शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

दुष्काळाने मोडला शेतकऱ्यांचा कणा

By admin | Updated: March 11, 2015 00:59 IST

अपूरे पर्जन्यमान, नापिकी व सिंचनाच्या सोयी अभावी पहाडावरील शेतकरी दुष्काळाच्या चक्रात अडकला आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाने ...

जिवती : अपूरे पर्जन्यमान, नापिकी व सिंचनाच्या सोयी अभावी पहाडावरील शेतकरी दुष्काळाच्या चक्रात अडकला आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाने पहाडावरील शेतकऱ्यांचा कणाच मोडला जात असल्याचा चित्र सध्या बघायला मिळत आहे.खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने उत्पनात घट्ट झाली. झालेला खर्च निघाला नाही, असे अस्मानी संकट कोसळल्यावरही शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला नाही. दुष्काळाच्या चक्रव्यवहातून सावरण्यासाठी थोडीफार सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रबीची लागवड केली. पिकही जोमात आले. मात्र ऐनवेळी अवकाळी पाऊस झाल्याने हाती आलेल्या पिकाची नासाडी झाली. जिवती तालुका व मागास तालुका म्हणून ओळखला जात असून तालुक्यातील संपूर्ण शेती खडकाची आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. सिंचनाची सोय नसल्याने निसर्गाच्या भरवश्यावर कोरडवाहू शेती करणे हा त्यांचा हातभट्यांचा व्यवसायच असल्यासारखे आहे. पिकेल तर शेती नाही तर मातीच आहे. दिवसभर शेतात राबराब करुन सुद्धा पाहिजे तेवढे उत्पन्न घेता येत नाही. पिकले तरी विकले जात नाही. निसर्गाचा दगा त्यात शासनाकडून शेतमालाला हमी भाव नाही. यामुळे पहाडावरील शेतकऱ्यांवर आस्मानी संकटच कोसळले आहे. खरीप हंगाम गेल्यानंतर रबी हंगामात तरी सावरता येईल, अशी आशा मनात घेवून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अवकाळी पावसाने चुराडा केला. डोळ्यादेखत त्यांची स्वप्ने गोठली गेली. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकरी वर्गाच्या मनात शेती व्यवसायाबद्दल उदासिनता निर्माण झाली आहे. निसर्गाच्या भरवश्यावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चाचा ताळमेळ आणि त्याला मिळणारा मोबदला याचे गणित कधीच जमले नाही. सावकारी कर्ज, बँक कर्ज घेवून मायभूमीला सजविणाऱ्या शेतकऱ्याला निसर्गाने हतबल केले आहे. शासनाने दृष्काळग्रस्त मदत जाहीर केली. मात्र तेही दु:खावर मलमपट्टी केल्यासारखीच आहे. बहुतांश शेतकऱ्यांना तर जमिनीचा मालकी हक्कच नसल्याने त्याचा फायदाही घेत येत नाही. (तालुका प्रतिनिधी)