शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणातील खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या दारी

By admin | Updated: November 15, 2015 00:45 IST

कापूस संकलन केंद्र लवकर सुरू करण्यात येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला.

कोरपना : कापूस संकलन केंद्र लवकर सुरू करण्यात येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला. परंतु, शासनाला आतापर्यंत मुहुर्तच सापडला नसल्याचे दिसते. कापूस कुठपर्यंत घरीच ठेवायचा, या चिंतेत शेतकरी आहेत. याचा फायदा घेत तेलंगणातील खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कवडीमोल भावात कापूस खरेदी करीत आहेत.कापूस खरेदीबाबत शासन उदासीन असल्याने दिसते. त्यामुळे येथे अद्याप कापूस संकलन केंद्र सुरू झाले नाही. पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाचे उत्पादन विदर्भात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस हे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात जास्त प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. पावसाने यावर्षी सुरूवातीला शेतकऱ्यांना झोडपले, त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतर जिल्ह्यात पावसाने दगा दिल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा फटका शेतपिकांना बसला. कोरड्या दुष्काळाने शेतपिकांची पुरती वाट लागली. शेती पिकली नाही तर खायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत होता. कसेतरी शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. पीक भरीस आल्यावर रोग पडल्याने कपाशीची झाडे वाळायला लागली होती. यावर उपाययोजना करीत शेतकऱ्यांनी महागडी औषधे फवारणी केली. एवढा आर्थिक भुर्दंड सोसून पीक आता हाती आले, तर विक्रीची चिंता त्यांना लागली. शासनाचे खरेदी केंद्र नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.खासगी व्यापारी बेभाव कापसाची मागणी करीत आहेत. त्यामुळे दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला.शासनाने हमीभाव जाहीर केला. हा हमीभाव तोकडा आहे. शासन कापूस दरवाढीसंदर्भात विचार करून जास्त भाव जाहीर करेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, शासनाने याबाबत अद्याप काहीच निर्णय घेतला नाही. उलट कापूस संकलन केंद्रही सुरू केले नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचा कापूस कवडीमोल भावात घेण्याची संधी मिळाली आहे. आंध्रातील व्यापारी या संधीचा फायदा उचलण्यासाठी जिल्ह्यात दाखल होत आहेत. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ते कापूस खरेदी करीत आहेत. दारातच कापूस विकला जात असल्यामुळे कमी भावात द्यावा लागत आहे. खरेदी केंद्राच्या प्रतीक्षेत कापसाची विक्री झाली नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. आता मालाची खासगी व्यापाऱ्यांकडून त्यांची लूट सुरू आहे. त्यासाठी तेलंगणाचे व्यापारी येथे येत आहेत. (शहर प्रतिनिधी)