शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नऊ गावांतील शेतकऱ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:46 IST

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जमिनी घेतलेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या; अन्यथा गो बॅक व्हा, असा नारा देत बुधवारी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात नऊ गावातील आदिवासी, भूमिहिन शेतकऱ्यांनी उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीवर धडक दिली. मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिनापासून अंबुजा कंपनीसाठी गावबंदीचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे बुधवारी उपरवाही दणाणून गेले ...

ठळक मुद्देगावबंदीचा इशारा : अंबुजा सिमेंट कंपनीने प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जमिनी घेतलेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या; अन्यथा गो बॅक व्हा, असा नारा देत बुधवारी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात नऊ गावातील आदिवासी, भूमिहिन शेतकऱ्यांनी उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीवर धडक दिली. मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिनापासून अंबुजा कंपनीसाठी गावबंदीचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे बुधवारी उपरवाही दणाणून गेले होते.बुधवारी दुपारी १२ वाजता उपरवाही येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व प्रहारचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक पप्पु देशमुख यांनी केले. यावेळी फिरोजखान पठाण, घनश्याम येरगुडे, गडचांदूरच्या माजी सरपंच सुमन आत्राम, लिंगु कुमरे, परशुराम तलांडे, बाबुराव आत्राम, धर्मू किन्नाके, गोविंदा मडावी, भिमू मेश्राम, शंकर न्याहारे, परशुराम मेश्राम, साईनाथ वाभीटकर याच्यासह परिसरातील नऊ गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. या मोर्चासोबतच आदिवासी-भूमिहिन शेतकºयांचे टप्पा आंदोलनही सुरु केल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. सदर आंदोलन टप्याटप्याने चालणार आहे. यात उपरवाही, गोपालपूर, सालेगुडा, सोनापूर, पालेगुडा, रेंगेगुडा, इसापूर, हिरापूर, लाईनगुडा या गावांतील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, अंबुजा प्रवेशद्वारावर पोहचलेल्या या मोर्चाला नायब तहसीलदार मडावी, ठाणेदार आणि कंपनी व्यवस्थापनातील प्रतिनिधी सामोरे गेले. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.उपोषणकर्त्यांचा सलाईन लावण्यास नकारचंद्रपूर : अंबुजा सिमेंट कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. मात्र आश्वासनाप्रमाणे स्थायी नोकरी दिली नाही. नोकरी व वाढीव रक्कम तत्काळ देण्याची यावी, या मागणीसाठी कोरपना तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांनी चंद्रपुरात शनिवारपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या आज पाचव्या दिवशी आकाश लोडे, संजय मोरे व सचीन पिंपळशेंडे या तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे तिघांनाही बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना सलाईन लावण्यास सांगितले. मात्र सलाईन लावण्यास उपोषणकर्त्यांनी नकार दर्शविला. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत सलाईन लावणार नाही आणि उपोषणही थांबविणार नाही, अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे.