शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

शेतकऱ्याचे पांढरे सोने मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:36 IST

शेतकऱ्यांवर कोणते संकट कधी येईल, याचा काही नेम नाही. चार-पाच दिवसांपूर्वी राजुरा तालुक्यातील धिडशी, मारडा, पेल्लोरा, चार्ली, निर्ली, वरोडा, कढोली परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला.

प्रकाश काळे।ऑनलाईन लोकमतगोवरी : शेतकऱ्यांवर कोणते संकट कधी येईल, याचा काही नेम नाही. चार-पाच दिवसांपूर्वी राजुरा तालुक्यातील धिडशी, मारडा, पेल्लोरा, चार्ली, निर्ली, वरोडा, कढोली परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला. यामुळे या भागातील शेतकºयांचे पांढरे सोने मातीमोल झाले आहे.शेतातील गहू, हरभरा, ज्वारी या रब्बीपिकांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला तर शेतकऱ्यांचे नगदी पिक समजले जाणारे कापूस वादळाच्या प्रचंड वेगाने झाडावरून उडाले. यावर्षी कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांअभावी कापसाची वेचणी करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा कापूस झाडावरच लोंबकळत राहिला. परिणामी कापूस झाडावरच उन्हाने सुकायला लागल्याचे चित्र परिसरात निर्माण झाले होते. कापूस वेचणीला मजूर नसल्याने शिवार कापसाचे पांढरे रान झाल्याचे सर्वत्र दिसत होते. अचानक वातावरणात बदल झाल्याने शेतकऱ्याची चांगलीच तारांबळ उडाली. शेतकरी आर्थिक सकटात सापडला असतानाच निसर्गाने शेतकऱ्यावर घाला घातला. अवकाळी वादळी पाऊस व गारपीटीने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. यावर्षी बोंडअळीने शेतकऱ्यांना खाल्यानंतर रब्बी पिकांनाही निसर्गाचा जबर तडाखा बसला. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास निसर्ग कोपल्याने हिरावून गेला आहे.दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची आता निसर्गानेही साथ सोडली आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी आज कुणीही उभे राहायला तयार नाही. सारी परिस्थितीच शेतकऱ्याच्या विरोधात उभी ठाकल्याने शेतकऱ्यांना आज कोणाचाही आधार उरला नाही.