शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

शेतकऱ्यांचे पांढरे सोने झाडांवरच !

By admin | Updated: December 21, 2014 22:55 IST

सध्या जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी कसाबसा कापूस जगविला, त्या शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूरच

वेचा परवडणार कसा ? : कापसाला भाव नाही अन् वेचणीचे भाव कडाडलेरवी जवळे - चंद्रपूरसध्या जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी कसाबसा कापूस जगविला, त्या शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूरच मिळेणासे झाले आहे. जे मजूर मिळतात, ते आठ ते दहा रुपये प्रति किलो मजुरी घेत आहेत. कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांना हा वेचणीचा दर परवडणारा नाही. त्यामुळे जिल्ह्यात बहुतांश गावातील कापूस झाडांवरच लोंबकळत असून कापूस उत्पादकांचा जीवही टांगणीला लागला आहे.मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांच्या माथ्यावर कर्ज लादून गेला आहे. या कर्जाच्या दडपणाखालीच यंदा पुन्हा शेतकऱ्यांनी कर्जाचे ओझे डोक्यावर ठेवत शेती केली. मात्र पावसाने दगा दिल्याने शेतकरी पुरता खचून गेला आहे. उत्पादनात प्रचंड घट येत असल्याचे दिसून येत असून शेतकऱ्यांचे खिशे आधीच फाटलेले आहेत. अशातच संपूर्ण जिल्ह्यातच मजुरीचे दर कडाडले आहेत. जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना, जिवती, चंद्रपूर, गोंडपिपरी हे कापसाचे तालुके आहेत. या तालुक्यात शेवटचा कापूस झाडांवर आहे. मात्र कापूस वेचणीसाठी काही ठिकाणी सहा ते आठ तर काही ठिकाणी आठ ते दहा रुपये प्रतिकिलोप्रमाणे मजुरी द्यावी लागत आहे. आधीच खिसे फाटले असल्यामुळे एवढी मोठी मजुरी लावून कापूस वेचायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. यावर्षी कापसाला तीन हजार ८०० रुपयापर्यंत भाव आहे. एकतर कापसाला भाव नाही आणि मजुरी महाग अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे. काही शेतकऱ्यांनी कापूस वेचला. मात्र आता कापसाला भाव येईल, या आशेने तो साठवणूक करून ठेवला आहे. मात्र ज्या मजुरांनी कापूस वेचला त्याची रक्कम देण्यासाठी कापूस कवडीमोल भावात विकल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. हा प्रकार लक्षात येताच बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस झाडावरच ठेवला आहे. शिवाय जो नगदी मजुरी देईल, त्याच्याकडेच जाणे मजूरवर्गही पसंत करीत आहेत. विशेष म्हणजे, बाहेर गावातून मजूर आणण्याकरिता आणि परत सोडण्याकरिता आॅटो, मिनीडोअर करावा लागतो. ही विवंचनादेखील शेतकऱ्यांपुढे आहे. १०० टक्के कापूस वेचायला झाल्याने मजुरांचीही सध्या कमतरता भासत आहे. याच संधीचा फायदा घेत मजुरांनीही मजुरीची दर वाढविल्याचे समजते. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांचे पांढरेसोने सध्यातरी झाडांवर टवटवित दिसत असले तरी शेतकऱ्यांचा चेहरा आताच कोमेजलेला दिसून येत आहे. काही दिवसात कापसाचे भाव शासनाने वाढविले नाही तर शेतकऱ्यांचा अखेरचा कापूसही शेतातच संपुष्टात येणार आहे.कापूस वेचणीचे यंत्र हवेदिवसेंदिवस मजुरीचे दर वाढत आहे. मात्र कापसाला प्रतिक्विंटल भाव वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी खचून गेला असून शेतीविषयक दृष्टिकोन बदलू लागला आहे. आता उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना कापूस वेचणीचे यंत्र उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी आहे.ंया गावात आहे झाडांवर कापूसवरोरा तालुक्यातील भेंडाळा, चारगाव, केमक, वरार, मोहबाळा, दहेगाव, चरूरखटी, मारडा, मजरा, चिनोरा, भद्रावती तालुक्यातील नंदोरी, धानोली, चरूर, पावना, डोंगरगाव, भटाळी, पान वडारा, टाकळी, कोंढा, मानगाव तोराणा, कोरपना तालुक्यातील गडचांदूर, नांदा, बिबी, आवारपूर, वनसडी, उपरवाही, लखमापूर, पालगाव, पिंपळगाव, धामणगाव, खिर्डी, वडगाव, इंजापूर, नोकारी, थुट्रा, कवठाळा, आसन, अंतरगाव, बोरी, नवेगाव, बाखर्डी, निमनी, गोंडपिपरी तालुक्यातील वढोली, खरारपेठ, धाबा, भंगराम तळोधी, लाठी, तोहोगाव, पोंभुर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे, भिवनी, बामणी, चंद्रपूर तालुक्यातील पांढरकवडा, वडा आदी गावातील शेतात मजुरांविना कापूस झाडांवरच लोंबकळत आहे.