शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविणार

By admin | Updated: December 24, 2014 22:57 IST

कृषीप्रधान देशात प्रत्येक राज्यातील शेतकरी जोपर्यंत सुखी होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या कल्याणकारी योजना राबवून शेवटच्या टोकावरील

हंसराज अहीर : प्रभाकर मामुलकर यांचा सत्कारराजुरा : कृषीप्रधान देशात प्रत्येक राज्यातील शेतकरी जोपर्यंत सुखी होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या कल्याणकारी योजना राबवून शेवटच्या टोकावरील शेतकऱ्याला समाधान प्राप्त करुन देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असे प्रतिपादन रसायन व खते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. राजुरा येथे आयोजित शेतकरी मेळावा, कृषी व तंत्र व्यवसाय प्रदर्शन व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. हंसराज अहीर होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, ज्युनिअर अमिताभ बच्चन, भाजपाचे विधानसभा प्रमुख खुशाब बोंडे, राजुरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुंडावार, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरुण मस्की, राजुरा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष बंडू माणूसमारे, गोंडी सिने अभिनेता रमेश आत्राम, प्राचार्य दौलतराव भोंगळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे उपाध्यक्ष श्रीधर गोडे, कार्याध्यक्ष मुर्लीधर धोटे, जाहेद हुसेन बियाबानी, दत्तात्रय येगीनवार, दिलीप नलगे, सतिश धोटे, माजी आमदार एकनाथ साळवे, रमजान अली, जिल्हा परिषद सभापती प्रा. संभा वरकड, देवराव भोंगळे, शांताराम चौखे, अनिल फुलझेले उपस्थित होते. यावेळी माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, सुमन मामुलकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. आर. डी. बारई लिखित पुस्तकाचे प्रकाशन, संमोहन तज्ज्ञ जि.प. सदस्य देवराव भोंगळे, जितेंद्र विरुटकर यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी सरला गादंगीवार, चंद्रशेखर मादनेलवार, सनोवर बेग, शामलाल राठोड, गिता चिंतुरवार, सोनी गड्डमवार, विजय कुळमेथे, राहुल भिडकर, अरुण कुमरे, आडकु कुमरे, जयतू कोडापे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तथा संस्थेच्या वतीने स्कूल बसचे विमोचन तथा माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांचेकडून स्वामी विवेकांनद अनाथ आश्रमाला २१ हजाराचा धनादेश प्रदान करण्यात आला. ह्युमन राईट कान्सील आॅफ इंडियाच्या वतीने ना. हंसराज अहीर यांचा लाडुतूला करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी केले. संचालन प्रा. बी. यू. बोर्डेवार यांनी केले. तर आभार बादल बेले यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)