शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेणा उन्माद

By admin | Updated: January 13, 2015 22:55 IST

मकरसंक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प करतो अन् आनंदाची देवाण-घेवाण करतो. पण या सणाच्या नावाखाली पतंगबाजीच्या उन्मादाने अनेकांना

कलम ३०४ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही?चंद्रपूर : मकरसंक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प करतो अन् आनंदाची देवाण-घेवाण करतो. पण या सणाच्या नावाखाली पतंगबाजीच्या उन्मादाने अनेकांना जखमी व्हावे लागते. मोठ्या शहरात तर पतंगबाजीमुळे अनेकांचा मृत्यूही होतो. आपल्या संस्कृतीचा आनंद साजरा करताना दुसऱ्याचे नुकसान करणे हे कुठेही सांगितलेले नाही. पण तरीही पतंगबाज रस्त्यांवर, घराच्या छतांवर अक्षरश: धुमाकूळ घालतात. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी भावना सामाजिक कार्यकर्त्यांची आहे. पतंगबाजांचा हा उन्माद आणि मस्ती उतरविण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज आहे. तसेच त्यांना रस्त्यावर झोडपून काढण्यासाठी सामाजिक संघटनांच्या पुढाकाराची गरज आहे.प्रशासनाचा पुढाकार नाहीनायलॉन मांजाच्या धोका हा केवळ चंद्रपूर शहरापुरताच मर्यादित नसून ग्रामीण भागातीलही नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. लोकप्रतिनिधी व प्रशासनासोबतच सरकारने स्वत:हून यासंदर्भात ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्दैवाने असे होताना दिसून येत नाही. लोकप्रतिनिधी हे चारचाकीशिवाय प्रवासच करीत नसल्याने त्यांना या धोक्याची कल्पनादेखील येत नाही. एरवी लहानसहान प्रकरणांत मोठी आंदोलने करणाऱ्या नेत्यांना रस्त्यांवरील हा मृत्यूचा धोका दिसत नाही का, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.‘लोकमत’ची भूमिकामकरसंक्रांतीच्या दिवशी पतंगबाजीच्या नावावर जो उन्माद सुरू होतो तो चीड आणणारा असतोे. या पतंगबाजीमुळे जे जखमी होतात, त्यांचे झालेले नुकसान कोणीही भरून काढू शकत नाही. आमचा पतंग उडविण्याला विरोध नाही. पतंग उडवीत असताना नायलॉनचा मांजा, काचेचा चुरा वापरणे या गोष्टींना आमचा विरोध आहे. ‘लोकमत’ची हीच भूमिका आहे. हा उन्माद असणाऱ्यांना आमचा विरोध आहे आणि ही विकृती थांबविण्यासाठी सामाजिक संघटना व नागरिकांनी समोर येऊन पुढाकार घेण्याची गरज आहे. तरच अशा घटनांवर आळा घालता येऊ शकेल.दुचाकीस्वारांनो सावध राहापूर्वी घरांचे छत व मैदानांवरचा ‘ओ काट’ चा खेळ आता रस्त्यांवरही रंगतो. स्त्यावर आडव्या येणाऱ्या मांजाच्या रूपाने कोणत्याही क्षणी काळाची झडप वाहनचालकांवर बसू शकते. संक्रांतीच्या दिवशी याचे प्रत्यंतर नागरिकांना येते. शहरातील निरनिराळ्या भागात पतंगबाजीमुळे दुचाकीस्वारांनी वाहने हळू चालवावे. अनेक वाहनचालकांसमोर मांजामुळे अडचणी येणार आहे. विशेषत: तुकूम, बाबूपेठ, दुर्गापूर, बाजार वार्ड, आंध्रीया वॉर्ड, भानापेठ, भिवापूर,एकोरी वॉर्ड, पठाणपुरा, गंजवॉर्ड चंद्रपूर शहरातील या वॉर्डासह जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, मूल, ब्रह्मपुरी आदी शहरातील नागरिकांना मांजाचा फटका बसू शकतो.