शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:41 IST

माणसाला जगण्याकरिता लागणाऱ्या गरजांपैकी एक वस्तू भाजीपाला. शेतकऱ्यांनी रसायनयुक्त खताचा वापर न करता सेंद्रिय शेतीकडे वळावे, रसायनयुक्त खतामुळे होणारे दुष्पपरिणाम आणि त्यातून होणारे आजार मानवाच्या जीवावर बेतले आहे. कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देसंजय धोटे : पांढरवाणी येथे सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : माणसाला जगण्याकरिता लागणाऱ्या गरजांपैकी एक वस्तू भाजीपाला. शेतकऱ्यांनी रसायनयुक्त खताचा वापर न करता सेंद्रिय शेतीकडे वळावे, रसायनयुक्त खतामुळे होणारे दुष्पपरिणाम आणि त्यातून होणारे आजार मानवाच्या जीवावर बेतले आहे. कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. पूर्वी सेंद्रिय शेतीकडे जास्त भर द्यायचे. पण आज याकडे दुर्लक्ष होत आहे. आज शेतकरी सर्वत्र रसायनयुक्त खते व औषधांचा वापर करीत असल्यामुळे याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत आहे. म्हणूनच शेतकºयांनी सेंद्रिय शेतीकडे ध्यान केंद्रित करून सेंद्रिय शेती करावी, असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केले.जिवती तालुक्यातील पांढरवाणी येथे आयोजित सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर व ग्रामस्वराज अभिमान यात्रेच्या समारंभाप्रसंगी ते बोलत होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य सेंद्रिय शेती गट, राणी दुर्गावती महिला मंडळ व समस्त गावकºयांच्या वतीने करण्यात आले होते.ग्रामस्वराज अभिमान यात्रेचे आयोजन ११ एप्रिल २०१८ ते ५ मे २०१८ यादरम्यान करण्यात आले होते. राज्य व केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यत पोहचवण्याकरिता हे अभियान राबविण्यात आले. महिला बचतगटाच्या माध्यमातून सरकारच्या योजनेचा लाभ कसा मिळेल. तसेच महिलांना चुलीपासून मुक्ती मिळण्याकरिता उज्ज्वला गॅस योजनेची माहिती प्रत्येक महिलांपर्यंत पोहचविणे, अदिवासी महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, यासाठी सदर अभियान राबविण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सरकारच्या विविध योजनेची माहिती दिली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे सभापती सुनील मडावी, भाजपा तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी, भाजपा तालुका महामंत्री सुरेश केंद्रे, नानाजी बिरादार, कर्णू दुर्गे, अनिता दुर्वे, भाजयुमो तालुका महामंत्री रवी बुरडकर, जागुराम दुर्गे, बालाजी भुते, श्यामराव गेडाम, गोपीनाथ चव्हाण, लक्ष्मण बिरादार, अंकुश येमले, संभा पेंदोर, माणिक पेंदोर, भीमराव जुमनाके,सोयाबाई बिरादरी यावेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी गावातील महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.