शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
7
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
8
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
9
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
10
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
11
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
12
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
13
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
14
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
15
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
16
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
17
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
18
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
19
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
20
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली

राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक

By admin | Updated: July 7, 2016 00:49 IST

मागील तीन वर्षापासून नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पिककर्जाचे पूनर्गठन करण्याचे आदेश बँकांना दिले.

गुंजेवाही : मागील तीन वर्षापासून नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पिककर्जाचे पूनर्गठन करण्याचे आदेश बँकांना दिले. पण सिंदेवाही येथील राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचा प्रकार येथे चालविला आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या पककर्जाच्या पूनर्गठनाचा मार्ग अद्याप मोकळा झाला नसून अनेकजण पिक कर्जापासून वंचित आहेत.दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार असल्याचा प्रतिक्रिया येथे उमटत आहे. शेतकऱ्यांकडे असलेली थकबाकी पाहता बँका कर्जाचे पूनर्गठन तथा शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करण्यासंदर्भात उदासीन धोरण असल्याचे दिसून येते. शासनही दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यास असमर्थ ठरले आहे. त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करीत त्यांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न बँकांच्या अडवणुकीमुळे फसला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी परत खाईत लोटला जाणार नाही. खासगी सावकाराकडे जाऊन त्याला गरज भागवावी लागणार आहे. कर्जाच्या पूनर्गठणासाठी शेतकरी बँकांचे उंबरडे झिजवित आहे. पण त्यांना बँकेतून परत पाठविल्या जात आहे.राज्यातील किमान ८० टक्के शेतकऱ्यांना पिकर्जाच्या कक्षेत आणण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी केली. पण विदर्भातील बँकांना रिझर्व्ह बँकेने निधी उपलब्ध करुन दिला नसल्याने पिक कर्जाचे वाटप रखडल्याची माहिती आहे. सोबतच सन २०१२ ते २०१४ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या पिककर्जाच्या पुनर्गठनाचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने निकाली न काढल्याने पूनर्गठनसुद्धा थांबले आहे. (वार्ताहर)