शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे आता उद्ध्व‌स्त झालेल्या पिकाच्या विम्याकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 05:00 IST

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांनी तालुक्यातील धान पीक पुरते नेस्तनाबूत ...

ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : धान पिकांना जबर फटका

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांनी तालुक्यातील धान पीक पुरते नेस्तनाबूत झाले आहे. धास्तावलेले तालुक्यातील शेतकरी आता पीक विम्याकडे आस लावून बसले आहेत. आता विमा कंपनी शेतकऱ्यांच्या मदतीला कितपत धावून येते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.नागभीड तालुक्यात धानाचे एकमेव पीक घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात हे पीक घेण्यात येते. आर्थिकदृष्टया सक्षम नसल्याने हे पीक घेण्यासाठी शेतकरी गावातील सेवा सहकारी आणि आदिवासी विविध कार्यकारी या सोसायटयांमार्फत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्जाची उचल करीत असतात. शेतकरी हे कर्ज उचलत असतांना कर्जाऊ रकमेतून जिल्हा मध्यवर्ती बँक पिक विम्याचा हप्ता कपात करून विमा कंपनीकडे हप्त्याची रक्कम जमा करीत असते. अशीच पद्धत इतर राष्ट्रीयकृत बँकाही अवलंबत असतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेचाच विचार करता ही बँक दरवर्षी सहा ते सात हजार शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध करून देत असल्याची माहिती आहे. काही शेतकरी वैयक्तिकरित्याही आपल्या शेतीचा पीक विमा काढत असतात.असेही शेतकरी शेकडोच्या घरात आहेत.यावर्षी नागभीड तालुक्यात धानावर अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर मावा, तुडतुडा, करपा यासारख्या विविध रोगांनी धान पीक पार नेस्तनाबूत केले. आता मळणीनंतर दर एकरी पाचसहा पोती उत्पन्न शेतकºयांच्या हातात येत असून या उत्पन्नाने शेतकरी पार हादरून गेले आहेत.हे शेतकरी आता पीक विम्याची मागणी करू लागले आहेत. दरम्यान नागभीड येथील काही शेतकºयांनी पीक विमा कंपनीच्या अधिका?्यांशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला पण हे अधिकारी कोणतीच दाद देत नसल्याचे सुधाकर अमृतकर या शेतकºयाने सांगितले.कृषी विभागाकडून नुकसानीचे सर्वेक्षणतालुक्यातील एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन शासनाच्या महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागात कार्यरत असलेल्या तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक हे गावागावात नुकसानीचे तक्ते तयार करीत असल्याची माहिती संबंधित विभागाच्या एका अधिकाºयांनी दिली. तक्ते तयार करण्याचे हे काम जवळपास ७५ टक्के झाले असल्याचीही माहिती आहे. तक्ते पाडण्याचे हे काम पूर्ण झाले की तक्तयांचा गोषवारा संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.२०१७ मध्ये मिळाली होती मदत२०१७ च्या हंगामात असेच धान पीक विविध रोगांनी नेस्तनाबूत केले होते. त्यावेळी अनेक शेतकºयांनी शेतातच उभे धानपीक जाळले होते. माध्यमांनी शेतकºयांच्या व्यथा उजागर केल्यानंतर शासनाने मदत आणि विमा कंपनीही शेतकºयांच्या मदतीला धावून आल्या होत्या.