शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा सुरू करावा

By admin | Updated: July 30, 2016 01:27 IST

देशातील गरिबी अजूनही दूर झाली नसून शेतक-यांनी आपले उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे.

हंसराज अहीर : बियाणे वाटप कार्यक्रमात केले आवाहन घोडपेठ : देशातील गरिबी अजूनही दूर झाली नसून शेतक-यांनी आपले उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. त्याकरिता शेतक-यांनी शेतीसोबतच ईतरही जोडधंदा सुरू करावा असे आवाहन केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे आयोजीत मोफत भाजीपाला बियाणे वाटप व विकासकामांचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ग्रामपंचायतीच्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी राज्याचे माजी पर्यावरण मंत्री संजय देवतळे, भाजपाचे जिल्हा महामंत्री विजय राऊत, भाजपा तालुकाध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, जि.प. सदस्य विजय वानखेडे, भद्रावती पं.स.च्या सभापती इंदूताई नन्नावरे, मुधोलीच्या सरपंच बेबी चवरे, कोंढेगावचे सरपंच राजू घोडमारे, भाजपा नेते अफजल भाई, तालुका महामंत्री रवी नागपुरे, मुधोली तंटामुक्त समितीचे अध्यक्ष केशवराव जांभुळे, भद्रावती शहर महामंत्री प्रशांत डाखरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी ना. अहीर म्हणाले की, आपल्याकडील शेतकऱ्यांनी मधमाशी पालन, रेशीम किडे उद्योग, दुग्धव्यवसाय यासारखे जोडधंदे करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारे प्रशिक्षण आम्ही देण्यासाठी तयार आहोत. शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हळद या पिकाला जगभर मागणी असून तालुक्यामध्ये हळदीचे उत्पादन वाढवण्याचे त्यांनी शेतक-यांना आवाहन केले. तसेच या परिसरातील सिंचन क्षेत्र दुप्पट केल्याशिवाय तुम्हाला मते मागण्यासाठी येणार नाही असेही ना. अहीर यांनी आवर्जून सांगीतले. (वार्ताहर)