शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वनसडीच्या बँकेत शेतकऱ्यांची रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:06 IST

औद्योगिक व शेतीप्रधान तालुका म्हणून कोरपना तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील वनसडी येथे बँक आॅफ इंडियाची एकमेव शाखा आहे. येथील इंटरनेट लिंक तांत्रिक कारणासाठी शुक्रवारी दिवसभर बंद असल्याने शेतकरी ग्राहकांना कामधंदे सोडून ताटकळत रहावे लागले. बँक बंद होण्याची वेळ झाली असतानाही लिंक सुरू न झाल्याने आल्या पावली ग्राहकांना रिकाम्या हाताने घरी जावे लागले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देग्राहक रिकाम्या हाताने परतले : दिवसभर लिंक नसल्याने कामकाज ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : औद्योगिक व शेतीप्रधान तालुका म्हणून कोरपना तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील वनसडी येथे बँक आॅफ इंडियाची एकमेव शाखा आहे. येथील इंटरनेट लिंक तांत्रिक कारणासाठी शुक्रवारी दिवसभर बंद असल्याने शेतकरी ग्राहकांना कामधंदे सोडून ताटकळत रहावे लागले. बँक बंद होण्याची वेळ झाली असतानाही लिंक सुरू न झाल्याने आल्या पावली ग्राहकांना रिकाम्या हाताने घरी जावे लागले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.इंटरनेट लिंकवर सर्व बँकिंग व्यवहार अवलंबून आहे. संपूर्ण आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार लिंक नसल्याने ठप्प पडत आहे. दि. १५ ला सकाळी १०.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मोठ्या संख्येने ग्राहक या बँकेत पैसे काढण्यासाठी तसेच इतर कामांसाठी आले होते. मात्र दिवसभर वाट पाहूनही काहीेच फायदा झाला नाही. इंटरनेट लिंक संबंधात अनेकवेळा असाच प्रकार येथे घडत असल्याने ग्राहक या बँकेच्या व्यवहाराला त्रस्त झाले आहे. विशेष म्हणजे, बँकेतील एटीएमसेवाही बंद असल्याने पैसा काढायचे कुठून असा प्रश्न येथील ग्राहकांना पडला. या बँकेच एकच कॅश काऊंटर असल्याने अन्य दिवशीही ग्राहकांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. एकमेव बँक असल्याने ग्राहकांची संख्या मोठी आहे. मात्र त्या तुलनेत येथे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास बँक व्यवस्थापन कमी पडले आहे. यासंदर्भात ग्राहकांनी अनेकवेळा तक्रारही केल्या आहेत. मात्र उपयोग झाला नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे असून येथे कर्मचाऱ्यांचीही संख्या कमी आहे. त्यामुळे इतर दिवशीही ग्राहकांना कामाशिवाय वापस जावे लागते. त्यामुळे ग्राहक सकाळपासून या बँके परिसरात रांगेत उभे राहून आपला नंबर लावतात.गरिबांना फटकावनसाडी बँक आॅफ इंडिया कार्यक्षेत्रात अनेक अतिदुर्गम व आदिवासीबहुल गावे आहे. तेथील नागरिकांना ही एकमेव जवळची बँक आहे. परंतु येथे कामे लवकर होत नसल्याने त्याचा फटका गरीब शेतकºयांना बसत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लग्नकार्य तसेच इतर कामासाठी पैसे काढण्यासाठी ग्राहक येतात मात्र त्यांना निराश व्हावे लागत आहे.