शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

कच्च्या मालाअभावी बल्लारपूर पेपर मिल बंद पडण्याची भीती

By admin | Updated: May 2, 2016 00:44 IST

सन १९५२ पासून सुरू झालेले बल्लारपूर पेपर मिल हे उद्योग, तेथे कागद निर्मितीकरिता लागणाऱ्या बांबूच्या कच्चा मालाच्या अभावी बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

नरेश पुगलिया यांचा आरोप : सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मजदूर सभेच्या साखळी उपोषणाला प्रारंभबल्लारपूर : सन १९५२ पासून सुरू झालेले बल्लारपूर पेपर मिल हे उद्योग, तेथे कागद निर्मितीकरिता लागणाऱ्या बांबूच्या कच्चा मालाच्या अभावी बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शासनाच्या वनविभागाने पेपर मिलला कच्चा माल मिळवून देऊन उद्योग बंद होण्याचे संकट टाळावे, या मागणीकरिता या पेपर मिल मधील मान्यताप्राप्त कामगार संघटना बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा आणि विदर्भ किसान काँग्रेस यांनी आज रविवार १ मपासून येथील नगर परिषद चौकात साखळी उपोषण आरंभिले आहे. या कामगार संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया हे आहेत. त्यांच्याच उपस्थितीत रविवारी ११ वाजता उपोषणावर वसंत मांढरे, रामदास वागदरकर, वीरेंद्र आर्य, टी सत्यनारायण हे कामगार प्रतिनिधी तर जिल्हा परिषद सदस्य तथा विदर्भ किसान काँग्रेसचे रामभाऊ टोंगे हे बसले आहेत.या उपोषणाबाबत यांनी नरेश पुगलिया यांनी सांगितले, पेपर मिलला आजवर शासन नियमाप्रमाणे वनविभागाकडून आवश्यक तेवढा बांबू मिळत आला आहे. चार वर्षापूर्वीपर्यंत सारे सुरळीत होते. नेहमीप्रमाणे २०१५-१६ या वर्षाच्या बांबू मागणीकरिता शासनाने निविदा मागविल्या. पण, फक्त एकाच पार्टीकडून फार्म आला. या सबबीखाली यावर वनविभागाने कोणताच निर्णय घेतला नाही. तो अडवून ठेवला आहे. वनविभागाकडून पेपर मिलला मागील ५० वर्षांपासून दरवर्षी दीड लाख टन बांबू मिळत आलेला आहे. परंतु, वनविभाग आणि शासन यांच्या नवीन प्रणाली व अडेलतट्टू धोरणामुळे दोन वर्षांपासून या मोठ्या उद्योगाला बांबू मिळणे कठीण झाले आहे. परिणामी उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार हेच वनमंत्री आहेत. खरे तर त्यांनी आपल्या जिल्ह्यातील उद्योग म्हणून त्यांनी याकडे जिव्हाळ्याने बघायला हवे. मात्र, तेच याकडे जाणून दुर्लक्ष करीत आहेत. या उद्योगावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १० हजार कुटुंब अवलंबून आहेत, याचा विचार त्यांनी करायला हवा, असा आरोप करीत त्यांचे या समस्येकडे लक्ष वेधले. कच्चा माल न मिळाल्यास उद्योग बंद होण्याची पाळी येऊ शकते. यास्तव शासनाने गंभीर दखल घेऊन कच्चा माल ‘बांबू’ मिळण्याचा मार्ग मोकळा करावा. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करावे लागेल, असा इशारा शासनाला दिला. या उपोषणादरम्यान वनविभागाकडून सकारात्मक हालचाली न झाल्यास २ हजार कामगारांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटू आणि वेळ पडल्यास न्यायालयाचे दार ठोठावू असा निर्धार पुगलिया यांनी व्यक्त केला. या पत्रपरिषदेत घनश्याम मुलचंदानी, नगराध्यक्षा छाया मडावी, टी. पदमाराव, नासीरखान, दिलीप माकोडे, रणजीतसिंग अरोरा, देवेंद्र आर्य, अविनाश ठावरी, माजी नगराध्यक्षा रजनी मुलचंदानी, अ‍ॅड. हरीश गेडाम आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)कच्चा माल ही समस्या मुख्य व्यवस्थापनाची आहे. ते आपल्या या साखळी उपोषण व मागणीच्या पाठीशी आहे काय, या प्रश्नावर पुगलिया म्हणाले, व्यवस्थापन गप्प बसले आहे. याचेच आश्चर्य वाटते. ते हा उद्योग बाहेरही हलवू शकतात. तशी पाळी येऊ नये याकरिताच आमचा कच्चा माल बांबू मिळावा याकरिता हा संघर्ष आहे. पुगलिया म्हणाले, पेसा हा कायदा अस्तित्वात आला व या उद्योगाला मिळणारा बांबु मिळण्याला अडचणी येऊ लागल्या. केंद्र व राज्य सरकार मेक इन इंडियाची बढाई मारत आहे. तर दुसरीकडे देशातील व राज्यातील चालू उद्योग बंद होत आहे. उद्योगांना कच्चा माल पुरविण्याची जबाबदारी शासनाची आहे. पण, तेच त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असल्याचा आरोपही माजी खासदार नरेश पुगलिया यांनी या पत्रकार परिषदेत केला.