शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विभागाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना त्रास

By admin | Updated: October 26, 2014 22:38 IST

सिंचन विभाग चारगाव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ओलिताच्या अंतीम टप्प्यातील चंदनखेडा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे व दोषपूर्ण वितरण पद्धतीमुळे नाहक

आयुधनिर्माणी (भद्रावती : सिंचन विभाग चारगाव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ओलिताच्या अंतीम टप्प्यातील चंदनखेडा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे व दोषपूर्ण वितरण पद्धतीमुळे नाहक त्रास सोसावा लागत आहे. संबंधितांनी ओलिताकरिता सुरळीत पाणी पुरवठा न केल्यास धान उत्पादन संकटात सापडण्याची शक्यता शेतकरी बोलून दाखवित आहे.चारगाव प्रकल्पांतर्गत सिंचन होत असलेला आलिताचा अंतीम टप्पा म्हणजे चंदनखेडा परिसरातील शेती. या परिसराततील धान उत्पादक चारगाव धरणातून मिळणाऱ्या पाण्याद्वारे आपापल्या शेतीत ओलीत करुन शेतीत धानाचे उत्पादन घेतात. परंतु या प्रकल्पांतर्गत येणारा हा शेवटचा टप्पा असल्याने या भागात नेहमीच पाण्याच्या वितरणाबाबत तक्रारी असतात. सिंचन विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे व दोषपूर्ण वितरणपद्धतीमुळे धानाला वाजवी पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतीत पाणी मिळविण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये आपापसात भांडणतंटे होत असल्याचे बोलले जाते.असेही सांगण्यात येत आहे की केवळ अर्ध्या एकर शेतीत पाणी घेण्याकरिता शेतकऱ्यांना शेतातील कामे सोडून आठवडाभर नाहक त्रास भोेगावा लागतो. त्यामुळे या परिसरातील धानउत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. शेतकऱ्यांकडून अतिरिक्त आर्थिक लाभ मिळविण्याकरिता संबंधित विभागातील कर्मचारी अपुरा पाणी पुरवठा करीत असल्याचा आरोपही दबक्या आवाजात होत आहे. आर्थिक व्यवहारामुळेच अनेकांना हेतुपूरस्पर पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचे बोलले जात आहे. चंदनखेडा- मुधोली परिसरातील युवा कार्यकर्ते सुधीर मुडेवार, किशोर ठावरी आमदार बाळू धानोरकर यांना निवेदन देण्यात आले आहे. यात सिंचन विभागाने या कुचकामी व अकार्यक्षम पाणी पुरवठा यंत्रणेत बदल घडवून सर्व शेतकऱ्यांना आवश्यक पाणी पुरवठा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली आहे. नवनियुक्त आमदार य संबंधात काय भूमिका घेतात, याकडे धान उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)