शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सिंचन विभागाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना त्रास

By admin | Updated: October 26, 2014 22:38 IST

सिंचन विभाग चारगाव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ओलिताच्या अंतीम टप्प्यातील चंदनखेडा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे व दोषपूर्ण वितरण पद्धतीमुळे नाहक

आयुधनिर्माणी (भद्रावती : सिंचन विभाग चारगाव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ओलिताच्या अंतीम टप्प्यातील चंदनखेडा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे व दोषपूर्ण वितरण पद्धतीमुळे नाहक त्रास सोसावा लागत आहे. संबंधितांनी ओलिताकरिता सुरळीत पाणी पुरवठा न केल्यास धान उत्पादन संकटात सापडण्याची शक्यता शेतकरी बोलून दाखवित आहे.चारगाव प्रकल्पांतर्गत सिंचन होत असलेला आलिताचा अंतीम टप्पा म्हणजे चंदनखेडा परिसरातील शेती. या परिसराततील धान उत्पादक चारगाव धरणातून मिळणाऱ्या पाण्याद्वारे आपापल्या शेतीत ओलीत करुन शेतीत धानाचे उत्पादन घेतात. परंतु या प्रकल्पांतर्गत येणारा हा शेवटचा टप्पा असल्याने या भागात नेहमीच पाण्याच्या वितरणाबाबत तक्रारी असतात. सिंचन विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे व दोषपूर्ण वितरणपद्धतीमुळे धानाला वाजवी पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतीत पाणी मिळविण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये आपापसात भांडणतंटे होत असल्याचे बोलले जाते.असेही सांगण्यात येत आहे की केवळ अर्ध्या एकर शेतीत पाणी घेण्याकरिता शेतकऱ्यांना शेतातील कामे सोडून आठवडाभर नाहक त्रास भोेगावा लागतो. त्यामुळे या परिसरातील धानउत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. शेतकऱ्यांकडून अतिरिक्त आर्थिक लाभ मिळविण्याकरिता संबंधित विभागातील कर्मचारी अपुरा पाणी पुरवठा करीत असल्याचा आरोपही दबक्या आवाजात होत आहे. आर्थिक व्यवहारामुळेच अनेकांना हेतुपूरस्पर पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचे बोलले जात आहे. चंदनखेडा- मुधोली परिसरातील युवा कार्यकर्ते सुधीर मुडेवार, किशोर ठावरी आमदार बाळू धानोरकर यांना निवेदन देण्यात आले आहे. यात सिंचन विभागाने या कुचकामी व अकार्यक्षम पाणी पुरवठा यंत्रणेत बदल घडवून सर्व शेतकऱ्यांना आवश्यक पाणी पुरवठा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली आहे. नवनियुक्त आमदार य संबंधात काय भूमिका घेतात, याकडे धान उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)