शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी धरली तेलंगणाची वाट

By admin | Updated: November 7, 2015 00:47 IST

दिवाळी सण तोंडावर आला असताना शेतकऱ्यांजवळ एक सदामही पैसा शिल्लक नाही.

प्रकाश काळे गोवरीदिवाळी सण तोंडावर आला असताना शेतकऱ्यांजवळ एक सदामही पैसा शिल्लक नाही. हाती असलेला सर्व पैसा खर्च झाल्याने शेतकऱ्यांचा खिसा रिकामा झाला आहे. कापूस वेचणाऱ्या मजुरांचे पैसे व इतर खर्च कसा करायचा, या विवंचनेत शेतकरी असताना खासगी व्यापाऱ्यांकडून पांढऱ्या सोन्याची अक्षरश: लूट केली जात आहे. मात्र परिस्थितीचा गुलाम झालेल्या शेतकऱ्यांना मनात इच्छा नसतांनाही कवडीमोल भावात कापूस विकावा लागत असून कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आता तेलंगणाची वाट धरली आहे.शासनाने पणन महासंघाच्या कापूस खरेदीचा शुभारंभ ५ नोव्हेंबरला करण्यात आला. चार हजार १०० रुपये हमी भावाने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात येत आहे. अगदी दिवाळीच्या तोंडावर शासनाने पणन महासंघातर्फे ही कापूस खरेदी सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश सरकारी कापूस संकलन केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना कापूस कवडीमोल भवात खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ असणे अपेक्षित होते. कापसाची बाजारपेठ व्हावी ही शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र कापूस पिकवूनही तो शेतकऱ्यांना परप्रांतात नेऊन विकावा लागत आहे. दिवाळी अगदी तोंडावर आली असताना पणती लावायलाही शेतकऱ्यांजवळ पैसे उरले नाही. महागाईचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत चालला. त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव वाढणे आवश्यक होते. यावर्षी कापसाचे दर वाढेल, अशी आस शेतकऱ्यांना होती. मात्र कापूस दरवाढीत कोणताही बदल झाला नाही. उलट कापसाची आवक पाहूण खासगी व्यापारी कापसाचे भाव पाडत आहे.तेलंगणा राज्यातील आदिलाबाद शहरात कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आदिलाबाद, बेला व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील खासगी कापूस बाजारपेठेला शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिल्याने याचा पुरेपूर फायदा खासगी व्यापारी घेत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर कापसाची आवक वाढल्याने खासगी व्यापाऱ्यांनी तीन हजार ७०० ते तीन हजार ८०० रुपयांपर्यंत कापसाचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. दररोज शेकडोहून अधिक मेटॅडोरने कापूस परप्रांतात विक्रीसाठी जात आहे. हा सारा आर्थिक ताण शेतकऱ्यांना परवडणारा नाही. मात्र हातावर आणून पानावर खाणाऱ्या कापूस वेचणी मजुरांना पैसे द्यायचे कुठून, इतर खर्च कसा करायचा, या विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना मनात इच्छा नसतानाही कापूस कवडीमोल भावात विकावा लागत आहे.शासनाच्या सरकारी कापूस संकलन केंद्राचा श्रीगणेशाच झाला नाही. त्यामुळे याचा सर्व फायदा खासगी कापूस व्यापाऱ्यांनी उचलला आहे. शेतकऱ्यांना कापूस विकावाच लागतो, ही खासगी व्यापाऱ्यांची पक्की धारणा झाली आहे. शासनाची शेतकऱ्यांना साथ नसल्याने व्यापाऱ्यांनी मनमानी सुरू केली केली आहे. शेतकऱ्यांची होत असलेली फरफट जबाबदार लोकप्रतिनिधींना का दिसत नाही, असा अनेकांना पडणारा प्रश्न काळजात घर करणारा आहे. मात्र शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.