शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

शेतकऱ्यांसह सर्वांच्या नजरा लागल्या नभाकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2022 08:00 IST

Chandrapur News यावर्षी ८ तारखेला मृग नक्षत्राची सुरुवात झाली असतानाही अजूनही पेरणी योग्य पाऊस पडला नाही. तसेच पावसाच्या आगमनाची कोणतीही चाहूल दिसून येत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्देतप्त उन्हामुळे शेतीकामाचा खोळंबा तर उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त

दीपक साबने

चंद्रपूर : अतिदुर्गम आदिवासीबहुल अशी ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीवरच शेतकरी अवलंबून असल्याने पेरणीकरिता पावसाची सुरुवात होणारे नक्षत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मृग नक्षत्रातच दरवर्षी पेरणी केल्या जाते. परंतु यावर्षी ८ तारखेला मृग नक्षत्राची सुरुवात झाली असतानाही अजूनही पेरणी योग्य पाऊस पडला नाही. तसेच पावसाच्या आगमनाची कोणतीही चाहूल दिसून येत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

अजूनही जाणवत असलेल्या उन्हाच्या तीव्र उष्ण झळामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामाचा खोळंबा होऊन काम करणे त्रासदायक ठरत आहे. यामुळे वर्षभराच्या रोजीरोटीसाठी शेतात पेरणीकरिता शेतकऱ्यांना आणि उन्हाच्या उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी सर्वांच्याच नजरा पावसाच्या आगमनासाठी आकाशाकडे लागल्या आहेत.

पाऊस लांबणीवर गेल्यावर खरीप हंगामाच्या तयारीचा वेग मंदावणार आहे. या वर्षात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. असे असले तरी अद्याप शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणीयोग्य पाऊस बरसला नसल्याने शेतकऱ्यांनी तडजोड करून सावकारी कर्ज काढून पेरणीसाठी विविध प्रकारचे बी-बियाणे एकत्रित करून ठेवले आहे. वेळीच पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात महागडे बियाणे खरेदी केलेले आहे, त्याचे कर्जाचे डोंगर तर उभे राहणार नाही ना, अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. काही उर्वरित कामे शेतकरी करीत आहेत. परंतु उन्हाच्या प्रचंड झळा लागत असल्याने शेतीकामासाठी हे उष्ण तापमान अडथळा ठरत आहे.

पेरणीला होणार विलंब

पावसाचे पहिले रोहिणी नक्षत्र संपून आता चांगल्या पावसाचे समजले जाणारे मृग नक्षत्र सुरू होऊन दोन दिवसांचा कालावधी लोटला. तरी पण अद्याप तालुक्यातील शिवारात पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने नदी, नाले व बंधारे कोरडेच दिसत आहेत. शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढून पेरणीकरिता विविध वाण उपलब्ध करून ठेवले आहेत तर काहींची तडजोड सुरू आहे. प्रामुख्याने जिवती तालुक्यातील शेतकरी हे जास्त प्रमाणात कापूस, ज्वारी, सोयाबीन, तूर या पिकाची लागवड करीत असतात. वेळेत पेरणी झाली की पिकाची चांगल्या स्थितीत वाढ होत असते, असे शेतकरी वर्गांचे म्हणणे आहे. म्हणून सर्व शेतकरी वर्गाच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेती