शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
5
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
6
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
7
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
8
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
9
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
10
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
11
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
12
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
13
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
14
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
15
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
16
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
17
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
18
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
19
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
20
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:27 IST

चंद्रपूर: सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यातच शेतीहंगाम जवळ येत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी मार्च महिन्यातच पीक ...

चंद्रपूर: सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यातच शेतीहंगाम जवळ येत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी मार्च महिन्यातच पीक कर्जाची रक्कम बँकेत जमा करून आता नवीन कर्ज घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. मात्र यासाठी शेतीचा सातबारा तसेच अन्य कागदपत्र लागत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सध्या कोरोनाची दहशत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा या कामामध्ये लागली आहे. दरम्यान, काही तलाठी त्यांच्याकडे असलेल्या गावात जात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा तसेच अन्य कागदपत्र घेण्यासाठी मुख्यालयी जावे लागत आहे. मात्र तिथेही ते भेटतीलच याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच अडचण होत आहे.

सध्या लॉकडाऊन असल्याने पाहिजे तशा वाहनांच्या सुविधाही नाही. त्यातच कोरोना संकट असल्यामुळे मुख्यालयी येणेही धोक्याचे ठरत आहे.

वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन तलाठ्यांना गावातच पाठवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.