शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

सिंचन विभागाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना त्रास

By admin | Updated: October 26, 2014 22:38 IST

सिंचन विभाग चारगाव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ओलिताच्या अंतीम टप्प्यातील चंदनखेडा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे व दोषपूर्ण वितरण पद्धतीमुळे नाहक

आयुधनिर्माणी (भद्रावती : सिंचन विभाग चारगाव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ओलिताच्या अंतीम टप्प्यातील चंदनखेडा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे व दोषपूर्ण वितरण पद्धतीमुळे नाहक त्रास सोसावा लागत आहे. संबंधितांनी ओलिताकरिता सुरळीत पाणी पुरवठा न केल्यास धान उत्पादन संकटात सापडण्याची शक्यता शेतकरी बोलून दाखवित आहे.चारगाव प्रकल्पांतर्गत सिंचन होत असलेला आलिताचा अंतीम टप्पा म्हणजे चंदनखेडा परिसरातील शेती. या परिसराततील धान उत्पादक चारगाव धरणातून मिळणाऱ्या पाण्याद्वारे आपापल्या शेतीत ओलीत करुन शेतीत धानाचे उत्पादन घेतात. परंतु या प्रकल्पांतर्गत येणारा हा शेवटचा टप्पा असल्याने या भागात नेहमीच पाण्याच्या वितरणाबाबत तक्रारी असतात. सिंचन विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे व दोषपूर्ण वितरणपद्धतीमुळे धानाला वाजवी पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतीत पाणी मिळविण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये आपापसात भांडणतंटे होत असल्याचे बोलले जाते.असेही सांगण्यात येत आहे की केवळ अर्ध्या एकर शेतीत पाणी घेण्याकरिता शेतकऱ्यांना शेतातील कामे सोडून आठवडाभर नाहक त्रास भोेगावा लागतो. त्यामुळे या परिसरातील धानउत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. शेतकऱ्यांकडून अतिरिक्त आर्थिक लाभ मिळविण्याकरिता संबंधित विभागातील कर्मचारी अपुरा पाणी पुरवठा करीत असल्याचा आरोपही दबक्या आवाजात होत आहे. आर्थिक व्यवहारामुळेच अनेकांना हेतुपूरस्पर पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचे बोलले जात आहे. चंदनखेडा- मुधोली परिसरातील युवा कार्यकर्ते सुधीर मुडेवार, किशोर ठावरी आमदार बाळू धानोरकर यांना निवेदन देण्यात आले आहे. यात सिंचन विभागाने या कुचकामी व अकार्यक्षम पाणी पुरवठा यंत्रणेत बदल घडवून सर्व शेतकऱ्यांना आवश्यक पाणी पुरवठा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली आहे. नवनियुक्त आमदार य संबंधात काय भूमिका घेतात, याकडे धान उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)