शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

शेतीही गेली अन् मोबदला नाही

By admin | Updated: May 22, 2016 00:31 IST

लघु सिंचन विभागाच्या तलावासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरीत करुन घेतल्या कामही सुरू झाले.

आता जगायचे कसे : लघुसिंचन विभागाने केले शेतकऱ्यांना भूमिहीन जिवती : लघु सिंचन विभागाच्या तलावासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरीत करुन घेतल्या कामही सुरू झाले. जोमात काम सुरू असतानाच महसूल विभागाने आडकाठी टाकल्याने सिंचन तलावाचे काम तर बंद पडलेच. पण तलावासाठी जमिनी हस्तांतरित करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने मोबदलाही दिला नाही. उलट होती तेवढी शेती खोदून टाकली. परिणामी शेतकरी अडचणीत आला आहे. ना शेती, ना मोबदला. त्यामुळे आता जगायचे कसे, असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. सिंचन तलावासाठी शेती हस्तांतरीत करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहे. त्यांचं जगण केवळ शेतीच्या आधारावर आहे. होती तेवढी शेती तलावासाठी घेतली. जगण्याचा आधार हिरावून तर घेतलाच. पण १५ दिवसांत इस्टीमेट तयार करुन मोबदला देण्याचे आश्वासनही दिले. मागील वर्षीही शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. यावर्षीही करता येणार नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. जिवतीसह परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल. शेतीच्या बदल्यात मोबदला मिळेल व थोड्याफार शेतीत सिंचनाची व्यवस्था करता येईल, या आशेवर शेती हस्तांतरित करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. अनेकदा शेतीच्या मोबदल्या संदर्भात शेतकऱ्यांनी लघु सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, काम होईल. थोडा वेळ लागेल. काही दिवस पुन्हा थांबा, अशीच उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. गेल्या महिनाभरापासून सिंचन तलावाचे काम बंद पडल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या चिंता वाढली आहे. संबंधित अधिकारी कामावर येत नाहीत. मोबदला मिळाला नसल्याने जगण्याचा आधारही लघु सिंचन विभागाच्या तलावाने हिरावला आहे. आज शेतकरी पूर्णत: भूमिहिन झाला असून शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित बाबीकडे लघुसिंचाई विभागाने तातडीने लक्ष देवून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शासनाच्या अशा धोरणामुळेच शेतकरी देशोधडीला लागल्याचा आरोप आता केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)