शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा UNGA मध्ये मोठा आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
6
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
7
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
8
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
9
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
10
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
11
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
12
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
13
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
14
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
15
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
16
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
17
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
18
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
20
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका

शेतकरी बँकेतून रिकाम्या हाताने परतले

By admin | Updated: June 16, 2017 00:33 IST

शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संबोधले जाते. मात्र राजुरा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या

खरीपाच्या तोंडावर पैसा मिळेना : जास्त रक्कम देण्याला बँकेचा नकारप्रकाश काळे । लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संबोधले जाते. मात्र राजुरा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गोवरी शाखेत शेतकऱ्यांना पैसाच मिळत नसल्याने दिवसभर ताटकळत राहण्याची वेळ आली आहे. पैशाअभावी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची भिती असून शेतकऱ्यांना पैसा देण्यास बँक नकार देत आहे.गोवरी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. या बँकेत गोवरी परिसरातील बहुतांश गावातील शेतकऱ्यांचे खाते आहेत. गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी बँकेत चकरा मारत असून बँकेत कॅश नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने आल्यापावली परत जावे लागत आहे. बँकेत रक्कम आलीच तर ५ हजार घेऊन जा, दहा हजार रुपयांचा विड्राल केल्यास पैसे मिळणार नाही, असे कर्मचाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बी-बियाण्यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज आहे. परंतु, बँकेतून पैसेच मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना बँकेसमोर ताटकळत राहण्याची पाळी आली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने बँकेला भेट दिली असता, बँकेत कॅश न आल्याने शेतकऱ्यांनी बँकेसमोर रांगा लावल्या होत्या. बँकेतून पैसे मिळावे म्हणून वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना विचारणा केली असता, सध्या आमचा शेतीचा हंगाम आहे. बियाणे घेण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून बँकेत चकरा मारूनही पैसे मिळात नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तत्काळ त्यांचे पैसे उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. काही भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी खरीप हंगामासाठी पैशाची जुळवाजुळव करायला लागला आहे. परंतु, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गोवरी शाखेतून पैसाच मिळत नसल्याने हंगाम कसा करायचा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.शेतीचा खरीप हंगाम अगदी तोंडावर आहे. बी-बियाणे घेण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. पैशासाठी बँकेत गेल्यावर पैसा मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते. यामुळे खरीप हंगाम धोक्यात येण्याची भिती आहे.- गणपत जुनघरी, शेतकरी, गोवरी.जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेतून आमच्या बँकेला कमी पैसा मिळतो. प्रत्यक्षात २० लाखांची मागणी असते. परंतु, बँकेला दोन-तीन लाख दिले जाते. त्यामुळे बँकेत पैशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पैसाच येत नसल्याने ग्राहकांना पैसे देणे कठीण झाले आहे.- केशव बोढे, व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती बँक, गोवरी.