शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसह सर्वांच्या नजरा लागल्या नभाकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2022 08:00 IST

Chandrapur News यावर्षी ८ तारखेला मृग नक्षत्राची सुरुवात झाली असतानाही अजूनही पेरणी योग्य पाऊस पडला नाही. तसेच पावसाच्या आगमनाची कोणतीही चाहूल दिसून येत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्देतप्त उन्हामुळे शेतीकामाचा खोळंबा तर उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त

दीपक साबने

चंद्रपूर : अतिदुर्गम आदिवासीबहुल अशी ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीवरच शेतकरी अवलंबून असल्याने पेरणीकरिता पावसाची सुरुवात होणारे नक्षत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मृग नक्षत्रातच दरवर्षी पेरणी केल्या जाते. परंतु यावर्षी ८ तारखेला मृग नक्षत्राची सुरुवात झाली असतानाही अजूनही पेरणी योग्य पाऊस पडला नाही. तसेच पावसाच्या आगमनाची कोणतीही चाहूल दिसून येत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

अजूनही जाणवत असलेल्या उन्हाच्या तीव्र उष्ण झळामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामाचा खोळंबा होऊन काम करणे त्रासदायक ठरत आहे. यामुळे वर्षभराच्या रोजीरोटीसाठी शेतात पेरणीकरिता शेतकऱ्यांना आणि उन्हाच्या उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी सर्वांच्याच नजरा पावसाच्या आगमनासाठी आकाशाकडे लागल्या आहेत.

पाऊस लांबणीवर गेल्यावर खरीप हंगामाच्या तयारीचा वेग मंदावणार आहे. या वर्षात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. असे असले तरी अद्याप शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणीयोग्य पाऊस बरसला नसल्याने शेतकऱ्यांनी तडजोड करून सावकारी कर्ज काढून पेरणीसाठी विविध प्रकारचे बी-बियाणे एकत्रित करून ठेवले आहे. वेळीच पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात महागडे बियाणे खरेदी केलेले आहे, त्याचे कर्जाचे डोंगर तर उभे राहणार नाही ना, अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. काही उर्वरित कामे शेतकरी करीत आहेत. परंतु उन्हाच्या प्रचंड झळा लागत असल्याने शेतीकामासाठी हे उष्ण तापमान अडथळा ठरत आहे.

पेरणीला होणार विलंब

पावसाचे पहिले रोहिणी नक्षत्र संपून आता चांगल्या पावसाचे समजले जाणारे मृग नक्षत्र सुरू होऊन दोन दिवसांचा कालावधी लोटला. तरी पण अद्याप तालुक्यातील शिवारात पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने नदी, नाले व बंधारे कोरडेच दिसत आहेत. शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढून पेरणीकरिता विविध वाण उपलब्ध करून ठेवले आहेत तर काहींची तडजोड सुरू आहे. प्रामुख्याने जिवती तालुक्यातील शेतकरी हे जास्त प्रमाणात कापूस, ज्वारी, सोयाबीन, तूर या पिकाची लागवड करीत असतात. वेळेत पेरणी झाली की पिकाची चांगल्या स्थितीत वाढ होत असते, असे शेतकरी वर्गांचे म्हणणे आहे. म्हणून सर्व शेतकरी वर्गाच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेती