शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

वनसडीच्या बँकेत शेतकऱ्यांची रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:06 IST

औद्योगिक व शेतीप्रधान तालुका म्हणून कोरपना तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील वनसडी येथे बँक आॅफ इंडियाची एकमेव शाखा आहे. येथील इंटरनेट लिंक तांत्रिक कारणासाठी शुक्रवारी दिवसभर बंद असल्याने शेतकरी ग्राहकांना कामधंदे सोडून ताटकळत रहावे लागले. बँक बंद होण्याची वेळ झाली असतानाही लिंक सुरू न झाल्याने आल्या पावली ग्राहकांना रिकाम्या हाताने घरी जावे लागले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देग्राहक रिकाम्या हाताने परतले : दिवसभर लिंक नसल्याने कामकाज ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : औद्योगिक व शेतीप्रधान तालुका म्हणून कोरपना तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील वनसडी येथे बँक आॅफ इंडियाची एकमेव शाखा आहे. येथील इंटरनेट लिंक तांत्रिक कारणासाठी शुक्रवारी दिवसभर बंद असल्याने शेतकरी ग्राहकांना कामधंदे सोडून ताटकळत रहावे लागले. बँक बंद होण्याची वेळ झाली असतानाही लिंक सुरू न झाल्याने आल्या पावली ग्राहकांना रिकाम्या हाताने घरी जावे लागले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.इंटरनेट लिंकवर सर्व बँकिंग व्यवहार अवलंबून आहे. संपूर्ण आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार लिंक नसल्याने ठप्प पडत आहे. दि. १५ ला सकाळी १०.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मोठ्या संख्येने ग्राहक या बँकेत पैसे काढण्यासाठी तसेच इतर कामांसाठी आले होते. मात्र दिवसभर वाट पाहूनही काहीेच फायदा झाला नाही. इंटरनेट लिंक संबंधात अनेकवेळा असाच प्रकार येथे घडत असल्याने ग्राहक या बँकेच्या व्यवहाराला त्रस्त झाले आहे. विशेष म्हणजे, बँकेतील एटीएमसेवाही बंद असल्याने पैसा काढायचे कुठून असा प्रश्न येथील ग्राहकांना पडला. या बँकेच एकच कॅश काऊंटर असल्याने अन्य दिवशीही ग्राहकांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. एकमेव बँक असल्याने ग्राहकांची संख्या मोठी आहे. मात्र त्या तुलनेत येथे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास बँक व्यवस्थापन कमी पडले आहे. यासंदर्भात ग्राहकांनी अनेकवेळा तक्रारही केल्या आहेत. मात्र उपयोग झाला नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे असून येथे कर्मचाऱ्यांचीही संख्या कमी आहे. त्यामुळे इतर दिवशीही ग्राहकांना कामाशिवाय वापस जावे लागते. त्यामुळे ग्राहक सकाळपासून या बँके परिसरात रांगेत उभे राहून आपला नंबर लावतात.गरिबांना फटकावनसाडी बँक आॅफ इंडिया कार्यक्षेत्रात अनेक अतिदुर्गम व आदिवासीबहुल गावे आहे. तेथील नागरिकांना ही एकमेव जवळची बँक आहे. परंतु येथे कामे लवकर होत नसल्याने त्याचा फटका गरीब शेतकºयांना बसत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लग्नकार्य तसेच इतर कामासाठी पैसे काढण्यासाठी ग्राहक येतात मात्र त्यांना निराश व्हावे लागत आहे.