शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:45 IST

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे बरेच नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून विमा अर्ज व रक्कम भरलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी या काळामध्ये तातडीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी किंवा संबंधित पिक विमा कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील यांनी केले आहे.

ठळक मुद्देजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी : प्रधानमंत्री पीक विमा योजना नुकसानीसाठीही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे बरेच नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून विमा अर्ज व रक्कम भरलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी या काळामध्ये तातडीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी किंवा संबंधित पिक विमा कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील यांनी केले आहे.प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील खरीप हंगाम २०१८ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील मुद्दा क्रमांक १०.५ मधील जलमय झालेल्या क्षेत्रातील नुकसानीच्या तरतुदीनुसार विमा देय आहे. विमा संरक्षित क्षेत्र जलमय होऊन नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी पात्र ठरू शकतात. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जाहीर केल्या जाणाऱ्या नुकसानीच्या अधिसूचनेच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी विमा हप्ता रक्कम भरली आहे, किंवा ज्यांच्या खात्यातून विमा हप्ता रक्कम अदा करण्यात आलेली आहे, अशा शेतकरी बांधवांनी शासन निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही उदय पाटील यांनी केलेले आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील कृषी व महसूल यंत्रणेने सतर्कतेने या योजनेचा लाभ मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील व अन्य कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचाºयांनी घटना घडल्यापासून ४८ ताससांच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी किंवा विमा कंपनीचे जिल्हा व तालुकास्तरावरील प्रतिनिधी यांना देणे आवश्यक आहे. १८००२६६९७२५ टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांनी माहिती दिल्यास त्यांचा दावा ग्राह्य धरल्या जाऊ शकतो. यासाठी प्रयत्न करण्याबाबतही सतर्क राहण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व कृषी यंत्रणेला दिलेले आहेत.