शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

शेतकऱ्याचे पांढरे सोने मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:36 IST

शेतकऱ्यांवर कोणते संकट कधी येईल, याचा काही नेम नाही. चार-पाच दिवसांपूर्वी राजुरा तालुक्यातील धिडशी, मारडा, पेल्लोरा, चार्ली, निर्ली, वरोडा, कढोली परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला.

प्रकाश काळे।ऑनलाईन लोकमतगोवरी : शेतकऱ्यांवर कोणते संकट कधी येईल, याचा काही नेम नाही. चार-पाच दिवसांपूर्वी राजुरा तालुक्यातील धिडशी, मारडा, पेल्लोरा, चार्ली, निर्ली, वरोडा, कढोली परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला. यामुळे या भागातील शेतकºयांचे पांढरे सोने मातीमोल झाले आहे.शेतातील गहू, हरभरा, ज्वारी या रब्बीपिकांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला तर शेतकऱ्यांचे नगदी पिक समजले जाणारे कापूस वादळाच्या प्रचंड वेगाने झाडावरून उडाले. यावर्षी कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांअभावी कापसाची वेचणी करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा कापूस झाडावरच लोंबकळत राहिला. परिणामी कापूस झाडावरच उन्हाने सुकायला लागल्याचे चित्र परिसरात निर्माण झाले होते. कापूस वेचणीला मजूर नसल्याने शिवार कापसाचे पांढरे रान झाल्याचे सर्वत्र दिसत होते. अचानक वातावरणात बदल झाल्याने शेतकऱ्याची चांगलीच तारांबळ उडाली. शेतकरी आर्थिक सकटात सापडला असतानाच निसर्गाने शेतकऱ्यावर घाला घातला. अवकाळी वादळी पाऊस व गारपीटीने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. यावर्षी बोंडअळीने शेतकऱ्यांना खाल्यानंतर रब्बी पिकांनाही निसर्गाचा जबर तडाखा बसला. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास निसर्ग कोपल्याने हिरावून गेला आहे.दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची आता निसर्गानेही साथ सोडली आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी आज कुणीही उभे राहायला तयार नाही. सारी परिस्थितीच शेतकऱ्याच्या विरोधात उभी ठाकल्याने शेतकऱ्यांना आज कोणाचाही आधार उरला नाही.