शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

तेलंगणातील खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या दारी

By admin | Updated: November 15, 2015 00:45 IST

कापूस संकलन केंद्र लवकर सुरू करण्यात येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला.

कोरपना : कापूस संकलन केंद्र लवकर सुरू करण्यात येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला. परंतु, शासनाला आतापर्यंत मुहुर्तच सापडला नसल्याचे दिसते. कापूस कुठपर्यंत घरीच ठेवायचा, या चिंतेत शेतकरी आहेत. याचा फायदा घेत तेलंगणातील खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कवडीमोल भावात कापूस खरेदी करीत आहेत.कापूस खरेदीबाबत शासन उदासीन असल्याने दिसते. त्यामुळे येथे अद्याप कापूस संकलन केंद्र सुरू झाले नाही. पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाचे उत्पादन विदर्भात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस हे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात जास्त प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. पावसाने यावर्षी सुरूवातीला शेतकऱ्यांना झोडपले, त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतर जिल्ह्यात पावसाने दगा दिल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा फटका शेतपिकांना बसला. कोरड्या दुष्काळाने शेतपिकांची पुरती वाट लागली. शेती पिकली नाही तर खायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत होता. कसेतरी शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. पीक भरीस आल्यावर रोग पडल्याने कपाशीची झाडे वाळायला लागली होती. यावर उपाययोजना करीत शेतकऱ्यांनी महागडी औषधे फवारणी केली. एवढा आर्थिक भुर्दंड सोसून पीक आता हाती आले, तर विक्रीची चिंता त्यांना लागली. शासनाचे खरेदी केंद्र नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.खासगी व्यापारी बेभाव कापसाची मागणी करीत आहेत. त्यामुळे दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला.शासनाने हमीभाव जाहीर केला. हा हमीभाव तोकडा आहे. शासन कापूस दरवाढीसंदर्भात विचार करून जास्त भाव जाहीर करेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, शासनाने याबाबत अद्याप काहीच निर्णय घेतला नाही. उलट कापूस संकलन केंद्रही सुरू केले नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचा कापूस कवडीमोल भावात घेण्याची संधी मिळाली आहे. आंध्रातील व्यापारी या संधीचा फायदा उचलण्यासाठी जिल्ह्यात दाखल होत आहेत. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ते कापूस खरेदी करीत आहेत. दारातच कापूस विकला जात असल्यामुळे कमी भावात द्यावा लागत आहे. खरेदी केंद्राच्या प्रतीक्षेत कापसाची विक्री झाली नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. आता मालाची खासगी व्यापाऱ्यांकडून त्यांची लूट सुरू आहे. त्यासाठी तेलंगणाचे व्यापारी येथे येत आहेत. (शहर प्रतिनिधी)