शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

वनसडीच्या बँकेत शेतकऱ्यांची रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:06 IST

औद्योगिक व शेतीप्रधान तालुका म्हणून कोरपना तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील वनसडी येथे बँक आॅफ इंडियाची एकमेव शाखा आहे. येथील इंटरनेट लिंक तांत्रिक कारणासाठी शुक्रवारी दिवसभर बंद असल्याने शेतकरी ग्राहकांना कामधंदे सोडून ताटकळत रहावे लागले. बँक बंद होण्याची वेळ झाली असतानाही लिंक सुरू न झाल्याने आल्या पावली ग्राहकांना रिकाम्या हाताने घरी जावे लागले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देग्राहक रिकाम्या हाताने परतले : दिवसभर लिंक नसल्याने कामकाज ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : औद्योगिक व शेतीप्रधान तालुका म्हणून कोरपना तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील वनसडी येथे बँक आॅफ इंडियाची एकमेव शाखा आहे. येथील इंटरनेट लिंक तांत्रिक कारणासाठी शुक्रवारी दिवसभर बंद असल्याने शेतकरी ग्राहकांना कामधंदे सोडून ताटकळत रहावे लागले. बँक बंद होण्याची वेळ झाली असतानाही लिंक सुरू न झाल्याने आल्या पावली ग्राहकांना रिकाम्या हाताने घरी जावे लागले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.इंटरनेट लिंकवर सर्व बँकिंग व्यवहार अवलंबून आहे. संपूर्ण आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार लिंक नसल्याने ठप्प पडत आहे. दि. १५ ला सकाळी १०.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मोठ्या संख्येने ग्राहक या बँकेत पैसे काढण्यासाठी तसेच इतर कामांसाठी आले होते. मात्र दिवसभर वाट पाहूनही काहीेच फायदा झाला नाही. इंटरनेट लिंक संबंधात अनेकवेळा असाच प्रकार येथे घडत असल्याने ग्राहक या बँकेच्या व्यवहाराला त्रस्त झाले आहे. विशेष म्हणजे, बँकेतील एटीएमसेवाही बंद असल्याने पैसा काढायचे कुठून असा प्रश्न येथील ग्राहकांना पडला. या बँकेच एकच कॅश काऊंटर असल्याने अन्य दिवशीही ग्राहकांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. एकमेव बँक असल्याने ग्राहकांची संख्या मोठी आहे. मात्र त्या तुलनेत येथे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास बँक व्यवस्थापन कमी पडले आहे. यासंदर्भात ग्राहकांनी अनेकवेळा तक्रारही केल्या आहेत. मात्र उपयोग झाला नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे असून येथे कर्मचाऱ्यांचीही संख्या कमी आहे. त्यामुळे इतर दिवशीही ग्राहकांना कामाशिवाय वापस जावे लागते. त्यामुळे ग्राहक सकाळपासून या बँके परिसरात रांगेत उभे राहून आपला नंबर लावतात.गरिबांना फटकावनसाडी बँक आॅफ इंडिया कार्यक्षेत्रात अनेक अतिदुर्गम व आदिवासीबहुल गावे आहे. तेथील नागरिकांना ही एकमेव जवळची बँक आहे. परंतु येथे कामे लवकर होत नसल्याने त्याचा फटका गरीब शेतकºयांना बसत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लग्नकार्य तसेच इतर कामासाठी पैसे काढण्यासाठी ग्राहक येतात मात्र त्यांना निराश व्हावे लागत आहे.