शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

रोहिणी नक्षत्र सुरू झाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल धुळ पेरणीकडे असतो. अती उष्णतेत धूळ पेरणी केल्याने बियाणे नष्ट होतात. शिवाय शेतजमीन ओली नसल्याने पाखराचे थवेही शेतजमिनीवरील बियाणे खाऊन फस्त करतात. अशावेळी दुबारपेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येते.

ठळक मुद्देशेतकरी सज्ज : जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगाम सुरू झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाच्या सरी पडत आहेत. मात्र अजुनही शेतजमिनीची दाहकता कमी झालेली नाही. जोपर्यंत शेतजमीन वितभर ओलीचिंब होणार नाही, तोपर्यंत शेतकºयांनी खरीपाची पेरणी करू नये, असे आवाहन शेती तज्ज्ञांनी केले आहे.रोहिणी नक्षत्र सुरू झाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल धुळ पेरणीकडे असतो. अती उष्णतेत धूळ पेरणी केल्याने बियाणे नष्ट होतात. शिवाय शेतजमीन ओली नसल्याने पाखराचे थवेही शेतजमिनीवरील बियाणे खाऊन फस्त करतात. अशावेळी दुबारपेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येते.महागडी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांवर अधिकचा भार सहन करावा लागतो. त्यामुळे मान्सुनच्या सरी येत असल्या तरी शेतजमीन वितभर ओलीचिंब झाल्याशिवाय खरीप हंगामातील पिकांच्या बियाण्याची पेरणी करू नये. विशेषत: कोरडवाहू शेतकºयांसाठी धूळ फेकणी धोक्याची घंटा ठरतात.चंद्रपूरची ओळख धान उत्पादक जिल्हा अशी असली तरी जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकेही घेतली जाते. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता यावर्षी शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळेल, असे मतही व्यक्त केले जात आहे.नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संतापचंद्रपूर : खरिप हंगाम सुरू झाला असून अद्यापही काही शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज मिळाले नाही. त्यामुळे या हंगामात बी-बियाणे, खते आणायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सध्या शेतकरी बियाण्याच्या तडजोडीकरिता धडपडत आहे. शेतीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होतात. मात्र, यावर्षी कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे जून महिना आला तरीही काही शेतकऱ्यांना पीककर्ज मिळालेले नाहीत. विशेष म्हणजे, दरवर्षी पीक कर्ज भरण्याची मुदत ३१ मार्च राहत. यावर्षी ३१ मे पर्यंत वाढवून देण्यात आली होती. यावर्षी कृषीकेंद्र संचालकही उधारीवर बी-बियाणे व खते द्यायच्या मनस्थितीत नाही. राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला गेला. मात्र सदर कर्ज माफी ही थकित शेतकऱ्यांसाठी असल्याने नियमित कर्ज भरणाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळत आहे.पावसाची शक्यतामागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मान्सूनची वाटचाल सुरू झाली असून हवामान खात्याने ५ जूनपर्यंत विदर्भात वादळी वाºयासह पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे. हा अंदाज खरा ठरतो की खोटा, याची खात्री करूनच खरीपाच्या पेरणीला प्राधान्य देणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढभाववाढीच्या प्रतीक्षेत साठवून ठेवलेला कापूस अद्यापही घरातच असताना रोहिणीच्या सरी बरसल्या आहे. त्यामुळे पेरणीची लगबग सुरू झाली आहे. कापूस घरात असतानाच शेतकऱ्यांना कपाशीची लागवड करावी लागत असल्याने आता घरातील कापूस सांभाळायचा की, शेतातील कपाशीची काळजी घ्यायची, या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. अशातच रोहिणी नक्षत्रातच पावसाच्या हजेरी लावल्याने काही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता भरपूर पाऊस पडू द्यावा. अनेकवेळा शेतकरी पेरणीसाठी घाई करतात. मान्सुनपूर्णपणे सक्रिय होण्यापूर्वीच पेरणी केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते.-उदय पाटीलजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती