शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

शेतकऱ्यांचे पांढरे सोने झाडांवरच !

By admin | Updated: December 21, 2014 22:55 IST

सध्या जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी कसाबसा कापूस जगविला, त्या शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूरच

वेचा परवडणार कसा ? : कापसाला भाव नाही अन् वेचणीचे भाव कडाडलेरवी जवळे - चंद्रपूरसध्या जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी कसाबसा कापूस जगविला, त्या शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूरच मिळेणासे झाले आहे. जे मजूर मिळतात, ते आठ ते दहा रुपये प्रति किलो मजुरी घेत आहेत. कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांना हा वेचणीचा दर परवडणारा नाही. त्यामुळे जिल्ह्यात बहुतांश गावातील कापूस झाडांवरच लोंबकळत असून कापूस उत्पादकांचा जीवही टांगणीला लागला आहे.मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांच्या माथ्यावर कर्ज लादून गेला आहे. या कर्जाच्या दडपणाखालीच यंदा पुन्हा शेतकऱ्यांनी कर्जाचे ओझे डोक्यावर ठेवत शेती केली. मात्र पावसाने दगा दिल्याने शेतकरी पुरता खचून गेला आहे. उत्पादनात प्रचंड घट येत असल्याचे दिसून येत असून शेतकऱ्यांचे खिशे आधीच फाटलेले आहेत. अशातच संपूर्ण जिल्ह्यातच मजुरीचे दर कडाडले आहेत. जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना, जिवती, चंद्रपूर, गोंडपिपरी हे कापसाचे तालुके आहेत. या तालुक्यात शेवटचा कापूस झाडांवर आहे. मात्र कापूस वेचणीसाठी काही ठिकाणी सहा ते आठ तर काही ठिकाणी आठ ते दहा रुपये प्रतिकिलोप्रमाणे मजुरी द्यावी लागत आहे. आधीच खिसे फाटले असल्यामुळे एवढी मोठी मजुरी लावून कापूस वेचायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. यावर्षी कापसाला तीन हजार ८०० रुपयापर्यंत भाव आहे. एकतर कापसाला भाव नाही आणि मजुरी महाग अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे. काही शेतकऱ्यांनी कापूस वेचला. मात्र आता कापसाला भाव येईल, या आशेने तो साठवणूक करून ठेवला आहे. मात्र ज्या मजुरांनी कापूस वेचला त्याची रक्कम देण्यासाठी कापूस कवडीमोल भावात विकल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. हा प्रकार लक्षात येताच बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस झाडावरच ठेवला आहे. शिवाय जो नगदी मजुरी देईल, त्याच्याकडेच जाणे मजूरवर्गही पसंत करीत आहेत. विशेष म्हणजे, बाहेर गावातून मजूर आणण्याकरिता आणि परत सोडण्याकरिता आॅटो, मिनीडोअर करावा लागतो. ही विवंचनादेखील शेतकऱ्यांपुढे आहे. १०० टक्के कापूस वेचायला झाल्याने मजुरांचीही सध्या कमतरता भासत आहे. याच संधीचा फायदा घेत मजुरांनीही मजुरीची दर वाढविल्याचे समजते. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांचे पांढरेसोने सध्यातरी झाडांवर टवटवित दिसत असले तरी शेतकऱ्यांचा चेहरा आताच कोमेजलेला दिसून येत आहे. काही दिवसात कापसाचे भाव शासनाने वाढविले नाही तर शेतकऱ्यांचा अखेरचा कापूसही शेतातच संपुष्टात येणार आहे.कापूस वेचणीचे यंत्र हवेदिवसेंदिवस मजुरीचे दर वाढत आहे. मात्र कापसाला प्रतिक्विंटल भाव वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी खचून गेला असून शेतीविषयक दृष्टिकोन बदलू लागला आहे. आता उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना कापूस वेचणीचे यंत्र उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी आहे.ंया गावात आहे झाडांवर कापूसवरोरा तालुक्यातील भेंडाळा, चारगाव, केमक, वरार, मोहबाळा, दहेगाव, चरूरखटी, मारडा, मजरा, चिनोरा, भद्रावती तालुक्यातील नंदोरी, धानोली, चरूर, पावना, डोंगरगाव, भटाळी, पान वडारा, टाकळी, कोंढा, मानगाव तोराणा, कोरपना तालुक्यातील गडचांदूर, नांदा, बिबी, आवारपूर, वनसडी, उपरवाही, लखमापूर, पालगाव, पिंपळगाव, धामणगाव, खिर्डी, वडगाव, इंजापूर, नोकारी, थुट्रा, कवठाळा, आसन, अंतरगाव, बोरी, नवेगाव, बाखर्डी, निमनी, गोंडपिपरी तालुक्यातील वढोली, खरारपेठ, धाबा, भंगराम तळोधी, लाठी, तोहोगाव, पोंभुर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे, भिवनी, बामणी, चंद्रपूर तालुक्यातील पांढरकवडा, वडा आदी गावातील शेतात मजुरांविना कापूस झाडांवरच लोंबकळत आहे.