शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

शेती खर्च वाढला, मात्र उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:34 IST

सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत आहे. यामुळे शेती तोट्यात चालली असून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना खरिपासाठी खतांचा मोफत पुरवठा करण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देखतांच्या किंमती अवाक्याबाहेर। मोफत पुरवठा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत आहे. यामुळे शेती तोट्यात चालली असून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना खरिपासाठी खतांचा मोफत पुरवठा करण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत.केंद्र शासनाने गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांना दिले जाणारे अनुदान कमी करण्याचे धोरण अवलंबविल्यामुळे खत कंपन्याकडून खतांच्या किंमतीत वाढ होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खताच्या एका गोणीमागे सुमारे दीडशे ते दोनशे रुपये भाववाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. खरीप हंगामासाठी शेतकºयांनी आपल्या शेतीची मशागत सुरू केली. यंदातरी चांगला पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी खरीप हंगामाचे नियोजन करीत आहेत. दरवर्षी शेतकरी उन्हाळ्याच्या शेवटी खतांची निवड करुन त्याची खरेदी करतात. मात्र, यावर्षी खतांची भाववाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांनी अद्यापही खतांची खरेदी सुरू केलेली नाही.अशी आहे मागणीदुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकºयांना खरीप हंगामासाठी क्षेत्रनिहाय मोफत खत पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी खतांशिवाय पर्याय नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :agricultureशेती