शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वितरणात हयगय सहन करणार नाही

By admin | Updated: July 18, 2016 01:55 IST

गत दोन वर्षापासून सतत दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

हंसराज अहीर यांचे निर्देश : शेतकऱ्यांना तातडीने कर्ज वाटप करा चंद्रपूर : गत दोन वर्षापासून सतत दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. चालू खरीप हंगामात प्रत्येक शेतकऱ्याच्या कर्जाचे पुनर्गठन करून त्याला तातडीने पीक कर्ज पुरवठा करावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँक प्रतिनिधींच्या बैठकीत दिले. या बैठकीत राष्ट्रीयकृत बँकाच्या अधिकारी व प्रतिनिधींसोबत खरीप पीक कर्ज वाटपाबाबत चर्चा केली. जिल्ह्यात राज्य शासनाने आदेश देवूनही शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन न केल्यामुळे मोठ्या संख्येत शेतकरी कर्जापासून वंचीत राहिल्याचे दिसून येत आहे. बँकांच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकरी पीक कर्जापासून वंचीत राहत असल्याने यापुढे अशी स्थिती खपवून घेण्यात येणार नाही. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमधून तातडीने पीक कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी चर्चेत सहभागी होताना बँकांच्या अकार्यक्षमतेचा फटका शेतकऱ्यांना बसू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रसंगी बँक अधिकाऱ्यांवर कर्तव्यचुकारपणा केल्याबद्दल कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा दिला. केंद्र सरकारने पहिल्यांदाच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीला प्राथमिकता देण्याचे धोरण ठरविले असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. असे असतानाही बँकांमुळे कर्ज पुरवठा झाला नाही तर अशा शाखांमध्ये बहिष्कार घालण्याचे आवाहन करावे लागेल, अशी कठोर भूमिका ना. अहीर यांनी घेतली. बैठकीला आ. नाना श्यामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, आ. राजू तोडसाम, जि. प. सभापती देवराव भोंगळे, राहुल सराफ, राजू घरोटे, शेख जुम्मन रिझवी, बँकेचे अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)