शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:41 IST

माणसाला जगण्याकरिता लागणाऱ्या गरजांपैकी एक वस्तू भाजीपाला. शेतकऱ्यांनी रसायनयुक्त खताचा वापर न करता सेंद्रिय शेतीकडे वळावे, रसायनयुक्त खतामुळे होणारे दुष्पपरिणाम आणि त्यातून होणारे आजार मानवाच्या जीवावर बेतले आहे. कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देसंजय धोटे : पांढरवाणी येथे सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : माणसाला जगण्याकरिता लागणाऱ्या गरजांपैकी एक वस्तू भाजीपाला. शेतकऱ्यांनी रसायनयुक्त खताचा वापर न करता सेंद्रिय शेतीकडे वळावे, रसायनयुक्त खतामुळे होणारे दुष्पपरिणाम आणि त्यातून होणारे आजार मानवाच्या जीवावर बेतले आहे. कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. पूर्वी सेंद्रिय शेतीकडे जास्त भर द्यायचे. पण आज याकडे दुर्लक्ष होत आहे. आज शेतकरी सर्वत्र रसायनयुक्त खते व औषधांचा वापर करीत असल्यामुळे याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत आहे. म्हणूनच शेतकºयांनी सेंद्रिय शेतीकडे ध्यान केंद्रित करून सेंद्रिय शेती करावी, असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केले.जिवती तालुक्यातील पांढरवाणी येथे आयोजित सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर व ग्रामस्वराज अभिमान यात्रेच्या समारंभाप्रसंगी ते बोलत होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य सेंद्रिय शेती गट, राणी दुर्गावती महिला मंडळ व समस्त गावकºयांच्या वतीने करण्यात आले होते.ग्रामस्वराज अभिमान यात्रेचे आयोजन ११ एप्रिल २०१८ ते ५ मे २०१८ यादरम्यान करण्यात आले होते. राज्य व केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यत पोहचवण्याकरिता हे अभियान राबविण्यात आले. महिला बचतगटाच्या माध्यमातून सरकारच्या योजनेचा लाभ कसा मिळेल. तसेच महिलांना चुलीपासून मुक्ती मिळण्याकरिता उज्ज्वला गॅस योजनेची माहिती प्रत्येक महिलांपर्यंत पोहचविणे, अदिवासी महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, यासाठी सदर अभियान राबविण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सरकारच्या विविध योजनेची माहिती दिली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे सभापती सुनील मडावी, भाजपा तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी, भाजपा तालुका महामंत्री सुरेश केंद्रे, नानाजी बिरादार, कर्णू दुर्गे, अनिता दुर्वे, भाजयुमो तालुका महामंत्री रवी बुरडकर, जागुराम दुर्गे, बालाजी भुते, श्यामराव गेडाम, गोपीनाथ चव्हाण, लक्ष्मण बिरादार, अंकुश येमले, संभा पेंदोर, माणिक पेंदोर, भीमराव जुमनाके,सोयाबाई बिरादरी यावेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी गावातील महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.