शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
4
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
5
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
6
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
7
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
8
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
9
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
10
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
11
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
12
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
13
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
14
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
15
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?
16
एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट
17
कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
18
IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!
19
स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
20
"आम्हालाही अशा तंत्रज्ञानाची गरज," 'या' भारतीय अ‍ॅपचे फॅन झाले ब्रिटनचे पंतप्रधान

सौर कृषिपंपाद्वारे शेती होणार ओलीत

By admin | Updated: April 4, 2015 00:28 IST

दरवर्षी पडणारा कोरडा दुष्काळ व त्यामुळे होणारे शेत पिकांचे नुकसान यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.

शासन निर्णय : शेतकऱ्यांना मिळणार चालना चंद्रपूर : दरवर्षी पडणारा कोरडा दुष्काळ व त्यामुळे होणारे शेत पिकांचे नुकसान यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. सिंचन क्षेत्र वाढीस लागावे यासाठी सौर कृषीपंप उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सौर कृषीपंपाबाबत शासनास्तरावर पाठपुरावा सुरू होता. अखेर शासनाने राज्यभरात सौर कृषीपंप उभारण्याचा निर्णय घेतला. यावर्षी प्रायोगिक तत्वावर ७ हजार ५४० सौर कृषीपंप उभे करण्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. तसा आदेश राज्य शासनाने काढला आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीयस्तरावर १ लाख सौर कृषीपंपासाठी ४०० कोटीची तरतूद केली असून राज्यात या कृषीपंपासाठी केंद्र शासनाचे ३० टक्के अनुदानाप्रमाणे १३३ कोटी ५० लाख एवढे वित्तीय सहाय उपलब्ध होणार आहे. यात राज्य शासनाचे पाच टक्के आणि लाभार्थ्यांचे पाच टक्के वित्तीय सहाय राहणार आहेत. उर्वरीत ६० टक्के रक्कम कर्ज रुपाने राज्यशासन लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देणार आहे.या योजनेचा लाभ आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना प्राधान्याने दिला जाणार आहे. तसेच धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरींचा लाभ घेतलेले शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपारिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी, विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेल्या भागातील शेतकरी, महावितरणकडे पैसे भरुनही तांत्रिक अडचणींमुळे जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतजमिनीचे क्षेत्र पाच एकरपेक्षा अधिक असू नये व संबंधित शेतकऱ्याच्या विहिरीला सिंचनासाठी पुरेसे पाणी असणे गरजेचे असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)समिती करणार लाभार्थ्यांची निवडयोजनेच्या लाभार्थ्यांची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समिती करणार आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच कर्जाची परतफेड महावितरण कंपनीद्वारे टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहे. दुर्गम भागातील शेतकऱ्यांना फायदाया योजनेद्वारे तीन, पाच आणि साडेसात अश्वशक्तीच्या सौर कृषीपंप दिले जाणार आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आणि अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये ही योजना राबविली जाणार असून लाभार्थ्यांचा हिस्सा कमीत कमी ठेऊन उर्वरीत रकम वित्तिय संस्थेमार्फत कर्जाच्या स्वरूपात उभारण्यात येणार आहे.