शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

शेतकऱ्यांनी थाटला धान्य स्वच्छतेचा कारखाना

By admin | Updated: September 17, 2016 01:12 IST

अलिकडे अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करताना दिसून येतात. असाच एक प्रयोग चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील

चंद्रपूर : अलिकडे अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करताना दिसून येतात. असाच एक प्रयोग चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील शेतकऱ्यांनी करून ‘आत्मा’च्या मदतीने धान्य स्वच्छता व प्रतवारीचा कारखाना उभा केला आहे. अल्पावधीतच हा कारखाना शेतकऱ्यांना नफा देणारा ठरला आहे. या नाविण्यपूर्ण प्रयोगाने इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.चिमूर तालुक्यातील सावरगाव हे ६ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील शेतकरी प्राधान्याने धान, सोयाबीन, हरभरा, तुर आदी पारंपारिक पिके घेतात. ही पिके विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत नेल्या जात होते. मात्र पाहिजे त्या प्रमाणात त्यांच्या मालास भाव मिळत नव्हता. यावर पर्याय सोधण्यासाठी काही शेतकऱ्यांनी आत्मा कार्यालयाशी संपर्क साधला. या कार्यालयाकडून मिळालेल्या मार्गदर्शनाने गावातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येत सन २०११-१२ मध्ये जय किसान स्वयंसहाय्यता शेतकरी बतच गटाची स्थापना केली व एकत्रितपणे शेत माल पिकवून विकण्याचा प्रयोग केला.गटाच्या वतीने एकत्रित शेतमाल विकल्या जात असला तरी काढणी पश्चात तंत्रज्ञानाची माहिती नसल्यामुळे त्यांच्या मालास आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमत मिळत होती. सन २०१२-१३ मध्ये महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प व आत्माच्या वतीने गटाने धान्य स्वच्छता व प्रतवारी उद्योगाची माहिती व प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सन २०१४-१५ पासून प्रत्यक्षात धान्य स्वच्छता व प्रतवारीचा गावात कारखाना सुरु केला. यासाठी गटास ९० टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले.आत्मा कार्यालयाच्या वतीने यासाठी मिळालेले प्रोत्साहन व प्रशिक्षणामुळे वेगळा प्रयोग उभारता आला असल्याचे गटातील शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात भविष्यात इतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर स्वच्छता व प्रतवारीचे उद्योग निर्माण करण्यासोबतच दालमिल उभारण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे आत्मा कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कार्यालयाला भेट देण्याचे आवाहन आत्माने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)इतरांनाही करून मिळते धान्य स्वच्छस्वच्छता व प्रतवारी सुरुवात झाल्यानंतर गटातील सर्व शेतकऱ्यांचा कृषी माल स्वच्छ होवून बाजारपेठेस जावू लागल्याने इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत या शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळू लागला आहे. धान, सोयाबिन, तुर, हरभरा या मालास सरासरी ३०० ते ४०० रुपये अधिक भाव मिळाला. विशेष म्हणजे, अन्य शेतकऱ्यांच्या कृषी मालासही गटाच्या कारखान्यात ८० रुपये प्रति क्विंटल या दराने धान्य स्वच्छता व प्रतवारी करुन दिली जात असल्याने यातूनही गटास चांगला नफा मिळत आहे. सप्टेंबर २०१५ अखेर इतर शेतकऱ्यांच्या मालाची स्वच्छता व प्रतवारीतून गटास १ लाख रुपयाचे निव्वळ उत्पन्न मिळाले होते.