शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविणार

By admin | Updated: December 24, 2014 22:57 IST

कृषीप्रधान देशात प्रत्येक राज्यातील शेतकरी जोपर्यंत सुखी होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या कल्याणकारी योजना राबवून शेवटच्या टोकावरील

हंसराज अहीर : प्रभाकर मामुलकर यांचा सत्कारराजुरा : कृषीप्रधान देशात प्रत्येक राज्यातील शेतकरी जोपर्यंत सुखी होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या कल्याणकारी योजना राबवून शेवटच्या टोकावरील शेतकऱ्याला समाधान प्राप्त करुन देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असे प्रतिपादन रसायन व खते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. राजुरा येथे आयोजित शेतकरी मेळावा, कृषी व तंत्र व्यवसाय प्रदर्शन व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. हंसराज अहीर होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, ज्युनिअर अमिताभ बच्चन, भाजपाचे विधानसभा प्रमुख खुशाब बोंडे, राजुरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुंडावार, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरुण मस्की, राजुरा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष बंडू माणूसमारे, गोंडी सिने अभिनेता रमेश आत्राम, प्राचार्य दौलतराव भोंगळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे उपाध्यक्ष श्रीधर गोडे, कार्याध्यक्ष मुर्लीधर धोटे, जाहेद हुसेन बियाबानी, दत्तात्रय येगीनवार, दिलीप नलगे, सतिश धोटे, माजी आमदार एकनाथ साळवे, रमजान अली, जिल्हा परिषद सभापती प्रा. संभा वरकड, देवराव भोंगळे, शांताराम चौखे, अनिल फुलझेले उपस्थित होते. यावेळी माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, सुमन मामुलकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. आर. डी. बारई लिखित पुस्तकाचे प्रकाशन, संमोहन तज्ज्ञ जि.प. सदस्य देवराव भोंगळे, जितेंद्र विरुटकर यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी सरला गादंगीवार, चंद्रशेखर मादनेलवार, सनोवर बेग, शामलाल राठोड, गिता चिंतुरवार, सोनी गड्डमवार, विजय कुळमेथे, राहुल भिडकर, अरुण कुमरे, आडकु कुमरे, जयतू कोडापे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तथा संस्थेच्या वतीने स्कूल बसचे विमोचन तथा माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांचेकडून स्वामी विवेकांनद अनाथ आश्रमाला २१ हजाराचा धनादेश प्रदान करण्यात आला. ह्युमन राईट कान्सील आॅफ इंडियाच्या वतीने ना. हंसराज अहीर यांचा लाडुतूला करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी केले. संचालन प्रा. बी. यू. बोर्डेवार यांनी केले. तर आभार बादल बेले यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)