शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

बारावीतील गुणवंताचा सत्कार

By admin | Updated: June 3, 2017 00:39 IST

बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम आलेली नुपूर धमगाये (९४.४६) टक्के, द्वितीय शुभम वराटकर (९४.३०) टक्के व तृतीय आलेली कांचन राजुरकर (९४.१५) टक्के यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

घरोघरी जाऊन केला सन्मान : देवराव भोंगळे यांची उपस्थितीलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम आलेली नुपूर धमगाये (९४.४६) टक्के, द्वितीय शुभम वराटकर (९४.३०) टक्के व तृतीय आलेली कांचन राजुरकर (९४.१५) टक्के यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. या सत्काराचे आयोजन जिल्हा परिषद, महानगरपालिका व शिक्षण विभागामार्फत शिक्षक भारती संघटनेच्यावतीने गुरुवारी करण्यात आले.जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महानगरपालिका अध्यक्ष अंजली घोटेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णा सहारे, मनपाचे स्थायी समितीचे सभापती राहूल पावडे, जि.प. महिला बाल कल्याण सभापती अर्चना जीवतोडे, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, स्मिता ठाकरे, रमेश पायपरे, मनोज पावडे, राजू साखरकर, यांनी गुणवंतांच्या घरोघरी जावून पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व पेढा भरवून सत्कार केला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाच्या जडणघडणीत शिक्षकांसह पालकांचेही महत्त्वपूर्ण योगदान असते. पालकांचे योगदान ध्येयपूर्ती साधण्यासाठी मोलाची भूमिका बजावते. गुणवंतांनी जिल्ह्याची मान उंचावली आहे. यासाठी त्यांनी अभ्यासातील सातत्य, चिकाटीने बाळगलेले ध्येय, ध्येयाला साध्य करण्यासाठी घेतलेले परिश्रम कारणीभूत असून यशोशिखर गाठण्यास मदत करणारे ठरले आहे. उद्याचे भवितव्य त्यांच्या यशातून प्रगल्भ होणार असून गुणवंतांची प्रेरणा अन्य विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे यांनी केले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.