शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिच्या ओव्हरबर्डनने होतोय शेतीचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:39 IST

वेकोलिने कोळसा उत्खननानंतर मातीचे ओव्हरबर्डन तयार केले. या ओव्हरबर्डनवर काटेरी झुडूपांनी अतिक्रमण केल्याने या ठिकाणी जंगली स्वापदांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे.

ठळक मुद्देशेतपिकांचे नुकसान : कोळसा खाणीलगतच्या शेतीची नासधूस

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : वेकोलिने कोळसा उत्खननानंतर मातीचे ओव्हरबर्डन तयार केले. या ओव्हरबर्डनवर काटेरी झुडूपांनी अतिक्रमण केल्याने या ठिकाणी जंगली स्वापदांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, कोळसा खाण परिसरातील शेतीची भरदिवसा नासधूस करण्यात येत आहे.अनेकदा मातीचे ढिगारे हटविण्याची मागणी शेतकºयांनी केली. मात्र वेकोलिच्या मुजोर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतातील फळधारणेवर आलेले उभे पीक उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे वेकोलिच्या ओव्हरबर्डनने शेतीची पूर्णत: वाट लागली आहे. वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाºया राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहेत. गोवरी, सास्ती, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी वेकोलिच्या कोळसा खाणींनी व्यापला आहे. वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत कोळसा उत्खननासाठी मातीचे महाकाय ढिगारे वेकोलिने परिसरात टाकले. मातीच्या ढिगाºयालगत शेती आहे.सध्या शेतपीक फळधारणेवर आले आहे. मातीच्या ढिगाºयावर वाढलेल्या काटेरी झुडुपात रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. या परिसरात शेडी प्राण्यांची संख्या मोठी आहे. वन्यप्राण्यांकडून शेतकºयांच्या डोळ्यादेखत पिकांची नासधूस करण्यात येत आहे. दिवस-रात्र काबाडकष्ट करून मोठ्या मेहनतीने शेतकºयांनी उभे केलेले पीक क्षणार्धात वन्यप्राणी उद्ध्वस्त करीत आहे. वेकोलिचे मातीचे ढिगारे आणि वन्यप्राणी हे दुहेरी संकट शेतकºयांवर आहे. अस्मानी आणि सुल्तानी संकटाचा फ टका नेहमीच शेतकºयांना बसत आला आहे.शेतकºयांसाठी संकटांची मालिकाच सुरू असून यातून शेतकºयांची सुटका होणे मोठे कठीण झाले आहे. उसनवारी व कर्ज काढून शेतकºयांनी पिकांची जोपासना करायची व वन्यप्राण्यांनी पीक उध्वस्त करायचे, यात शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.शेतकरी वेकोलि आणि वनविभागाच्या कचाट्यातवेकोलि मातीचे ढिगारे हटवत नाही आणि वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करीत नाही. खरे तर वन्यप्राणयांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. परंतु, वनविभागाचे कर्तव्यदक्ष समजले जाणारे अधिकारी करतात तरी काय ? हा प्रश्नच आहे. त्यामुळे वेकोलि व वनविभागाच्या कचाट्यात शेतकरी सापडला आहे.