शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वितरणात हयगय सहन करणार नाही

By admin | Updated: July 18, 2016 01:55 IST

गत दोन वर्षापासून सतत दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

हंसराज अहीर यांचे निर्देश : शेतकऱ्यांना तातडीने कर्ज वाटप करा चंद्रपूर : गत दोन वर्षापासून सतत दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. चालू खरीप हंगामात प्रत्येक शेतकऱ्याच्या कर्जाचे पुनर्गठन करून त्याला तातडीने पीक कर्ज पुरवठा करावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँक प्रतिनिधींच्या बैठकीत दिले. या बैठकीत राष्ट्रीयकृत बँकाच्या अधिकारी व प्रतिनिधींसोबत खरीप पीक कर्ज वाटपाबाबत चर्चा केली. जिल्ह्यात राज्य शासनाने आदेश देवूनही शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन न केल्यामुळे मोठ्या संख्येत शेतकरी कर्जापासून वंचीत राहिल्याचे दिसून येत आहे. बँकांच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकरी पीक कर्जापासून वंचीत राहत असल्याने यापुढे अशी स्थिती खपवून घेण्यात येणार नाही. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमधून तातडीने पीक कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी चर्चेत सहभागी होताना बँकांच्या अकार्यक्षमतेचा फटका शेतकऱ्यांना बसू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रसंगी बँक अधिकाऱ्यांवर कर्तव्यचुकारपणा केल्याबद्दल कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा दिला. केंद्र सरकारने पहिल्यांदाच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीला प्राथमिकता देण्याचे धोरण ठरविले असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. असे असतानाही बँकांमुळे कर्ज पुरवठा झाला नाही तर अशा शाखांमध्ये बहिष्कार घालण्याचे आवाहन करावे लागेल, अशी कठोर भूमिका ना. अहीर यांनी घेतली. बैठकीला आ. नाना श्यामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, आ. राजू तोडसाम, जि. प. सभापती देवराव भोंगळे, राहुल सराफ, राजू घरोटे, शेख जुम्मन रिझवी, बँकेचे अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)