शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा सुरू करावा

By admin | Updated: July 30, 2016 01:27 IST

देशातील गरिबी अजूनही दूर झाली नसून शेतक-यांनी आपले उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे.

हंसराज अहीर : बियाणे वाटप कार्यक्रमात केले आवाहन घोडपेठ : देशातील गरिबी अजूनही दूर झाली नसून शेतक-यांनी आपले उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. त्याकरिता शेतक-यांनी शेतीसोबतच ईतरही जोडधंदा सुरू करावा असे आवाहन केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे आयोजीत मोफत भाजीपाला बियाणे वाटप व विकासकामांचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ग्रामपंचायतीच्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी राज्याचे माजी पर्यावरण मंत्री संजय देवतळे, भाजपाचे जिल्हा महामंत्री विजय राऊत, भाजपा तालुकाध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, जि.प. सदस्य विजय वानखेडे, भद्रावती पं.स.च्या सभापती इंदूताई नन्नावरे, मुधोलीच्या सरपंच बेबी चवरे, कोंढेगावचे सरपंच राजू घोडमारे, भाजपा नेते अफजल भाई, तालुका महामंत्री रवी नागपुरे, मुधोली तंटामुक्त समितीचे अध्यक्ष केशवराव जांभुळे, भद्रावती शहर महामंत्री प्रशांत डाखरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी ना. अहीर म्हणाले की, आपल्याकडील शेतकऱ्यांनी मधमाशी पालन, रेशीम किडे उद्योग, दुग्धव्यवसाय यासारखे जोडधंदे करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारे प्रशिक्षण आम्ही देण्यासाठी तयार आहोत. शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हळद या पिकाला जगभर मागणी असून तालुक्यामध्ये हळदीचे उत्पादन वाढवण्याचे त्यांनी शेतक-यांना आवाहन केले. तसेच या परिसरातील सिंचन क्षेत्र दुप्पट केल्याशिवाय तुम्हाला मते मागण्यासाठी येणार नाही असेही ना. अहीर यांनी आवर्जून सांगीतले. (वार्ताहर)