शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्याऐवजी शेतकरीच करणार आता पीक नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 05:00 IST

ग्रामीण भागात एकाच तलाठ्याकडे दोन ते तीन साजांचा प्रभार असतो. त्यामुळे तलाठी कधी या साज्याला, तर कधी त्या साज्याला जायचे. त्यामुळे नोंदणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. बहुतेकदा पिकांमध्ये चुकासुद्धा व्हायच्या. परंतु, आता महसूल विभागाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ई-पीक पाहणी हे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाच शेतातील बांधावरून पीक नोंदणी करता येणार आहे.

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सात-बारावर पिकांची नोंदणी तलाठ्यांकडून करण्यात येत होती. मात्र यासाठी शेतकऱ्याला साजा कार्यालयाच्या खेटा माराव्या लागायच्या. त्यानंतरच तलाठी शेतात जायचे. त्यातही कधी कापूसऐवजी सोयाबीन, कधी धानाऐवजी गहू अशी चुकीच्या पिकांची नोंदणी करीत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून व्हायची. मात्र आता महसूल विभागाने डिजिटल तंत्राद्वारे नवे ई-पीक पाहणी ॲप तयार केले आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्याला स्वत:च्या पिकांची नोंदणी स्वत:च करता येणार आहे.  विशेष म्हणजे पिकांचा फोटोसुद्धा अपलोड करता येणार आहे. १५ ऑगस्टपासून हे ॲप शेतकऱ्यांना वापरता येणार आहे.शेतजमिनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंदणी करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या नोंदणी्च्या आधारावरच शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. पूर्वी ही नोंदणी तलाठ्यांकडून केली जायची. परंतु, ग्रामीण भागात एकाच तलाठ्याकडे दोन ते तीन साजांचा प्रभार असतो. त्यामुळे तलाठी कधी या साज्याला, तर कधी त्या साज्याला जायचे. त्यामुळे नोंदणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. बहुतेकदा पिकांमध्ये चुकासुद्धा व्हायच्या. परंतु, आता महसूल विभागाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ई-पीक पाहणी हे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाच शेतातील बांधावरून पीक नोंदणी करता येणार आहे. तसेच पीकांचे फोटोसुद्धा अपलोड करता येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सोईचे होणार आहे.

अशी करा पीक नोंदणीॲन्ड्राॅईड मोबाईलवरून क्यूआरकोड स्कॅन करून किंवा प्ले स्टोअरवरून पीक पाहणी ॲप डाऊनलोड करता येतो. त्यानंतर तेथे आपली वैयक्तिक माहिती भरून खातेदार म्हणून नोंदणी करायची. त्यानंतर मोबाईलवर आलेला चारअंकी क्रमांक भरावा. त्यानंतर पीक पेरणीची माहिती भरावी. पिकाचा फोटो अपलोड करावा. जेवढी पिके असतील त्या सर्वांची नोंदणी करावी. जर यामध्ये अडचण येत असल्यास तलाठी किंवा कृषी सहायकांशी संपर्क करावा. नोंदणीमध्ये पीक पेरणीनंतर दोन आठवड्यात वाढलेले पीक, पिकांची पूर्ण वाढलेली अवस्था, कापणी पूर्वीची अवस्था समाविष्ट करता येणार आहे. 

नुकसानभरपाई व पीकविमा मिळणे सोयीचेॲपद्वारे शेतकरी स्वत:च्या शेतातील पिकांची नोंदणी स्वत:च करणार आहे. त्यामुळे पिकांची अचूक नोंदणी होणार आहे. परिणामी नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानभरपाई आणि पीकविमा मिळणे सोपे होणार आहे.

इ पीक पाहणी हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. आधुनिक काळात शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची साथ देऊन सुलभ व अचूक सोयी पुरविण्याचा मानस आहे. इ पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांना स्वतःच आपल्या पिकाची अचूक माहिती भरता येणार आहे. हे ॲप वापरण्यास अत्यंत सोपे आहे. इ-पिकपाहणीमध्ये नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांना खातेनिहाय पिकांची नोंद, पीक कर्ज, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई आदी सुविधा सुलभरित्या मिळणार आहेत. सर्व शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड करून आपल्या पिकांची नोंद करावी.-परिक्षित पाटील, तहसीलदार, सावली

 

टॅग्स :agricultureशेती