शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

वेकोलिविरोधात शेतकरी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:52 IST

वेकालिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या कोळसा खाण परिसरातील नाला वळविण्यासाठी खाणीतून निघणाºया मातीचे ढिगारे उभे केले जात आहे. आधीच या ढिगाऱ्यामुळे वर्धा नदीला येणाऱ्या पुरामुळे सास्ती गावाला धोका निर्माण होत असतानाच ....

ऑनलाईन लोकमतसास्ती : वेकालिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या कोळसा खाण परिसरातील नाला वळविण्यासाठी खाणीतून निघणाºया मातीचे ढिगारे उभे केले जात आहे. आधीच या ढिगाऱ्यामुळे वर्धा नदीला येणाऱ्या पुरामुळे सास्ती गावाला धोका निर्माण होत असतानाच पुन्हा नाला वळविण्याने भविष्यात कृत्रिम पुरस्थिती निर्माण होऊन सास्ती गावासोबतच रामनगर, कोलगाव, मानोली व बाबापूर या गावांना मोठा फटका बसणार आहे. याची कल्पना आल्याने येथील शेतकऱ्यांनी नाला वळविण्याच्या व मातीचे ढिगारे उभे करण्याविरोधात शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटिका विजयालक्ष्मी रोंगे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.सास्ती खुल्या कोळसा खाणीतील माती उत्खनन केल्यानंतर ती टाकण्यासाठी वेकोलिने सास्ती गावाजवळ अधिग्रहीत केलेल्या जमिनीवर टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कामही सुरु केले. परंतु, या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे वर्धा नदीला येणाºया पुरात सास्ती गावातील अनेक घरात पाणी शिरत होते. आता सास्ती शेजारच्या मोठा नाला आपल्या सोईनुसार वळविण्याचे काम वेकोलिने हाती घेतले. त्यामुळे भविष्यात कृत्रीम पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सास्ती सोबतच रामनगर, कोलगाव, मानोली व बाबापूर या गावांना सुद्धा पुराचा धोका निर्माण होऊन परिसरातील शेती पाण्याखाली येवू शकते. यातून मोठे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहे.त्यामुळे शिवसेनेच्या विजयालक्ष्मी रोंगे यांनी नाला वळविण्याचे काम बंद करण्याबाबतचे निवेदन वेकोलि व जिल्हा प्रशासनाला दिले होते. परंतु यावर कोणताही तोडगा न निघाल्यामुळे गुरूवारी सकाळी ११ वाजता सास्ती चेकपोस्ट वरुन कार्य सुरु असण्याच्या ठिकाणापर्यंत शेतकऱ्यांनी मोर्चा काढला.याप्रसंगी शिवसेना राजुरा शहर प्रमुख आदित्य भाके, शिवसेना उपतालुका प्रमुख विनोद कावळे, प्रदीप रोगे, यशवंत लांडे, सतिश बोबडे, राहुल काळे, मोहन काळे, भास्कर चौधरी, रवींद्र बोबडे, प्रशांत भोंगळे, सोनु निब्रड, सचिन लांडे, रुपेश नक्षिणे, बबन लांडे, प्रकाश रोगे, ओम काळे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील शेतकरी व गावकरी उपस्थित होते. यावेळी वेकोलिच्या सास्ती खाणीचे व्यवस्थापन रविंद्र ठुणे व क्षेत्रीय नियोजन अधिकारी पुलय्या यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. येत्या १७ मार्चला वेकोलिच्या वरिष्ठांशी बैठकीचे आयोजन करुन शिष्टमंडळाच्या वतीने मांडलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.या बैठकीत तोडगा न निघाल्यास शिवसेनेच्या वतीने मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.