शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:45 IST

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे बरेच नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून विमा अर्ज व रक्कम भरलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी या काळामध्ये तातडीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी किंवा संबंधित पिक विमा कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील यांनी केले आहे.

ठळक मुद्देजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी : प्रधानमंत्री पीक विमा योजना नुकसानीसाठीही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे बरेच नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून विमा अर्ज व रक्कम भरलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी या काळामध्ये तातडीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी किंवा संबंधित पिक विमा कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील यांनी केले आहे.प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील खरीप हंगाम २०१८ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील मुद्दा क्रमांक १०.५ मधील जलमय झालेल्या क्षेत्रातील नुकसानीच्या तरतुदीनुसार विमा देय आहे. विमा संरक्षित क्षेत्र जलमय होऊन नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी पात्र ठरू शकतात. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जाहीर केल्या जाणाऱ्या नुकसानीच्या अधिसूचनेच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी विमा हप्ता रक्कम भरली आहे, किंवा ज्यांच्या खात्यातून विमा हप्ता रक्कम अदा करण्यात आलेली आहे, अशा शेतकरी बांधवांनी शासन निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही उदय पाटील यांनी केलेले आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील कृषी व महसूल यंत्रणेने सतर्कतेने या योजनेचा लाभ मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील व अन्य कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचाºयांनी घटना घडल्यापासून ४८ ताससांच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी किंवा विमा कंपनीचे जिल्हा व तालुकास्तरावरील प्रतिनिधी यांना देणे आवश्यक आहे. १८००२६६९७२५ टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांनी माहिती दिल्यास त्यांचा दावा ग्राह्य धरल्या जाऊ शकतो. यासाठी प्रयत्न करण्याबाबतही सतर्क राहण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व कृषी यंत्रणेला दिलेले आहेत.