शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी धरली तेलंगणाची वाट

By admin | Updated: November 7, 2015 00:47 IST

दिवाळी सण तोंडावर आला असताना शेतकऱ्यांजवळ एक सदामही पैसा शिल्लक नाही.

प्रकाश काळे गोवरीदिवाळी सण तोंडावर आला असताना शेतकऱ्यांजवळ एक सदामही पैसा शिल्लक नाही. हाती असलेला सर्व पैसा खर्च झाल्याने शेतकऱ्यांचा खिसा रिकामा झाला आहे. कापूस वेचणाऱ्या मजुरांचे पैसे व इतर खर्च कसा करायचा, या विवंचनेत शेतकरी असताना खासगी व्यापाऱ्यांकडून पांढऱ्या सोन्याची अक्षरश: लूट केली जात आहे. मात्र परिस्थितीचा गुलाम झालेल्या शेतकऱ्यांना मनात इच्छा नसतांनाही कवडीमोल भावात कापूस विकावा लागत असून कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आता तेलंगणाची वाट धरली आहे.शासनाने पणन महासंघाच्या कापूस खरेदीचा शुभारंभ ५ नोव्हेंबरला करण्यात आला. चार हजार १०० रुपये हमी भावाने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात येत आहे. अगदी दिवाळीच्या तोंडावर शासनाने पणन महासंघातर्फे ही कापूस खरेदी सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश सरकारी कापूस संकलन केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना कापूस कवडीमोल भवात खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ असणे अपेक्षित होते. कापसाची बाजारपेठ व्हावी ही शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र कापूस पिकवूनही तो शेतकऱ्यांना परप्रांतात नेऊन विकावा लागत आहे. दिवाळी अगदी तोंडावर आली असताना पणती लावायलाही शेतकऱ्यांजवळ पैसे उरले नाही. महागाईचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत चालला. त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव वाढणे आवश्यक होते. यावर्षी कापसाचे दर वाढेल, अशी आस शेतकऱ्यांना होती. मात्र कापूस दरवाढीत कोणताही बदल झाला नाही. उलट कापसाची आवक पाहूण खासगी व्यापारी कापसाचे भाव पाडत आहे.तेलंगणा राज्यातील आदिलाबाद शहरात कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आदिलाबाद, बेला व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील खासगी कापूस बाजारपेठेला शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिल्याने याचा पुरेपूर फायदा खासगी व्यापारी घेत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर कापसाची आवक वाढल्याने खासगी व्यापाऱ्यांनी तीन हजार ७०० ते तीन हजार ८०० रुपयांपर्यंत कापसाचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. दररोज शेकडोहून अधिक मेटॅडोरने कापूस परप्रांतात विक्रीसाठी जात आहे. हा सारा आर्थिक ताण शेतकऱ्यांना परवडणारा नाही. मात्र हातावर आणून पानावर खाणाऱ्या कापूस वेचणी मजुरांना पैसे द्यायचे कुठून, इतर खर्च कसा करायचा, या विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना मनात इच्छा नसतानाही कापूस कवडीमोल भावात विकावा लागत आहे.शासनाच्या सरकारी कापूस संकलन केंद्राचा श्रीगणेशाच झाला नाही. त्यामुळे याचा सर्व फायदा खासगी कापूस व्यापाऱ्यांनी उचलला आहे. शेतकऱ्यांना कापूस विकावाच लागतो, ही खासगी व्यापाऱ्यांची पक्की धारणा झाली आहे. शासनाची शेतकऱ्यांना साथ नसल्याने व्यापाऱ्यांनी मनमानी सुरू केली केली आहे. शेतकऱ्यांची होत असलेली फरफट जबाबदार लोकप्रतिनिधींना का दिसत नाही, असा अनेकांना पडणारा प्रश्न काळजात घर करणारा आहे. मात्र शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.