.३० आर जमीन राखीव ठेवण्यात आली. उर्वरीत १५ हेक्टर ८० आर क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्यासाठी अनुकूलता आहे. सदर प्रेक्षत्रावर बारमाही सिंचनाची सुविधा असल्याने रोपवाटिका स्थापन करण्याला वाव आहे. हे प्रक्षेत्र नागभीड उपविभागात येते. मागील काही वर्षांपासून ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी आंबा. कागदी लिंबू, पेरु, जांभुळ, आवळा, डाळींब आदी प्रमुख पिकांच्या रोपांची मागणी करीत आहेत. शिवाय महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत फळबाग लागवडीकरिता कलमा रोपांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता निर्माण झाली. परंतु जिल्ह्यातील अन्य क्षेत्रात अशी भौगोलिक परिस्थिती नसल्याने रोपे मिळविण्यासाठी प्रशासनाला अन्य राज्यातील जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यस्थितीत मालडोंगरी येथील बीज गुणन प्रक्षेत्रावर आंब्याचे २४ मातृवृक्ष आहेत. या ठिकाणी कागदी लिंबू, पेरु, जांभुळ, आवळा, डाळींब आदी मातृवृक्षांची लागवड केल्यास शेतकऱ्यांनाही याचा लाभ होऊ शकतो. याच हेतूने मालडोंगरी येथील प्रक्षेत्राचे फळरोपवाटिकेत विस्तारीत करण्यात येणार आहे. रोपवाटिका निर्माण केल्यास वेगळी कर्मचारी पदे आणि प्रक्षेत्रावरील कोणत्याही घटकावर परिणाम होणार नाही. वित्तीय भार पडणार नाही. या प्रक्षेत्रावर रोपवाटिका तयार झाल्यानंतर परिसरातील शेतकºयांना कलमा रोपांची उपलब्धता होऊन फळबाग लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.शेतकऱ्यांना चालनाशेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी ही रोपवाटिका उपयुक्त ठरणार आहे. प्रक्षेत्रातील कलमे रोपे विक्रीपासून आर्थिक फायदा होईल. मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. एकूण उपलब्ध क्षेत्रापैकी १५.८० हे. क्षेत्रावर तालुका फळरोपवाटिका स्थापन करण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने राज्य शासनाकडे पाठविला होता. राज्य शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उच्च तंत्रज्ञानावर आधारीत फळरोपवाटिका स्थापन करण्यास मंजुरी प्रदान केली. प्रकल्पासाठी ९६ लाखांचा निधी तातडीने देण्याचा आदेश कृषी विभागाचे सहसचिव अशोक आत्राम जारी केला आहे.