शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी थाटला धान्य स्वच्छतेचा कारखाना

By admin | Updated: September 17, 2016 01:12 IST

अलिकडे अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करताना दिसून येतात. असाच एक प्रयोग चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील

चंद्रपूर : अलिकडे अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करताना दिसून येतात. असाच एक प्रयोग चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील शेतकऱ्यांनी करून ‘आत्मा’च्या मदतीने धान्य स्वच्छता व प्रतवारीचा कारखाना उभा केला आहे. अल्पावधीतच हा कारखाना शेतकऱ्यांना नफा देणारा ठरला आहे. या नाविण्यपूर्ण प्रयोगाने इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.चिमूर तालुक्यातील सावरगाव हे ६ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील शेतकरी प्राधान्याने धान, सोयाबीन, हरभरा, तुर आदी पारंपारिक पिके घेतात. ही पिके विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत नेल्या जात होते. मात्र पाहिजे त्या प्रमाणात त्यांच्या मालास भाव मिळत नव्हता. यावर पर्याय सोधण्यासाठी काही शेतकऱ्यांनी आत्मा कार्यालयाशी संपर्क साधला. या कार्यालयाकडून मिळालेल्या मार्गदर्शनाने गावातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येत सन २०११-१२ मध्ये जय किसान स्वयंसहाय्यता शेतकरी बतच गटाची स्थापना केली व एकत्रितपणे शेत माल पिकवून विकण्याचा प्रयोग केला.गटाच्या वतीने एकत्रित शेतमाल विकल्या जात असला तरी काढणी पश्चात तंत्रज्ञानाची माहिती नसल्यामुळे त्यांच्या मालास आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमत मिळत होती. सन २०१२-१३ मध्ये महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प व आत्माच्या वतीने गटाने धान्य स्वच्छता व प्रतवारी उद्योगाची माहिती व प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सन २०१४-१५ पासून प्रत्यक्षात धान्य स्वच्छता व प्रतवारीचा गावात कारखाना सुरु केला. यासाठी गटास ९० टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले.आत्मा कार्यालयाच्या वतीने यासाठी मिळालेले प्रोत्साहन व प्रशिक्षणामुळे वेगळा प्रयोग उभारता आला असल्याचे गटातील शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात भविष्यात इतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर स्वच्छता व प्रतवारीचे उद्योग निर्माण करण्यासोबतच दालमिल उभारण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे आत्मा कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कार्यालयाला भेट देण्याचे आवाहन आत्माने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)इतरांनाही करून मिळते धान्य स्वच्छस्वच्छता व प्रतवारी सुरुवात झाल्यानंतर गटातील सर्व शेतकऱ्यांचा कृषी माल स्वच्छ होवून बाजारपेठेस जावू लागल्याने इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत या शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळू लागला आहे. धान, सोयाबिन, तुर, हरभरा या मालास सरासरी ३०० ते ४०० रुपये अधिक भाव मिळाला. विशेष म्हणजे, अन्य शेतकऱ्यांच्या कृषी मालासही गटाच्या कारखान्यात ८० रुपये प्रति क्विंटल या दराने धान्य स्वच्छता व प्रतवारी करुन दिली जात असल्याने यातूनही गटास चांगला नफा मिळत आहे. सप्टेंबर २०१५ अखेर इतर शेतकऱ्यांच्या मालाची स्वच्छता व प्रतवारीतून गटास १ लाख रुपयाचे निव्वळ उत्पन्न मिळाले होते.