शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

शेतकऱ्यांनी थाटला धान्य स्वच्छतेचा कारखाना

By admin | Updated: September 17, 2016 01:12 IST

अलिकडे अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करताना दिसून येतात. असाच एक प्रयोग चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील

चंद्रपूर : अलिकडे अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करताना दिसून येतात. असाच एक प्रयोग चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील शेतकऱ्यांनी करून ‘आत्मा’च्या मदतीने धान्य स्वच्छता व प्रतवारीचा कारखाना उभा केला आहे. अल्पावधीतच हा कारखाना शेतकऱ्यांना नफा देणारा ठरला आहे. या नाविण्यपूर्ण प्रयोगाने इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.चिमूर तालुक्यातील सावरगाव हे ६ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील शेतकरी प्राधान्याने धान, सोयाबीन, हरभरा, तुर आदी पारंपारिक पिके घेतात. ही पिके विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत नेल्या जात होते. मात्र पाहिजे त्या प्रमाणात त्यांच्या मालास भाव मिळत नव्हता. यावर पर्याय सोधण्यासाठी काही शेतकऱ्यांनी आत्मा कार्यालयाशी संपर्क साधला. या कार्यालयाकडून मिळालेल्या मार्गदर्शनाने गावातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येत सन २०११-१२ मध्ये जय किसान स्वयंसहाय्यता शेतकरी बतच गटाची स्थापना केली व एकत्रितपणे शेत माल पिकवून विकण्याचा प्रयोग केला.गटाच्या वतीने एकत्रित शेतमाल विकल्या जात असला तरी काढणी पश्चात तंत्रज्ञानाची माहिती नसल्यामुळे त्यांच्या मालास आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमत मिळत होती. सन २०१२-१३ मध्ये महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प व आत्माच्या वतीने गटाने धान्य स्वच्छता व प्रतवारी उद्योगाची माहिती व प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सन २०१४-१५ पासून प्रत्यक्षात धान्य स्वच्छता व प्रतवारीचा गावात कारखाना सुरु केला. यासाठी गटास ९० टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले.आत्मा कार्यालयाच्या वतीने यासाठी मिळालेले प्रोत्साहन व प्रशिक्षणामुळे वेगळा प्रयोग उभारता आला असल्याचे गटातील शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात भविष्यात इतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर स्वच्छता व प्रतवारीचे उद्योग निर्माण करण्यासोबतच दालमिल उभारण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे आत्मा कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कार्यालयाला भेट देण्याचे आवाहन आत्माने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)इतरांनाही करून मिळते धान्य स्वच्छस्वच्छता व प्रतवारी सुरुवात झाल्यानंतर गटातील सर्व शेतकऱ्यांचा कृषी माल स्वच्छ होवून बाजारपेठेस जावू लागल्याने इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत या शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळू लागला आहे. धान, सोयाबिन, तुर, हरभरा या मालास सरासरी ३०० ते ४०० रुपये अधिक भाव मिळाला. विशेष म्हणजे, अन्य शेतकऱ्यांच्या कृषी मालासही गटाच्या कारखान्यात ८० रुपये प्रति क्विंटल या दराने धान्य स्वच्छता व प्रतवारी करुन दिली जात असल्याने यातूनही गटास चांगला नफा मिळत आहे. सप्टेंबर २०१५ अखेर इतर शेतकऱ्यांच्या मालाची स्वच्छता व प्रतवारीतून गटास १ लाख रुपयाचे निव्वळ उत्पन्न मिळाले होते.