शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

शेतकऱ्यांनी नवे विक्री कौशल्य स्वीकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:35 IST

अनंत यातना सहन करून एका दाण्यापासून हजारो दाणे पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या श्रमाविना मानवी जीवन कदापि समृद्ध होऊ शकत नाही. मात्र, अस्मानी आणि सूलतानी संकटांची टांगती तलवार शेतकऱ्यांच्या आयुष्यावर कायम असते.

ठळक मुद्देलोकमत मुलाखत

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतअनंत यातना सहन करून एका दाण्यापासून हजारो दाणे पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या श्रमाविना मानवी जीवन कदापि समृद्ध होऊ शकत नाही. मात्र, अस्मानी आणि सूलतानी संकटांची टांगती तलवार शेतकऱ्यांच्या आयुष्यावर कायम असते. या पार्श्वभूमीवर शेतमाल खरेदी-विक्री, खते, बियाणे तसेच पणन व प्रक्रिया करणाऱ्या संस्थात्मक बाजारपेठ आणि शेतकऱ्यांमध्ये सुसूत्रता जोपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. जिल्ह्यातील शेतमाल खरेदी संदर्भात जिल्हा मार्के टिंग अधिकारी संजय हजारे यांच्याशी साधलेला संवाद...महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची नेमकी जबाबदारी काय?महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा १९६० अंतर्गत राज्य सहकारी पणन महासंघाची स्थापना करण्यात आली. राज्यातील सहकारी पणन संस्थांची ही शिखर संस्था आहे. शेतकºयांनी शेतमाल उत्पादन केल्यानंतर खुल्या बाजारात फसवणूक होवू नये, शेतमाल व्यवस्था, खरेदी व विक्रीविषयी शेतकऱ्यांना जागृत केले जाते. शेतमाल वस्तु, बियाणे, रासायनिक खत खरेदी व विक्री करताना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून व्यावसायिक मूल्ये रुजविण्यासाठी जागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येते.धान, कापूस, सोयाबिन, अन्य कडधान्य खरेदी-विक्री व योजनेचे स्वरूप कसे आहे ?शेतकºयांना खुल्या बाजारात शेतमाल विकण्याची वेळ येवू नये आणि आधारभूत किंमतीचा लाभ घेता यावा, या हेतूने जिल्ह्यात १२ हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी खरेदी विक्री संस्था, जिल्हा कृषी औद्योगिक संघ, विविध कार्यकारी संस्थांच्या गोदामांची व्यवस्था उपलब्ध असून धान उत्पादक शेतकºयांनी यंदा खरेदीला उत्तम प्रतिसाद दिला. शेतमाल खरेदी केल्यानंतर संबंधित संस्थेला रक्कम दिली जात होती. यामध्ये मानवी हस्तक्षेप वाढण्याचा धोका होता. हा प्रकार पूर्णत: बंद झाला आहे. शेतकºयांच्या थेट बँक खात्यात रक्कम टाकली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांना बँक खाते क्रमांक, आयएफसी कोड अचूक नोंदवावा लागतो. शेतमालाची रक्कम अडवून ठेवण्याचा प्रकारच निकाली निघाला. खरेदीची प्रक्रिया अतिशय पारदर्शी झाली आहे.शेतमाल विक्रीपूर्वी आॅनलाईन नोंदणी सक्ती केल्याने शेतकऱ्यांनी पाठ फि रविली काय ?जिल्ह्यातील हमीभाव केंद्रांवर आॅनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. आधारभूत किमतीचा लाभ घ्यायचा असेल तर पिकपेरा, सातबारा आदींची गरज आहे. प्रारंभी तलाठ्यांकडून पिकपेरा मिळण्यास काही अडचणी पुढे आल्या होत्या. पण, महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून ही अडचण दूर करण्यात आली. साचेबद्ध चौकटीच्या पलिकडे जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेणे सुरू आहे. आॅनलाईन नोंदणीतील तांत्रिक समस्या दूर झाल्यात आहेत. त्यामुळे शेतकºयांनी पारंपरिक मानसिकता बदलवून नव्या व्यावसायिक विक्री कौशल्यांचा वापर केला पाहिजे. बहुमुखी बाजारातील बदलांची नोंद घेवून शासनाने अनेक सुधारणा केल्या. खरेदी-विक्री व देयक देण्याची प्रक्रियाही आता सुटसुटीत केली आहे.रासायनिक खत पुरवठ्याची स्थिती कशी काय ?जिल्ह्यात खताचा तुटवडा नाही. शेतकरी व सभासद संस्थांच्या मागणीनुसार खत पुरवठा करण्यात आला. विविध प्रकारच्या पिकांसाठी मूबलक खतसाठा आजही उपलब्ध आहे. खुल्या बाजारातून शेतकऱ्यांना आता खत विकत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. राज्य सहकारी पणन महासंघाच्या गोदामातून मागील हंगामापासून किरकोळ विक्री केंद्र सुरू करण्यात आले. कोणत्याही गावातील शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांच्या आधारावर रासायनिक खत विकत घेता येते. विविध पिके आणि खतांचे प्रमाण याबाबतही शेतकºयांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे कार्य सुरू आहे.- शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी आगामी योजना कोणत्या ?व्यापाऱ्यांच्या तावडीतून शेतकऱ्यांना मूक्त करण्यासाठी शेतमाल खरेदी केंद्रांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरली आहे. परंतु, शेतकरी या केंद्रांवरच मालाची विक्री करावी, यासाठी कृषी क्षेत्रासोबत सर्वच घटकांकडून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सर्वच तालुक्यांमध्ये विशेष मार्गदर्शन शिबिर बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे.