शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

शेतीही गेली अन् मोबदला नाही

By admin | Updated: May 22, 2016 00:31 IST

लघु सिंचन विभागाच्या तलावासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरीत करुन घेतल्या कामही सुरू झाले.

आता जगायचे कसे : लघुसिंचन विभागाने केले शेतकऱ्यांना भूमिहीन जिवती : लघु सिंचन विभागाच्या तलावासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरीत करुन घेतल्या कामही सुरू झाले. जोमात काम सुरू असतानाच महसूल विभागाने आडकाठी टाकल्याने सिंचन तलावाचे काम तर बंद पडलेच. पण तलावासाठी जमिनी हस्तांतरित करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने मोबदलाही दिला नाही. उलट होती तेवढी शेती खोदून टाकली. परिणामी शेतकरी अडचणीत आला आहे. ना शेती, ना मोबदला. त्यामुळे आता जगायचे कसे, असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. सिंचन तलावासाठी शेती हस्तांतरीत करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहे. त्यांचं जगण केवळ शेतीच्या आधारावर आहे. होती तेवढी शेती तलावासाठी घेतली. जगण्याचा आधार हिरावून तर घेतलाच. पण १५ दिवसांत इस्टीमेट तयार करुन मोबदला देण्याचे आश्वासनही दिले. मागील वर्षीही शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. यावर्षीही करता येणार नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. जिवतीसह परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल. शेतीच्या बदल्यात मोबदला मिळेल व थोड्याफार शेतीत सिंचनाची व्यवस्था करता येईल, या आशेवर शेती हस्तांतरित करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. अनेकदा शेतीच्या मोबदल्या संदर्भात शेतकऱ्यांनी लघु सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, काम होईल. थोडा वेळ लागेल. काही दिवस पुन्हा थांबा, अशीच उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. गेल्या महिनाभरापासून सिंचन तलावाचे काम बंद पडल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या चिंता वाढली आहे. संबंधित अधिकारी कामावर येत नाहीत. मोबदला मिळाला नसल्याने जगण्याचा आधारही लघु सिंचन विभागाच्या तलावाने हिरावला आहे. आज शेतकरी पूर्णत: भूमिहिन झाला असून शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित बाबीकडे लघुसिंचाई विभागाने तातडीने लक्ष देवून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शासनाच्या अशा धोरणामुळेच शेतकरी देशोधडीला लागल्याचा आरोप आता केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)