शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

मालडोंगरीवर तयार होणार फळरोपवाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:31 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून दरवर्षी फळांच्या रोपांची दरवर्षी वाढत असल्याने मालडोंगरी येथील बीज गुणन प्रक्षेत्राचे फळरोपवाटिकेत विस्तारीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याकरिता ९५ लाखांचा निधी मंजूर केला असून लवकरच पायाभूत कामांना सुरूवात होणार आहे.

ठळक मुद्दे९५ लाख मंजूर : बीज गुणन प्रक्षेत्राचे विस्तारीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून दरवर्षी फळांच्या रोपांची दरवर्षी वाढत असल्याने मालडोंगरी येथील बीज गुणन प्रक्षेत्राचे फळरोपवाटिकेत विस्तारीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याकरिता ९५ लाखांचा निधी मंजूर केला असून लवकरच पायाभूत कामांना सुरूवात होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील फळबाग लागवडीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार आहे.मालडोंगरी येथे सन १९६१ रोजी बीज गुणन प्रक्षेत्र स्थापन करण्यात आले. या प्रक्षेत्रात २० हेक्टर ४० आर जमीन आहे. यापैकी गोसेखुर्द प्रकल्पाखालील क्षेत्र ४ हेक्टर ३० आर आणि बांधकामाखाली ०.३० आर जमीन राखीव ठेवण्यात आली. उर्वरीत १५ हेक्टर ८० आर क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्यासाठी अनुकूलता आहे. सदर प्रेक्षत्रावर बारमाही सिंचनाची सुविधा असल्याने रोपवाटिका स्थापन करण्याला वाव आहे. हे प्रक्षेत्र नागभीड उपविभागात येते. मागील काही वर्षांपासून ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी आंबा. कागदी लिंबू, पेरु, जांभुळ, आवळा, डाळींब आदी प्रमुख पिकांच्या रोपांची मागणी करीत आहेत. शिवाय महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत फळबाग लागवडीकरिता कलमा रोपांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता निर्माण झाली. परंतु जिल्ह्यातील अन्य क्षेत्रात अशी भौगोलिक परिस्थिती नसल्याने रोपे मिळविण्यासाठी प्रशासनाला अन्य राज्यातील जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यस्थितीत मालडोंगरी येथील बीज गुणन प्रक्षेत्रावर आंब्याचे २४ मातृवृक्ष आहेत. या ठिकाणी कागदी लिंबू, पेरु, जांभुळ, आवळा, डाळींब आदी मातृवृक्षांची लागवड केल्यास शेतकऱ्यांनाही याचा लाभ होऊ शकतो. याच हेतूने मालडोंगरी येथील प्रक्षेत्राचे फळरोपवाटिकेत विस्तारीत करण्यात येणार आहे. रोपवाटिका निर्माण केल्यास वेगळी कर्मचारी पदे आणि प्रक्षेत्रावरील कोणत्याही घटकावर परिणाम होणार नाही. वित्तीय भार पडणार नाही. या प्रक्षेत्रावर रोपवाटिका तयार झाल्यानंतर परिसरातील शेतकºयांना कलमा रोपांची उपलब्धता होऊन फळबाग लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.शेतकऱ्यांना चालनाशेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी ही रोपवाटिका उपयुक्त ठरणार आहे. प्रक्षेत्रातील कलमे रोपे विक्रीपासून आर्थिक फायदा होईल. मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. एकूण उपलब्ध क्षेत्रापैकी १५.८० हे. क्षेत्रावर तालुका फळरोपवाटिका स्थापन करण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने राज्य शासनाकडे पाठविला होता. राज्य शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उच्च तंत्रज्ञानावर आधारीत फळरोपवाटिका स्थापन करण्यास मंजुरी प्रदान केली. प्रकल्पासाठी ९६ लाखांचा निधी तातडीने देण्याचा आदेश कृषी विभागाचे सहसचिव अशोक आत्राम जारी केला आहे.