शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषिपंपाद्वारे शेती होणार ओलीत

By admin | Updated: April 4, 2015 00:28 IST

दरवर्षी पडणारा कोरडा दुष्काळ व त्यामुळे होणारे शेत पिकांचे नुकसान यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.

शासन निर्णय : शेतकऱ्यांना मिळणार चालना चंद्रपूर : दरवर्षी पडणारा कोरडा दुष्काळ व त्यामुळे होणारे शेत पिकांचे नुकसान यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. सिंचन क्षेत्र वाढीस लागावे यासाठी सौर कृषीपंप उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सौर कृषीपंपाबाबत शासनास्तरावर पाठपुरावा सुरू होता. अखेर शासनाने राज्यभरात सौर कृषीपंप उभारण्याचा निर्णय घेतला. यावर्षी प्रायोगिक तत्वावर ७ हजार ५४० सौर कृषीपंप उभे करण्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. तसा आदेश राज्य शासनाने काढला आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीयस्तरावर १ लाख सौर कृषीपंपासाठी ४०० कोटीची तरतूद केली असून राज्यात या कृषीपंपासाठी केंद्र शासनाचे ३० टक्के अनुदानाप्रमाणे १३३ कोटी ५० लाख एवढे वित्तीय सहाय उपलब्ध होणार आहे. यात राज्य शासनाचे पाच टक्के आणि लाभार्थ्यांचे पाच टक्के वित्तीय सहाय राहणार आहेत. उर्वरीत ६० टक्के रक्कम कर्ज रुपाने राज्यशासन लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देणार आहे.या योजनेचा लाभ आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना प्राधान्याने दिला जाणार आहे. तसेच धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरींचा लाभ घेतलेले शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपारिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी, विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेल्या भागातील शेतकरी, महावितरणकडे पैसे भरुनही तांत्रिक अडचणींमुळे जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतजमिनीचे क्षेत्र पाच एकरपेक्षा अधिक असू नये व संबंधित शेतकऱ्याच्या विहिरीला सिंचनासाठी पुरेसे पाणी असणे गरजेचे असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)समिती करणार लाभार्थ्यांची निवडयोजनेच्या लाभार्थ्यांची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समिती करणार आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच कर्जाची परतफेड महावितरण कंपनीद्वारे टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहे. दुर्गम भागातील शेतकऱ्यांना फायदाया योजनेद्वारे तीन, पाच आणि साडेसात अश्वशक्तीच्या सौर कृषीपंप दिले जाणार आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आणि अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये ही योजना राबविली जाणार असून लाभार्थ्यांचा हिस्सा कमीत कमी ठेऊन उर्वरीत रकम वित्तिय संस्थेमार्फत कर्जाच्या स्वरूपात उभारण्यात येणार आहे.