शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

पत्रकारितेच्या क्षेत्रातील सेवाव्रतींचा सत्कार

By admin | Updated: August 3, 2015 00:45 IST

पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणारे, प्रदीर्घ सेवा देणारे, समाजाचे प्रतिबिंब टिपणारे, ...

मान्यवरांची उपस्थिती : कर्मवीर स्पर्धा पुरस्काराचे वितरणचंद्रपूर : पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणारे, प्रदीर्घ सेवा देणारे, समाजाचे प्रतिबिंब टिपणारे, अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या सत्यनारायण तिवारी व पद्माकर पांढरे या ज्येष्ठ पत्रकारांचा कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करून शनिवारला भावपूर्ण सत्कार करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मान राशी असे या पुरस्काराचे स्वरूप होते. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक पत्रकार संघाच्या सभागृहात माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कर्मवीर स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ज्येष्ठ पत्रकारांसह स्व. छगनलाल खजांजी स्मृतिप्रीत्यर्थ शुभवार्ता, लोकसेवा व विकास प्रतिष्ठानचा मानवी अभिरूची कथा, इतिहास अभ्यासक अशोकसिंह ठाकूर प्रायोजित वृत्तछायाचित्र, ग्रामीण वार्ता आणि प्रोत्साहन पुरस्काराने वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रसायन, उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे अर्थ, नियोजन, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ पत्रकार राहूल भागवत नागपूर, विधितज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे, सत्कारमूर्ती सत्यनारायण तिवारी, पद्माकर पांढरे, प्रेस क्लबचे सचिव मंगेश खाटीक यांची उपस्थिती होती. संचालन आशिष अंबाडे यांनी केले. यावेळी नागरिक व पत्रकारांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)पत्रकारिता राजकारणाला मार्गदर्शक - अहीरलोकशाही प्रक्रियेला पत्रकारिता जिवंत ठेवण्याचे कार्य करते. त्याचे काम सीसीटीव्ही कॅमेरासारखे असते. लोकशाही व्यवस्थेतील लाभ व हानीचे प्रतिबिंब यातून उमटते. पत्रकारिता राजकारणाला मार्गदर्शन करणारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी व्यक्त केले. तत्पूर्वी त्यांचा सत्कार प्रमोद उंदीरवाडे यांनी केला.बातम्यातून राजकीय सुरूवात- मुनगंटीवारलोकशाहीचे चार स्तंभ आहेत. यात पत्रकारितेला अनन्य साधारण महत्त्व आहे. यात आज स्पर्धा निर्माण झाली आहे. पत्रकारिता समाजाचा आरसा म्हणून कार्य करीत आहे. वर्तमान पत्रातील बातम्यांमुळेच माझ्या राजकीय जीवनाची जडणघडण झाल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रसंगी व्यक्त केले.यांचा झाला सत्कार कर्मवीर पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ संपादक सत्यनारायण तिवारी व २० वर्षाच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सेवा देणारे पद्माकर पांढरे यांना सन्मानित करण्यात आले. स्व. छगनलाल खजांजी स्मृतिप्रीत्यर्थ शुभवार्ता पुरस्कार प्रशांत देवतळे, लोकसेवा व विकास प्रतिष्ठानचा मानवी अभिरूची कथा पुरस्कार रूपेश कोकावार, इतिहास अभ्यासक अशोकसिंह ठाकूर प्रायोजित वृत्तछायाचित्र पुरस्कार सचिन वाकडे मूल, ग्रामीण वार्ता पुरस्कार प्रथम अमर बुद्धावार, द्वितीय गोवरीचे लोकमत प्रतिनिधी प्रकाश काळे तर तृतीय पुरस्कार गुरुदास गुरनुले यांना देण्यात आला. प्रोत्साहन पुरस्काराचे मानकरी समीर निमगडे व विरेंद्र (बबलू) रॉय ठरले.