शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:50 IST

माना समाजाला न्यायालयाने आरक्षण दिले असून धनगर समाजालासुद्धा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत आहेत. गडचिरोली भाजप जिल्हा अध्यक्ष असताना मी आमदार कृष्णा गजभे व नुकतेच आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे यांना एबी फार्म देऊन निवडून आणले.

ठळक मुद्देअशोक नेते : राजकीय विरोधकांचा बदनाम करण्याचा डाव

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : माना समाजाला न्यायालयाने आरक्षण दिले असून धनगर समाजालासुद्धा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत आहेत. गडचिरोली भाजप जिल्हा अध्यक्ष असताना मी आमदार कृष्णा गजभे व नुकतेच आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे यांना एबी फार्म देऊन निवडून आणले. तसेच इतर विषयावरसुद्धा सरकार माना व धनगर समाजाच्या पाठीशी आहे. काही दिवसांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन राजकीय विरोधकांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. आपण माना समाज व धनगर समाज विरोधात नसल्याचे सांगत षडयंत्र रचणाºयांनी ठोस पुरावे द्यावे. माना व धनगर समाजाच्या नेत्यांना आवाहन करतो की कोणाच्या भूलथापांना बळी पडू नये. खोटी माहिती प्रसार माध्यमातून देणाºया त्या तथाकथित व्यक्ती विरुद्ध मानहानीचा दावा करून फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे खासदार अशोक नेते यांनी चिमूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.चिमूर-गडचिरोली क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्यावर केलेल्या आरोपाचे खंडन करण्यासाठी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेला स्वत: आ. किर्तीकुमार भांगडिया, वसंत वारजूकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ श्याम हटवादे, तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, उपस्थित होते.खासदार अशोक नेते म्हणाले, २१ जानेवारीला गडबोरी येथील कार्यक्रमात आदिवासी नेत्यांनी प्रास्तविकातून प्रश्न विचारला की माना व धनगर समाज आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करीत आहे. यावर आळा बसला पाहिजे. यावर बोलताना मी त्यांना सांगितले की माना समाजाचा विषय कोर्टात आहे. तर त्यांना कोर्टाने अधिकार दिले. त्यामुळे मी यावर काही करू शकत नाही. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठीचा विषय शासन दरबारी आहे व यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. त्यामुळे मी यावर काही बोलू शकत नाही, असे मी बोललो होतो. मात्र विरोधकांनी काही लोकांना हाताशी धरून मी जे बोललो नाही ते बदलवून समाज माध्यमातून खोटी माहिती पसरवली. हे मला बदनाम करण्याचे विरोधकांनी रचलेले हे षड्यंत्र आहे, खा. नेते यांनी यावेळी स्पष्ट केले.नेते यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सिंदेवाहीत मोर्चासिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी या गावात आदिवासी समाजाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी उद्घाटनप्रसंगी माना समाजाबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. याचा व्हिडीओ व्हॉटसअ‍ॅपवर वायरल झाला. याच्या निषेधार्थ तालुक्यातील माना समाजाने तहसील कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो महिला, पुरूष सहभागी झाले होते. सदर मोर्चा शिवाजी चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हरी बारेकर, ग्रामपंचायत सदस्य रवी सावकुडे, अमोल नागोसे, स्वप्नील श्रीरामे सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर विसर्जित करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी खा. अशोक नेते यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.