शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकर्‍यांचा कल शेणखताकडे

By admin | Updated: May 27, 2014 00:43 IST

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेती मशागतीला लागला आहे. शेतीची पोत सुधारण्यासाठी शेतात शेणखत टाकण्याकडे शेतकर्‍यांचा कल आहे.

चंद्रपूर : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेती मशागतीला लागला आहे. शेतीची पोत सुधारण्यासाठी शेतात शेणखत टाकण्याकडे शेतकर्‍यांचा कल आहे. मात्र शेणखत मिळत नसल्याने वाट्टेल ती किंमत मोजायला शेतकरी सध्या तयार आहे. विशेष म्हणजे, शराजवळच्या गावातून ग्रामीण भागातील शेतकरी मोठी किंमत मोजून शेणखत शेतात टाकत आहे. दिवसेंदिवस पशुधन झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे शेतीला आवश्यक असलेले शेणखत सध्या मिळणे कठीण झाले आहे. ज्या शेतकर्‍यांकडे जनावरांची संख्या जास्त आहे. त्याच्याकडे शेणखत आहे. मात्र ते आपल्या शेतात टाकण्यावर भर देत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे, मात्र जनावरांची संख्या कमी आहे, अशा शेतकर्‍यांची मोठी पंचाईत होत आहे. शेणखतावर पर्याय म्हणून काही दिवसांपासून रासायनिक खतांचा मारा शेतात केला जात आहे. यातून उत्पादन वाढत असले तरी, शेताचा पोत कमी होत आहे. रासायनिक खतांचे दुष्परिणाम होत असल्याने रासायनिक खताऐवजी शेणखत वापरण्याचा विचार केला तर शेतकर्‍यांच्या खिशाला कात्री लागत आहे. रासायनिक खतापासून शेतीला वाचविण्याचा निर्धार केलेल्या शेतकर्‍यांना आपल्या जवळचा पैसा आता शेणखतासाठी वापरावा लागत आहे. यांत्रिकीकरणाच्या युगात शेतकर्‍यांकडून पशुधनही कमी होऊ लागले. पूर्वी शासनाच्या कोणत्याही योजना नसतानाही शेतकरी शेतीसोबत पशुपालन करायचे. अनेक शेतकरी दुधाळू जनावरांसोबत भाकड जनावरेही पाळायचे. शासन भाकड जनावरे निरुपयोगी ठरवत असले तरी या जनावरांपासून मोठ्या प्रमाणात शेणखत मिळत होते. बदलत्या काळात संकरीत बियाणांसोबत जनावरांचीही फॅशन जन्माला आली. त्यामुळे उत्पन्न वाढत असताना पशुधन कमी झाले. शहराजवळील अनेक शेतकर्‍यांनी शेती करण्यापेक्षा गोपालन करणे सुरू केले आहे. दुग्धव्यवसायातून ते आर्थिक स्थिती बळकट करीत आहे. मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे गोधन असल्याने शेणखत मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. त्यामुळे हे व्यावसायिक ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेणखत विकत आहे. जो शेतकरी जास्त किंमत देतील त्याला शेणखत देत आहे. अशा परिस्थितीने शेतकरी चिंतेत असल्याचा दिसत आहे. काही शेतकरी वाट्टेल तेवढी किंमत देवून शेणखत करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. (नगर प्रतिनिधी)