शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळेचा विद्यार्थी बनला फौजदार

By admin | Updated: June 17, 2016 00:55 IST

अधिकारी बनण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणे गरजेचे आहे, या समजुतीतून अनेक पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत दाखल करतात.

पहिल्याच प्रयत्नात मिळविले यश : वर्धा येथे पीएसआय म्हणून रूजूराजकुमार चुनारकर खडसंगीअधिकारी बनण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणे गरजेचे आहे, या समजुतीतून अनेक पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत दाखल करतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या एकदम घसरली आहे. त्यामुळे अनेक मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. याला प्रकाराला चपराक देत जिल्हा परिषदेच्या खडसंगी येथील मराठी माध्यमाचे शिक्षण घेवून पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण करून अमोल सुधाकर कोल्हे याने मराठी शाळेतील विद्यार्थ्यापढे एक आदर्श निर्माण केला आहे. मराठी शाळेत शिकुनही मोठ्या पदावर जाता येते, हे त्याने सिद्ध करून दाखविले आहे.मुळचे ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील असलेले सुधाकर कोल्हे खडसंगी येथे आपल्या मामाजीच्या साह्याने खडसंगी येथे आलेत. वनविभागात काही दिवस काम करीत खडसंगीलाच त्यांनी आपली कर्मभूमी केली. खडसंगी मध्येच सुधाकर यांचा संसार वेलीवर आला. त्यांना दोन मुले व दोन मुली जन्माला आल्या. वनविभागात तुटपुंज्या मजुरीवर काम करून आपल्या परिवाराचे पालण पोषण करण्यास सुधाकर कोल्हे यांना मोठी कसरत करावी लागत होती. सर्वसामान्य परिस्थिती असल्याने चारही मुलाचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच केले. त्यापैकी त्यांची मोठी मुलगी ही एम.ए. बी.एड. झाली. त्यामुळे सुधाकर कोल्हे यांच्या परिवारात शिक्षणाचे वातावरण असल्याने सर्वच मुलं शिक्षणात हुशार होते. मात्र परिस्थितीमुळे त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकविता आले नसल्याचे शल्य सुधाकर कोल्हे यांना होते. मात्र अमोलच्या या यशाने ते काही प्रमाणात समाधानी असल्याने त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होते.अमोलने चवथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडसंगी येथे पूर्ण केले. तर अकरावीपासून आनंदवन वरोरा येथे नंतर शिक्षक बनण्याच्या दृष्टीने डी.एड. केले. मात्र डोनेशनसाठी पैसे नसल्याने शिक्षक बनण्याचे स्वप्न दूर ठेवत आता आपण एक चांगला अधिकारी बनावा, असा निश्चित करत अमोलने पुणे येथे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. अखेर अमोलला पहिल्याच प्रयत्नात यश आले. पी.एस.आय. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अमोल प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकादमीत दाखल झाला. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नुकतेच ११३ व्या तुकडीची आटपरेड मुख्यमंत्री फडणवीस याच्या उपस्थितीत पार पडली. प्रशिक्षण यशस्वी करीत अमोलची पहिली नियुक्ती वर्धा येथे करण्यात आली.आपल्या मुलाला खाकी वर्दीतील अधिकाऱ्याच्या वेशात बघुन अमोलच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मनामध्ये जिद्द असल्याने वडील वनमजूर म्हणून वनविभागात तुटपुंज्या वेतनावर नोकरी करीत परिवाराचा गाढा चालवित होते. अमोलला पाहिजे तेवढे शैक्षणिक चांगले वातावरण नव्हते तरी मिळेल त्या साधनांच्या आधारे अमोलने खडसंगी सारख्या गावात यश मिळविल्याने खडसंगीचे नावही रोषण केले आहे. मराठी शाळेचा विद्यार्थीही ‘फौजदार’ बनू शकतो हे अमोल कोल्हे यांनी दाखवून देत येणाऱ्या पिढ्यासमोर आदर्श निर्माण केला आहे.