शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: November 14, 2015 01:18 IST

मध्यम प्रतिचे धानपिक हाती येत असताना पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी तालुका परिसरातील धानपीक करपायला लागले आहे.

कर्जमाफीची मागणी : पाण्याअभावी धानपीक लागले करपायला पोंभूर्णा : मध्यम प्रतिचे धानपिक हाती येत असताना पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी तालुका परिसरातील धानपीक करपायला लागले आहे. त्याचे रुपांतर तणसात झाले असल्याने यावर्षीची अल्पभूधारक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असल्याचे चित्र दिसत आहे.परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कर्ज काढून महागड्या बियाणांची खरेदी केली. महागडी खते घेतली. हातात होते नव्हते ते सगळे शेतीत झोकून देऊन मोठ्या मेहनतीने शेतकरी शेती करण्याच्या कामाला लागला होता. यावर्षी तरी धान्य भरभराटीने होवून लावलेला पैसा निघून उर्वरीत पैसे मुला- बाळांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, घरकुटुंब चालविण्यासाठी शिल्लक राहतील, अशी आशा शेतकऱ्यांची होती. परंतु निसर्गाने यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळविल्या. ऐन धानपीक हातामध्ये येण्याच्या क्षणात धानपिकावर अनेकविध रोगांनी हल्ला चढविला. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.काही धानपीक तग धरुन असतानाच शेवटी एका पाण्याची आवश्यकता होती. परंतु पावसाने दगा दिल्याने अखेर शेवटच्या टोकावर असलेल्या धान पीक करपून गेले आणि त्याचे आता तणसात रुपांतर झाले आहे. त्यामुळे संपूर्ण दिवाळी अंधारात केली आहे.दरवर्षी कधी ओला तर कधी सुका दुष्काळ, त्यातच रोगराई यामुळे सतत नापिकीला शेतकऱ्याला सामोरे जावे लागत असल्याने शेतकऱ्यांवर दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. एकीकडे भारताचा कणा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या शेतकरी दादाचा पाठीचा कणा मोडायला लागला तरी त्याच्याकडे कुणाचे लक्ष नाही. जर का जगाच्या या पोशिंद्याचाच कणा मोडेल तर या देशाची काय अवस्था होईल. यासाठी शासनाने ग्रामीण शेतकऱ्यांची होणारी दयनीय स्थिती दूर करण्यासाठी आर्थिक मदत करुन थकीत कर्ज माफ करावे. तेव्हाच त्यांचे खरे दिवाळीचे स्वप्न साकार होतील. (तालुका प्रतिनिधी)