शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक

By admin | Updated: July 7, 2016 00:49 IST

मागील तीन वर्षापासून नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पिककर्जाचे पूनर्गठन करण्याचे आदेश बँकांना दिले.

गुंजेवाही : मागील तीन वर्षापासून नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पिककर्जाचे पूनर्गठन करण्याचे आदेश बँकांना दिले. पण सिंदेवाही येथील राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचा प्रकार येथे चालविला आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या पककर्जाच्या पूनर्गठनाचा मार्ग अद्याप मोकळा झाला नसून अनेकजण पिक कर्जापासून वंचित आहेत.दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार असल्याचा प्रतिक्रिया येथे उमटत आहे. शेतकऱ्यांकडे असलेली थकबाकी पाहता बँका कर्जाचे पूनर्गठन तथा शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करण्यासंदर्भात उदासीन धोरण असल्याचे दिसून येते. शासनही दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यास असमर्थ ठरले आहे. त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करीत त्यांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न बँकांच्या अडवणुकीमुळे फसला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी परत खाईत लोटला जाणार नाही. खासगी सावकाराकडे जाऊन त्याला गरज भागवावी लागणार आहे. कर्जाच्या पूनर्गठणासाठी शेतकरी बँकांचे उंबरडे झिजवित आहे. पण त्यांना बँकेतून परत पाठविल्या जात आहे.राज्यातील किमान ८० टक्के शेतकऱ्यांना पिकर्जाच्या कक्षेत आणण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी केली. पण विदर्भातील बँकांना रिझर्व्ह बँकेने निधी उपलब्ध करुन दिला नसल्याने पिक कर्जाचे वाटप रखडल्याची माहिती आहे. सोबतच सन २०१२ ते २०१४ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या पिककर्जाच्या पुनर्गठनाचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने निकाली न काढल्याने पूनर्गठनसुद्धा थांबले आहे. (वार्ताहर)